शहरं
Join us  
Trending Stories
1
या देशामध्ये राष्ट्रपतींच्या हत्येचा प्रयत्न, जमावाने कारवर फेकले दगड, केला गोळीबार
2
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
3
IPS पूरन कुमार यांच्या पत्नीचे गंभीर आरोप, हरियाणाचे DGP आणि SPविरोधात दिली तक्रार   
4
VIDEO: पंतप्रधान मोदी नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनावेळी मराठीत काय बोलले? ऐका...
5
थायलंडमध्ये मसाज घेण्यासाठी जाणं होणार महाग, जाणून घ्यावा हा नियम, अन्यथा ऐनवेळी बसेल भुर्दंड   
6
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
7
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
8
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
9
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
10
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
11
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
12
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
13
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
14
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
15
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
16
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
17
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
18
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
19
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
20
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”

कोण असेल ग्रामपंचायत निवडणूक रिंगणात?; काही तासांत होणार स्पष्ट

By चंद्रकांत शेळके | Updated: October 24, 2023 18:07 IST

या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या कालावधीत इच्छुकांच्या अर्जाचा पाऊस पडला.

अहमदनगर : जिल्ह्यातील १९४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी विक्रमी अर्ज दाखल झालेले असले तरी बुधवारी (दि. २५) दुपारी तीनपर्यंत अर्ज माघारीची मुदत असल्याने तीननंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

दि. ५ नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील १९४ ग्रामपंचायतींसाठी मतदान होत आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या कालावधीत इच्छुकांच्या अर्जाचा पाऊस पडला. १९४ ग्रामपंचायतींच्या १ हजार ७०१ सदस्यांच्या जागांसाठी ७ हजार २६० अर्ज दाखल झाले आहेत. तर १९४ सरपंचपदासाठी १३११ अर्ज आले आहेत. मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने आता माघारीच्या अंतिम दिवशी अर्ज मागे घेण्यासाठी गावातील नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे.

ग्रामपंचायत स्तरावर नेहमीच चुरशीच्या लढती होतात. सरपंचपदाबरोबरच सदस्यासाठीही एकास एक लढतीऐवजी बहुरंगी लढती पहायला मिळतात. त्यामुळे अर्ज माघारीचा दिवस असला तरी सदस्यांच्या जागेसाठी ४ ते ५ हजार अर्ज शिल्लक राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, बुधवारी माघारीनंतर लगेच चिन्हवाटपही होणार आहे.

५ नोव्हेंबरला मतदानया ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ५ नोव्हेंबरला मतदान होऊन ६ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. त्यामुळे कोण गुलाल घेणार आणि कोणाचे पानीपत होणार, हे निकालाच्या दिवशीच स्पष्ट होणार आहे. दरम्यान, प्रशासनाकडून निवडणुकीची सर्व तयारी पूर्ण झालेली आहे.