शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
"मला ही भूमिका साकारायची...", आमिर खानने दिली 'महाभारत' प्रोजेक्टची हिंट, सुरु करणार काम
4
मुंबईच्या हॉटेलमध्ये प्रियकराची हत्या, पत्नीला केला मेसेज...; राजस्थानात महिलेला अटक
5
एकनाथ शिंदेंचा एकाचवेळी काँग्रेस, शरद पवार गटाला धक्का; पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत
6
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
7
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
8
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
9
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
10
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
11
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
13
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
14
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
15
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! भारताचा सुस्पष्ट संदेश; आता पाकिस्तानने चूक केल्यास...
16
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
17
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
18
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
19
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  

संजय राऊत यूपीएचे प्रवक्ते कधी झाले ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:21 IST

अहमदनगर : संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए)चे अध्यक्ष शरद पवार यांनी व्हावे, असे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे; ...

अहमदनगर : संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए)चे अध्यक्ष शरद पवार यांनी व्हावे, असे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे; पण त्यासाठी संजय राऊत हे यूपीएचे प्रवक्ते कधी झाले? असा सवाल माजी मंत्री व भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. राम शिंदे केला आहे.

प्रा. शिंदे यांनी बुधवारी नगर येथे पत्रकारांशी अनौपचारिकपणे संवाद साधला. ते म्हणाले, राऊत म्हणतात, पवार यांनी यूपीएचे अध्यक्ष व्हावे. पी. चिदंबरम म्हणतात, पवार असे बोललेच नसतील. शरद पवार म्हणाले, बातम्यातून मला हे समजले. यावरून आता संजय राऊत हे यूपीएचे कधी प्रवक्ते झाले, हे पाहण्याची आवश्यकता आहे. मुळात शिवसेना यूपीएचा घटक नाही.

ईडीच्या चौकशीबाबत विचारलेल्या प्रश्नावर प्रा. शिंदे म्हणाले, कंगना रनौतसंदर्भात कारवाई केली, त्यावेळी संजय राऊत यांनी मुंबई महापालिकेच्या कारभारात हस्तक्षेप करत नसल्याचे सांगितले होते. आता ईडी लागल्यावर त्याला ते सद्बुद्धीचे राजकारण असल्याचे सांगतात. धुळ्याचे राजेंद्रकुमार गावित हे भाजपचे नेते असून, त्यांनाही ईडीची नोटीस आली आहे. हेही लक्षात घेतले पाहिजे.

ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करणाऱ्या गावात तीस लाखांचा निधी देण्याची घोषणा आमदार रोहित पवार यांनी केली आहे.

याबाबत शिंदे म्हणाले, हे बक्षीस म्हणजे त्यांनी लोकांना दिलेले प्रलोभन आहे. असे प्रलोभन आचारसंहितेचे उल्लंघन करणारे आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने त्यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी. अशा पद्धतीने निवडणूक बिनविरोध करण्याची प्रथा पडली तर भविष्यात टाटा, बिर्ला आमदार-खासदार होतील. ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होण्यास दुमत नाही. मात्र, ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आमदार हे आचारसंहितेचे उल्लंघन करीत आहेत. सध्या ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी ते पैसे देतात, उद्या पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, महापालिका, खासदार, आमदार यांच्या निवडणुका अशाच बिनविरोध होतील. पवार यांच्या वक्तव्याची राज्य निवडणूक आयोगाने चौकशी करावी, अशी मागणीही शिंदे यांनी केली.