शहरं
Join us  
Trending Stories
1
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
2
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
3
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
4
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
5
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
6
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”; मंत्री चंद्रकांत पाटील
7
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
8
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
9
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
10
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
11
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
12
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
13
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
14
राहुल गांधींसोबतच्या बैठकीला शशी थरूर अनुपस्थित, चर्चांना उधाण, पक्षाने दिली अशी माहिती 
15
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
16
Numerology: एकसारखे नंबर वारंवार दिसणे केवळ योगायोग नाही, तर उज्ज्वल भविष्याचे शुभ संकेत!
17
अजबच! घटस्फोट झाला, पण पत्नीने ना पोटगी मागितली ना... , उलट लग्नातल्या बांगड्याही केल्या परत, कोर्टही अवाक्   
18
नवा सिक्सर किंग! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीचा कहर! १४ षटकार ठोकत मोडला १७ वर्षांपूर्वीचा जागतिक विक्रम
19
चांदी झाली 'सोनेरी'! २ लाख रुपये किलोचा टप्पा पार, पण गुंतवणुकीपूर्वी 'हा' भयानक इतिहास वाचा
20
इम्रान खानचा काटा काढायला असीम मुनीरचा खतरनाक प्लॅन; देशद्रोहाचा खटला चालवला जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

कोण असेल ग्रामपंचायत निवडणूक रिंगणात?; काही तासांत होणार स्पष्ट

By चंद्रकांत शेळके | Updated: October 24, 2023 18:07 IST

या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या कालावधीत इच्छुकांच्या अर्जाचा पाऊस पडला.

अहमदनगर : जिल्ह्यातील १९४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी विक्रमी अर्ज दाखल झालेले असले तरी बुधवारी (दि. २५) दुपारी तीनपर्यंत अर्ज माघारीची मुदत असल्याने तीननंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

दि. ५ नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील १९४ ग्रामपंचायतींसाठी मतदान होत आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या कालावधीत इच्छुकांच्या अर्जाचा पाऊस पडला. १९४ ग्रामपंचायतींच्या १ हजार ७०१ सदस्यांच्या जागांसाठी ७ हजार २६० अर्ज दाखल झाले आहेत. तर १९४ सरपंचपदासाठी १३११ अर्ज आले आहेत. मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने आता माघारीच्या अंतिम दिवशी अर्ज मागे घेण्यासाठी गावातील नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे.

ग्रामपंचायत स्तरावर नेहमीच चुरशीच्या लढती होतात. सरपंचपदाबरोबरच सदस्यासाठीही एकास एक लढतीऐवजी बहुरंगी लढती पहायला मिळतात. त्यामुळे अर्ज माघारीचा दिवस असला तरी सदस्यांच्या जागेसाठी ४ ते ५ हजार अर्ज शिल्लक राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, बुधवारी माघारीनंतर लगेच चिन्हवाटपही होणार आहे.

५ नोव्हेंबरला मतदानया ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ५ नोव्हेंबरला मतदान होऊन ६ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. त्यामुळे कोण गुलाल घेणार आणि कोणाचे पानीपत होणार, हे निकालाच्या दिवशीच स्पष्ट होणार आहे. दरम्यान, प्रशासनाकडून निवडणुकीची सर्व तयारी पूर्ण झालेली आहे.