शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
2
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
3
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
4
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
5
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
6
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
7
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
8
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
9
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
10
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
11
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
12
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
13
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
14
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
15
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
16
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
17
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
18
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
19
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
20
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली

नगरला अच्छे दिन कधी येणार?

By admin | Updated: August 9, 2014 00:23 IST

असुरक्षिततेचे भूत मानगुटीवर बसल्याने इथला विकास पार खड्ड्यात गेला आहे.

अहमदनगर : लोकप्रतिनिधी असो की अधिकारी... प्रत्येक जण येतो आणि नगरच्या विकासाविषयी कळवळून बोलतो. कोट्यवधी रुपयांच्या निधीचे गाजर दाखवित आश्वासनांची उड्डाणे येथे रोजच होतात, तरीही विकासाचे विमान जमिनीवरच आहे. राजकीय इच्छाशक्तीचा अभाव असल्याची टीका सामाजिक कार्यकर्त्यांकडून होते, तर शहराला विकासापासून वंचित ठेवण्यातच इथले राजकारण फिरते आहे. स्वातंत्र्य मिळाले, मात्र असुरक्षिततेचे भूत मानगुटीवर बसल्याने इथला विकास पार खड्ड्यात गेला आहे. अहमदशहानंतर थेट नवनीतभाई बार्शीकरांनी नगरचा विकास घडविल्याची साक्ष दिली जाते. उद्याने, रुग्णालये, तलाव, एम.आय.डी.सी., रस्ते, पाणी या काही साऱ्या मूलभूत सोयी-सुविधा बार्शीकरांच्या काळात झाल्या. नगरपालिकेची महापालिका झाली. कधी निधीचे, तर कधी विरोधी पक्ष असल्याचा कांगावा करीत नगर विकास विन्मुख झाले. ‘चाँदबिबी आली तरी तिला सरळपणे तिचा महाल सापडेल’, असे नगरच्या विकासाविषयी नेहमी बोलले जात असले तरी एवढे नगर मागासलेले राहिले नाही. रस्ते झाले, इमारती उभ्या राहिल्या, व्यवसाय वाढले, वाहने वाढली, पैसाही लोकांकडे आला. पण ज्याने त्याने वैयक्तिक हिमतीवर हा विकास केला आहे. नाशिक-पुणे-मुंबई-औरंगाबाद या चतुष्कोनात राहण्याचा बहुमान नगरला मिळाला आहे. जिल्ह्यातील अन्य शहरांच्या तुलनेत नगर मागेच राहिलेले आहे. शिर्डी, शिंगणापूर, भंडारदरा असे धार्मिक-पर्यटनदृष्ट्या नगर जगभरात पोहोचले असले तरी या शहराचा चेहरा ओबडधोबड ठेवण्यातच जनता धन्य झाली आहे. नगर राजकारणाच्या फेऱ्यातून विकासाकडे कधी झुकणार? की तसेच राहणार? दक्षिण व उत्तरेच्या मध्यावर केवळ राजकारणाचा पट असणाऱ्या नगरला अच्छे दिन कधी येणार? याचीच प्रतीक्षा आहे. (प्रतिनिधी)