शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

उद्योगांचे चाक मंदावले, कामगारांना काम मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:20 IST

अहमदनगर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या ‘ब्रेक द चेन’मुळे मोठी शहरे बंद असल्याने जिल्ह्यातील कारखान्यांचे उत्पादन निम्म्याने घटले असून, ...

अहमदनगर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या ‘ब्रेक द चेन’मुळे मोठी शहरे बंद असल्याने जिल्ह्यातील कारखान्यांचे उत्पादन निम्म्याने घटले असून, कामगारांच्या हाताला काम राहिले नाही. मोठ्या कारखान्यांनी कामगारांना सुट्या दिल्या आहेत. त्यामुळे हे कामगारही घरीच बसून आहेत.

जिल्ह्यात बोटावर मोजण्याइतकचे मोठे कारखाने आहेत. मोठ्या कारखान्यांना सुटे भाग पुरविणारे अनेक लहान कारखाने आहेत. मोठ्या कारखान्यांचे उत्पादन घटल्याने या कारखान्यांवर अवलंबून असणारे कारखान्यांचे उत्पादन घटले आहे. लहान कारखाने मुंबई व दिल्ली येथून कच्चा माल आणतात; परंतु ही शहरे सध्या बंद असल्याने कच्चा माल मिळत नाही. कच्च्या मालाचे दरही मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. मोठ्या कंपन्यांकडून मालाची मागणी होते; परंतु त्या प्रमाणात पुरवठा करणे लहान कारखान्यांना शक्य नाही. त्यामुळे त्यांनी मागणीनुसारच उत्पादन करण्यावर भर दिला असून, कामगारांच्या हाताला काम राहिले नाही. गेल्या वर्षभरापासून उत्पादनात घट झालेली असल्याने कामगारांना पगार देणे, आजारासाठी उचल देणे, यामुळे उद्योजकांना अशक्य झाले असून, दररोज कोणत्या ना कोणत्या कारखान्यात पॉझिटिव्ह रुग्ण सापडत असल्याने अनेक कामगार कामावर येत नाहीत. कामगारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे काही कारखान्यांना कामगार मिळेनासे झाले आहेत. कामगारांअभावी उत्पादन कमी करण्यात आल्याचे काही उद्योजकांचे म्हणणे आहे.

.....

जिल्ह्यातील एकूण कारखाने

९५०

...

एकूण कामगार

५०,०००

....

८० टक्के कारखाने सुरू

जिल्ह्यातील नागापूर, सुपा, नेवासा, श्रीरामपूर, केडगाव औद्योगिक वसाहतीतील ८० टक्के कारखाने सुरू आहेत. शासनाचे नियम पाळून कारखाने सुरू आहेत. कामगारांची गेटवर दररोज आरोग्य तपासणी केली जात असून, आजारी कामगारांना सुटी देण्यात येत आहे. इतर कामगारांना संसर्ग होऊ नये यासाठी कारखाना व्यवस्थापनाकडून काळजी घेतली जात आहे.

....

- जिल्ह्यातील बहुतांश कारखाने सुरू आहेत; परंतु कच्चा माल मिळत नसल्याने उत्पादन २५ टक्क्यांवर आले आहे. त्यामुळे उद्योजक अडचणीत आले असून, कोरोनामुळे कामगारही मिळत नाहीत. कामगारांना कोरोनाची लागण होत असल्याने नियमांचे पालन करून कारखाने सुरू आहेत.

- राजेंद्र कटारिया, अध्यक्ष, आमी संघटना

.....

- मोठ्या कारखान्यांना सुटे भाग पुरविणाऱ्या लहान कारखान्यांची संख्या नगरमध्ये जास्त आहे. मोठे कारखाने सुरू आहेत. त्यांच्याकडून मागणी होत आहे; परंतु कच्चा माल मिळत नाही. मुंबई पूर्णपणे बंद असल्यामुळे कच्चा मिळत नाही आणि मिळालाच तर दर कमालीचे वाढलेले आहेत. त्यामुळे उत्पादनात घट झाली असून, उद्योजकांचे अर्थचक्र पूर्णपणे कोलमडले आहे.

- संजय बंधिष्टी, सचिव, आमी संघटना

....

कारखान्यांत तयार झालेल्या मालाला मागणी नाही. त्यामुळे कारखान्यांचे उत्पादन घटले असून, कामगारांना सुट्या दिल्या जात आहेत. सुटीच्या काळातील अर्धा पगार दिला जात आहे; परंतु कारखान्यांकडून तोही दिला जात नसल्याने कामगारांसमोर रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे.

- कामगार

.....

कारखान्यांनी उत्पादन बंद केल्याने हाताला काम राहिले नाही. गेल्या महिनाभरापासून घरी बसून आहोत. त्यामुळे घर कसे चालवायचे असा प्रश्न आहे.

- कामगार

....

कॉपर, स्टीलचे दर वाढले

मोठ्या कारखान्यांना माल पुरविण्यासाठी कच्चा माल लागतो. नगरमध्ये मुंबई शहरातून कच्चा माल येतो; परंतु सध्या मुंबई बंद आहे. त्यामुळे कच्च्या मालाचे दर वाढले आहेत. स्टील प्रतिकिलो ६० ते ६५ रुपये दराने खरेदी करावे लागत आहे. इतर कच्च्या मालाच्या किमती वाढल्या असून, उत्पादन करणे खर्चिक झाले आहे. त्यामुळे उद्योजकांचे अर्थचक्र काेलमडले असून, ‘ब्रेक द चेन’मुळे उद्योग क्षेत्र अडचणीत सापडले आहे.

......