शहरं
Join us  
Trending Stories
1
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
2
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
3
Nitin Shete: नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
4
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
5
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
6
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
7
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
8
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
9
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
10
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
11
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
12
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
13
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
14
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
15
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
16
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
17
Nag Panchami 2025 Upvas: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!
18
बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा!
19
₹३०० वरुन १ रुपयांवर आला 'हा' शेअर; विक्रीसाठी गुंतवणुकदारांची रांग, नकारात्मक बातमीचा परिणाम
20
Mumbai Local: पाऊस नसतानाही लोकलमधून छत्री घेऊन प्रवास, पण कारण काही वेगळच!

शेतकऱ्यांचे पैसे बुडविणाऱ्यांना तुरुंगवास कधी?

By admin | Updated: April 27, 2016 23:55 IST

लोणी : एफआरपीची रक्कम न देणाऱ्या सहकारी साखर कारखान्यांना सहकार विभाग तुरुगांचा धाक दाखवितो़ पण ज्या खासगी कारखान्यांनी शेतकऱ्यांचे पैसे बुडविले,

लोणी : एफआरपीची रक्कम न देणाऱ्या सहकारी साखर कारखान्यांना सहकार विभाग तुरुगांचा धाक दाखवितो़ पण ज्या खासगी कारखान्यांनी शेतकऱ्यांचे पैसे बुडविले, त्यांना तुरुंगात का धाडत नाही? असा संतप्त सवाल काँगे्रसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे यांनी केला़पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे यांच्या ३६ व्या पुण्यतिथीनिमित्त ते बोलत होते. विखे कारखान्याच्या कार्यस्थळावरील डॉ. धनंजयराव गाडगीळ सभागृहात हा कार्यक्रम झाला़ अध्यक्षस्थानी माजीमंत्री अण्णासाहेब म्हस्के होते. प्रारंभी पद्मश्री विखे यांच्या स्मृतिस्थळावर मान्यवरांनी पुष्पांजली अर्पण केली. याप्रसंगी विखे बोलत होते. राज्यातील शेतकऱ्याला सहकारानेच तारले आहे़ पण या सहकाराबाबत सुरक्षित आणि संघटीत आवाज नसल्याची खंत व्यक्त करताना विखे म्हणाले, सहकारातील माणसेच खासगीचे मालक झाले. खासगी कारखान्यांनी शेतकऱ्यांचे पैसे बुडविले़ सहकार विभाग त्यांच्यावर कारवाई करीत नाही़ पण एफआरपीची रक्कम न देणाऱ्या सहकारी साखर कारखाने चालविणाऱ्यांना तुरुंगाचा धाक दाखवित आहे, असे ते म्हणाले.शेतकऱ्यांचा आत्मविश्वास उंचावण्यासाठी पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे यांनी शेतकरी आणि वारकरी हा एकत्रित विचार समाजापर्यंत पोहचविला, या विचारातूनच समृद्धीचा संस्कारीत मार्ग आपल्याला मिळाला, असे उद्धव महाराज मंडलीक यांनी सांगितले़ यावेळी कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस विनायक देशमुख, सभापती बाबासाहेब दिघे, राजेश परजणे, आबासाहेब खर्डे, एम. एम. पुलाटे, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. अशोक विखे, ट्रक्स वाहतूक सह संस्थेचे अध्यक्ष नंदू राठी, प्रवरा सहकारी बँकेचे अध्यक्ष बाळासाहेब भवर, उपाध्यक्ष अशोक आसावा, धनश्रीताई विखे, प्रवरा फळे भाजीपाला उत्पादक संस्थेच्या अध्यक्षा गीता थेटे आदी उपस्थित होते़प्रवरा उद्योग समूहाच्या वतीने डॉ.सुजय विखे यांनी उद्धव महाराज मंडलीक यांचा सत्कार केला. प्रास्ताविक जि. प. सदस्य डॉ. भास्कर खर्डे यांनी केले. (प्रतिनिधी)शेतकरी आत्महत्येला सावकारकी कारणीभूतपश्चिम वाहिन्यांचे पाणी पूर्वेकडे वळविण्यासाठी युवकांनी आता लोकाभिमुख चळवळ उभी करुन सरकारवर दबाव आणण्याची गरज आहे़ सहकारामुळेच शेतकऱ्यांना आत्मविश्वास मिळाला. पद्मश्री विखे यांनी शेतकऱ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला़ यामुळेच त्यावेळी शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या नाहीत. पण सावकारशाहीने डोके वर काढले आणि शेतकऱ्यांमधील आत्मविश्वास कमी झाला व आत्महत्या होऊ लागल्या़ सरकारने आज उद्योगाचे पाणी बंद केले असले तरी, शेतीला शाश्वत पाणी कुठे आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.