शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
5
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
6
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
7
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
8
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
9
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
10
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
11
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
12
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
13
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
14
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
15
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
16
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
17
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
18
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
19
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
20
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला

वाळू उपशाविरुद्ध आंदोलनांच्या इशाऱ्यांचे पुढे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:21 IST

श्रीरामपूर : जिल्ह्यात भीमा, मुळा, प्रवरापासून नगर मराठवाड्याच्या हद्दीतील गोदावरी नदी बेकायदा वाळू उपशामुळे जर्जर झाली. मात्र, या विरोधात ...

श्रीरामपूर : जिल्ह्यात भीमा, मुळा, प्रवरापासून नगर मराठवाड्याच्या हद्दीतील गोदावरी नदी बेकायदा वाळू उपशामुळे जर्जर झाली. मात्र, या विरोधात कुणीही राजकीय नेता व सामाजिक कार्यकर्ते निर्णायक आंदोलनाची लढाई लढताना दिसत नाहीत. केवळ आंदोलनाचा इशारा द्यायचा आणि प्रत्यक्षात कोणतीही कृती करायची नाही, असाच सर्व प्रकार सुरू आहे. त्यामुळे प्रशासनही बेफिकीरपणे वाळू उपशाविरुद्ध मौन पाळत आहे.

राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर, तसेच श्रीरामपूर तालुक्यातील मातुलठाण येथील वाळूचा लिलाव वादग्रस्त ठरला. बारागाव नांदूर येथे गावातील महिलेच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न झाला होता, तर दुसरीकडे मातुलठाण येथे अधिकृत लिलावापेक्षा कितीतरी अधिक उपसा करण्यात आला. जेसीबी व पोकलेनच्या मदतीने अद्यापही तेथे वाळू उपसा सुरू आहे. तालुका पोलिसांनी येथे २८ मार्च २०२१ रोजी मध्यरात्री कारवाई करून जेसीबी व पोकलेन ताब्यात घेतले होते. याप्रकरणी पाच आरोपींना गजाआड करून एक कोटी ८३ लाख ५० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. मात्र, महसूल विभागाने डोळ्यावर पट्टी ठेवली.

दरम्यान, या दोन्हीही ठिकाणी होणाऱ्या वाळू उपशाविरुद्ध काही सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. अनेकांनी तसे पत्रक प्रसिद्ध केले होते. नगर दक्षिणचे भाजप खासदार डॉ. सुजय विखे यांनी पत्रकार परिषदेत जिल्ह्यातील वाळू उपशाविरुद्ध उपोषण करणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र, त्यानंतर खासदार डॉ. विखे यांनी कोणतेही आंदोलन हाती घेतले नाही किंवा त्यांच्या समर्थकांनीही वाळूविरुद्धच्या आंदोलनात उडी घेतली नाही. केवळ आंदोलनाचा इशारा, निवेदने व माध्यमातून मिळणारी प्रसिद्धी यापलीकडे जिल्ह्यात बेकायदा वाळू उपशाविरुद्ध कोणीही रणशिंग फुंकलेले नाही. प्रशासनाने निवेदनांची दखल घेतली नाही. काही अपवाद वगळता जिल्ह्यात कोणीही याप्रश्नी न्यायालयाचे दरवाजे ठोठावलेले नाही. त्यामुळे अशा काही कार्यकर्त्यांच्या निवेदनांच्या हेतूवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

---

जिल्ह्यातील कोणत्याही तालुक्यातील कोणी कार्यकर्ते जर वाळू उपसा, दारू विक्री व अन्य सामाजिक प्रश्नांसाठी न्यायालयीन लढाई लढू इच्छित असेल, तर त्यांच्या वकिलांची फी भरण्याची लोकजागृती सामाजिक संस्थेची तयारी आहे. याशिवाय जनहित याचिकेसाठी मार्गदर्शन करण्यास आम्ही तयार आहोत. टँकर घोटाळा, पोलीस ठाण्याचे सुशोभीकरण, बेकायदा वाळू उपसा आदी सामाजिक प्रश्नांवर आम्ही उच्च न्यायालयात तब्बल १२ याचिका दाखल केलेल्या आहेत.

-रामदास घावटे, बबन कवाद, सामाजिक कार्यकर्ते, पारनेर.