शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही जगायचं की नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगावं"; लक्ष्मण हाकेंचा संतप्त सवाल, हल्ल्याचा सगळा घटनाक्रम सांगितला
2
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
3
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे
4
'आज आपण संघाची सुरुवात करत आहोत', ना कुठली घोषणा, ना कुठले अतिथी; शंभर वर्षांअगोदर अशी झाली संघाची सुरवात
5
३० फेब्रुवारीला काढलं बिल, सिमेंटच्या दुकानातून कॉस्मेटिक्सची खरेदी, सरकारी भ्रष्टाचाराची हद्द  
6
३० टक्क्यांनी घसरलाय हा मल्टीबॅगर स्टॉक, अजून घसरण होणार का? काय म्हणताहेत एक्सपर्ट
7
Himanshi Tokas : लय भारी! हिमांशी टोकस ठरली जगातील नंबर १ ज्युडो खेळाडू; आजीच्या झाडूने बनवलं चॅम्पियन
8
बरेली हिंसाचार प्रकरण; मौलाना तौकीर रजाला अटक, 14 दिवसांची पोलीस कोठडी, 10 FIR दाखल
9
Laxman Hake: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला, अहिल्यानगरमध्ये कारवर दगडफेक, काठ्या मारल्या
10
"लेखनात काही चूक असल्यास..., नेमके प्रसंग आणि घटना निर्देशित कराव्यात!"; संभाजी ब्रिगेडच्या आक्षेपांवर विश्वास पाटील स्पष्टच बोलले
11
Beed Crime: "मैं तो छूट जाऊंगा लेकीन तेरा...", हत्या झालेल्या तरुणाचा वाल्मिक कराडसोबतचा व्हिडीओ व्हायरल
12
अदानी समूह करणार 'सहारा'च्या ८८ मालमत्तांची खरेदी? भारतातला सर्वात मोठा प्रॉपर्टी करार होण्याची शक्यता
13
५ ग्रहांचे गोचर, ५ राजयोग: १० राशींचे दसरा-दिवाळी दणक्यात, धनलक्ष्मी पैसा देणार, भरपूर लाभ!
14
अमानुष! आईसमोरच ५ वर्षांच्या लेकाची निर्घृण हत्या, काळीज पिळवटून टाकणारी घटना
15
Tarot Card: टॅरो कार्डनुसार आगामी आठवडा संमिश्र घटनांचा; श्रद्धा-सबुरीने वागा, शुभ घडेल!
16
चुकीच्या आजाराचं निदान, सुई टोचली आणि कॅन्सर संपूर्ण शरीरात पसरला; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
17
सर्जरी करताना ऑपरेशन थिएटरच्या छताचं प्लास्टर कोसळलं; डॉक्टरने शेअर केला शॉकिंग Video
18
Kolhapur: अंबाबाई मंदिरात भाविकांची उच्चांकी गर्दी, मणिकर्णिका कुंडाजवळ चेंगराचेंगरीसदृश्य परिस्थिती -video
19
Navaratri 2025: कुमारिका पूजेसाठी योग्य तिथी आणि 'या' वयोगटातील मुलींना निवडा!
20
Indusind बँकेत १० वर्षांपासून सुरू होता अकाऊंटिंगच्या अनियमिततेचा खेळ; माजी CFO चा गौप्यस्फोट

शेतकऱ्यांचे पैसे बुडविणाऱ्यांना तुरुंगवास कधी?

By admin | Updated: April 27, 2016 23:55 IST

लोणी : एफआरपीची रक्कम न देणाऱ्या सहकारी साखर कारखान्यांना सहकार विभाग तुरुगांचा धाक दाखवितो़ पण ज्या खासगी कारखान्यांनी शेतकऱ्यांचे पैसे बुडविले,

लोणी : एफआरपीची रक्कम न देणाऱ्या सहकारी साखर कारखान्यांना सहकार विभाग तुरुगांचा धाक दाखवितो़ पण ज्या खासगी कारखान्यांनी शेतकऱ्यांचे पैसे बुडविले, त्यांना तुरुंगात का धाडत नाही? असा संतप्त सवाल काँगे्रसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे यांनी केला़पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे यांच्या ३६ व्या पुण्यतिथीनिमित्त ते बोलत होते. विखे कारखान्याच्या कार्यस्थळावरील डॉ. धनंजयराव गाडगीळ सभागृहात हा कार्यक्रम झाला़ अध्यक्षस्थानी माजीमंत्री अण्णासाहेब म्हस्के होते. प्रारंभी पद्मश्री विखे यांच्या स्मृतिस्थळावर मान्यवरांनी पुष्पांजली अर्पण केली. याप्रसंगी विखे बोलत होते. राज्यातील शेतकऱ्याला सहकारानेच तारले आहे़ पण या सहकाराबाबत सुरक्षित आणि संघटीत आवाज नसल्याची खंत व्यक्त करताना विखे म्हणाले, सहकारातील माणसेच खासगीचे मालक झाले. खासगी कारखान्यांनी शेतकऱ्यांचे पैसे बुडविले़ सहकार विभाग त्यांच्यावर कारवाई करीत नाही़ पण एफआरपीची रक्कम न देणाऱ्या सहकारी साखर कारखाने चालविणाऱ्यांना तुरुंगाचा धाक दाखवित आहे, असे ते म्हणाले.शेतकऱ्यांचा आत्मविश्वास उंचावण्यासाठी पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे यांनी शेतकरी आणि वारकरी हा एकत्रित विचार समाजापर्यंत पोहचविला, या विचारातूनच समृद्धीचा संस्कारीत मार्ग आपल्याला मिळाला, असे उद्धव महाराज मंडलीक यांनी सांगितले़ यावेळी कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस विनायक देशमुख, सभापती बाबासाहेब दिघे, राजेश परजणे, आबासाहेब खर्डे, एम. एम. पुलाटे, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. अशोक विखे, ट्रक्स वाहतूक सह संस्थेचे अध्यक्ष नंदू राठी, प्रवरा सहकारी बँकेचे अध्यक्ष बाळासाहेब भवर, उपाध्यक्ष अशोक आसावा, धनश्रीताई विखे, प्रवरा फळे भाजीपाला उत्पादक संस्थेच्या अध्यक्षा गीता थेटे आदी उपस्थित होते़प्रवरा उद्योग समूहाच्या वतीने डॉ.सुजय विखे यांनी उद्धव महाराज मंडलीक यांचा सत्कार केला. प्रास्ताविक जि. प. सदस्य डॉ. भास्कर खर्डे यांनी केले. (प्रतिनिधी)शेतकरी आत्महत्येला सावकारकी कारणीभूतपश्चिम वाहिन्यांचे पाणी पूर्वेकडे वळविण्यासाठी युवकांनी आता लोकाभिमुख चळवळ उभी करुन सरकारवर दबाव आणण्याची गरज आहे़ सहकारामुळेच शेतकऱ्यांना आत्मविश्वास मिळाला. पद्मश्री विखे यांनी शेतकऱ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला़ यामुळेच त्यावेळी शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या नाहीत. पण सावकारशाहीने डोके वर काढले आणि शेतकऱ्यांमधील आत्मविश्वास कमी झाला व आत्महत्या होऊ लागल्या़ सरकारने आज उद्योगाचे पाणी बंद केले असले तरी, शेतीला शाश्वत पाणी कुठे आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.