शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
3
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
4
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
5
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
6
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
7
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
8
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
9
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
10
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
11
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
12
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
13
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
14
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
15
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
16
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
17
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
18
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
19
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
20
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!

श्रीगोंद्याच्या प्रचारात नेते भाषणे काय करणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2019 10:56 IST

श्रीगोंदा नगरपरिषदेच्या निवडणुकीत तेच ते राजकीय नेते आमनेसामने आहेत. शहराच्या विकासाच्या मुद्यापेक्षा हे नेते एकमेकांची उणीदुणी काढत चिखलफेक करत आहेत.

गोरख देवकरअहमदनगर : श्रीगोंदा नगरपरिषदेच्या निवडणुकीत तेच ते राजकीय नेते आमनेसामने आहेत. शहराच्या विकासाच्या मुद्यापेक्षा हे नेते एकमेकांची उणीदुणी काढत चिखलफेक करत आहेत. पालिकेच्या निवडणुकीत नेत्यांनी एकमेकांच्या कारखान्यांची चर्चा सुरु केली आहे. त्यामुळे शहरवासीय वैतागलेले दिसतात.नगराध्यक्ष असलेले मनोहर पोटे हे काँग्रेसमध्ये दाखल झाले आहेत. त्यामुळे दोन्ही काँग्रेसची प्रचारात अडचण होऊन बसली आहे. नगरपरिषदेने विकास केला नाही, असा आरोप केला तर त्याची जबाबदारी पोटे यांच्यावरही निश्चित होते. त्यामुळे गत पंचवार्षिकला शहरात विकास झाला नाही, असे म्हणण्याची या पक्षांना सोय राहिलेली नाही. पोटे यांनी ही अडचण ओळखत ‘नगरपरिषदेची सगळी टेंडर काष्टीला फायनल होतात’, अशी टीका केली. आपल्याऐवजी बबनराव पाचपुते हेच कारभार करत होते, असा त्यांच्या आरोपाचा रोख आहे. पण, नगराध्यक्ष असताना ते हा मुद्दा कधीही बोलले नव्हते. बबनराव पाचपुते हेही गत पंचवार्षिकच्या कारभाराची तारीफ कशी करणार ? हा प्रश्न आहे. कारण, विकास झाला असे त्यांचे म्हणणे असेल तर त्याचे श्रेय त्यांना पोटे यांनाही द्यावे लागेल.या सर्व प्रचारात जनतेची करमणूक होण्याची चिन्हे आहेत. श्रीगोंद्याचे राजकारण पाचपुते, नागवडे, जगताप या ठराविक घराण्यांभोवतीच फिरते. याही निवडणुकीत तेच ते चेहरे समोर आले आहेत. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांपेक्षा या नेत्यांचीच चर्चा अधिक आहे.बाळासाहेब नाहाटा हे सतत रंग बदलतात. यावेळी ते पाचपुते यांच्या कळपात गेले आहेत. बाबासाहेब भोस हे आता राष्टÑवादीत आले आहेत. त्यांनी आता आमदार जगताप यांचे गोडवे गायला सुरुवात केली आहे. यापूर्वी ते त्यांच्यावर टीका करत होते. जनता या पक्षांतरांकडे कशी बघते याची उत्सुकता आहे. तीच ती जातीय समीकरणेही पुन्हा निवडणुकीत आली आहेत.निवडणुकीत पैशांची उड्डाणे आतापासूनच सुरु झाली आहेत. कुठल्याही पक्षाला ही निवडणूक सोपी नाही, असे अर्ज माघारीपर्यंतचे चित्र आहे. विश्वास कोणावर ठेवायचा? या पेचात मतदार दिसतात. शहरापेक्षा बाहेरच्या नेत्यांनीच निवडणुकीत मोठा गलका केला आहे.....तर तिसऱ्या आघाडीचे आव्हानसंभाजी ब्रिगेड, प्रहार या संघटनाही या निवडणुकीत उतरल्या आहेत. संभाजी ब्रिगेडने नगराध्यक्षपद पदासाठी मुस्लिम चेहरा रिंगणात उतरविला आहे. ही उमेदवारी कायम राहिली तर मुस्लिम मते कुणाच्या मागे एकवटणार? हाही मुद्दा महत्त्वाचा राहील. आम्ही गत पंधरा वर्षांचा शहराचा ताळेबंद लोकांसमोर मांडणार असल्याचा तिसºया आघाडीचा नारा आहे. त्यामुळे आघाडीही निवडणुकीची रंगत वाढवू शकते.नगरपरिषदेत कारखान्यांचे बॉयलर पेटलेच्निवडणूक नगरपरिषदेची व चर्चा साखर कारखान्यांची असे स्वरुप आले आहे. नागवडे यांनी मराठवाड्यात खासगी साखर कारखाना विकत घेतला असून श्रीगोंद्याचे साहित्य तिकडे नेले, अशी टीका पाचपुते यांनी केली आहे. काँग्रेस आता पाचपुते यांच्या कारखान्यांच्या थकबाकीचा मुद्दा प्रचारात आणेल. कुकडी कारखान्याबाबत तक्रारी झालेल्या असल्याने तोही मुद्दा प्रचारात येऊ शकतो. नगरपरिषद बाजूला राहून अशापद्धतीने कारखान्यांचेच बॉयलर पेटण्याचा धोका आहे.श्रीगोंदा नगरपरिषदेच्या परखड विश्लेषणासाठी वाचत रहा लोकमत

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदा