शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
4
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
5
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
6
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
7
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
8
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
9
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
10
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
11
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
12
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
13
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
14
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
15
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
16
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
17
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
18
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
19
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांचे पैसे बुडविणाऱ्यांना तुरुंगवास कधी?

By admin | Updated: April 27, 2016 23:55 IST

लोणी : एफआरपीची रक्कम न देणाऱ्या सहकारी साखर कारखान्यांना सहकार विभाग तुरुगांचा धाक दाखवितो़ पण ज्या खासगी कारखान्यांनी शेतकऱ्यांचे पैसे बुडविले,

लोणी : एफआरपीची रक्कम न देणाऱ्या सहकारी साखर कारखान्यांना सहकार विभाग तुरुगांचा धाक दाखवितो़ पण ज्या खासगी कारखान्यांनी शेतकऱ्यांचे पैसे बुडविले, त्यांना तुरुंगात का धाडत नाही? असा संतप्त सवाल काँगे्रसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे यांनी केला़पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे यांच्या ३६ व्या पुण्यतिथीनिमित्त ते बोलत होते. विखे कारखान्याच्या कार्यस्थळावरील डॉ. धनंजयराव गाडगीळ सभागृहात हा कार्यक्रम झाला़ अध्यक्षस्थानी माजीमंत्री अण्णासाहेब म्हस्के होते. प्रारंभी पद्मश्री विखे यांच्या स्मृतिस्थळावर मान्यवरांनी पुष्पांजली अर्पण केली. याप्रसंगी विखे बोलत होते. राज्यातील शेतकऱ्याला सहकारानेच तारले आहे़ पण या सहकाराबाबत सुरक्षित आणि संघटीत आवाज नसल्याची खंत व्यक्त करताना विखे म्हणाले, सहकारातील माणसेच खासगीचे मालक झाले. खासगी कारखान्यांनी शेतकऱ्यांचे पैसे बुडविले़ सहकार विभाग त्यांच्यावर कारवाई करीत नाही़ पण एफआरपीची रक्कम न देणाऱ्या सहकारी साखर कारखाने चालविणाऱ्यांना तुरुंगाचा धाक दाखवित आहे, असे ते म्हणाले.शेतकऱ्यांचा आत्मविश्वास उंचावण्यासाठी पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे यांनी शेतकरी आणि वारकरी हा एकत्रित विचार समाजापर्यंत पोहचविला, या विचारातूनच समृद्धीचा संस्कारीत मार्ग आपल्याला मिळाला, असे उद्धव महाराज मंडलीक यांनी सांगितले़ यावेळी कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस विनायक देशमुख, सभापती बाबासाहेब दिघे, राजेश परजणे, आबासाहेब खर्डे, एम. एम. पुलाटे, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. अशोक विखे, ट्रक्स वाहतूक सह संस्थेचे अध्यक्ष नंदू राठी, प्रवरा सहकारी बँकेचे अध्यक्ष बाळासाहेब भवर, उपाध्यक्ष अशोक आसावा, धनश्रीताई विखे, प्रवरा फळे भाजीपाला उत्पादक संस्थेच्या अध्यक्षा गीता थेटे आदी उपस्थित होते़प्रवरा उद्योग समूहाच्या वतीने डॉ.सुजय विखे यांनी उद्धव महाराज मंडलीक यांचा सत्कार केला. प्रास्ताविक जि. प. सदस्य डॉ. भास्कर खर्डे यांनी केले. (प्रतिनिधी)शेतकरी आत्महत्येला सावकारकी कारणीभूतपश्चिम वाहिन्यांचे पाणी पूर्वेकडे वळविण्यासाठी युवकांनी आता लोकाभिमुख चळवळ उभी करुन सरकारवर दबाव आणण्याची गरज आहे़ सहकारामुळेच शेतकऱ्यांना आत्मविश्वास मिळाला. पद्मश्री विखे यांनी शेतकऱ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला़ यामुळेच त्यावेळी शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या नाहीत. पण सावकारशाहीने डोके वर काढले आणि शेतकऱ्यांमधील आत्मविश्वास कमी झाला व आत्महत्या होऊ लागल्या़ सरकारने आज उद्योगाचे पाणी बंद केले असले तरी, शेतीला शाश्वत पाणी कुठे आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.