शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
2
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
3
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
4
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
5
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
6
Elphinstone Bridge: एल्फिस्टन पूल बंद होताच एसटीचे भाडे वाढले, आता तिकीट किती रुपयांनी महागले?
7
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
8
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
9
"लढली ती...पण शेवटी कॅन्सरने तिचा घास घेतला", सुबोध भावेने सांगितल्या प्रिया मराठेच्या आठवणी
10
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
11
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!
12
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
13
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
14
पत्नीला पळवून नेल्याचा राग अनावर झाला; कोल्हापुरात पतीने घरात घुसून तरुणाला संपवला
15
कुजबुज: मोहित कंबोज यांचा संन्यास, सरनाईकांची टेस्ला खरेदी अन् बरंच काही...
16
Elphinstone Bridge: प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील पुलावर अखेर 'हातोडा', पाडकामास प्रचंड बंदोबस्तात सुरूवात
17
अरे बापरे! घरात २ जण अन् १.६५ लाख लीटर पाण्याचं आलं बिल; भाडेकरूने मांडली व्यथा
18
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
19
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
20
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी

सरपंच-उपसरपंचांना काय मिळणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:19 IST

अहमदनगर : जिल्ह्यातील सरपंच- उपसरपंचांच्या निवडी पार पडल्या. आता या सरपंचांना काय मिळणार? याबाबत सामान्य लोकांमध्ये उत्सुकता आहे. सरपंचांना ...

अहमदनगर : जिल्ह्यातील सरपंच- उपसरपंचांच्या निवडी पार पडल्या. आता या सरपंचांना काय मिळणार? याबाबत सामान्य लोकांमध्ये उत्सुकता आहे. सरपंचांना ३ ते ५ हजार रुपये तर उपसरपंचांना १ ते२ हजार रुपये मानधन मिळणार? आहे. सदस्य म्हणून निवडून आलेल्यांना मात्र केवळ चहा-पाण्यावरच समाधान मानावे लागणार आहे.

जिल्ह्यात ७६७ ग्रामपंचायतीसाठी निवडणूक जाहीर झाली होती. त्यापैकी ९ ग्रामपंचायतींमधील पदे रिक्त असून उर्वरित ७५९ गावांमध्ये सरपंच-उपसरपंच निवड प्रक्रिया पार पडली आहे. त्यामुळे सरपंच-उपसरपंचांना नक्की काय मिळते, याबाबत गावपातळीवर चांगलीच चर्चा आहे. पूर्वी फक्त सरपंचांनाच मानधन मिळत होते. तेही कमीत कमी एक हजार व जास्तीत जास्त २ हजार रुपये मानधन मिळायचे. राज्य सरकारने ३० जुलै २०१९ च्या आदेशान्वये सरपंचांच्या मानधनात जवळपास तिपटीने वाढ केली. यासोबतच उपसरपंचांनाही मानधन देण्याचे जाहीर केले. त्यावेळी तत्कालीन सरकारने या मानधनासाठी अर्थसंकल्पात दोनशे कोटी रुपयांची तरतूद केली होती. महाराष्ट्रातील सरपंच संघटना व लोकप्रतिनिधी यांनी वेळोवेळी केलेल्या मागणीनुसार तसेच महागाई निर्देशांकात झालेली वाढ, सरपंचांच्या कर्तव्यात झालेली वाढ विचारात घेऊन सरपंच मानधनात वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. ग्रामपंचायतीची लोकसंख्यानिहाय वर्गवारी विचारात घेऊन सरपंच ग्रामनिधीतून दरमहा सरपंचांना मानधन देण्यात येते. २०१९ पूर्वी २ हजारपर्यंत लोकसंख्येच्या ग्रामपंचायती असलेल्या सरपंचांना एक हजार रुपये व आठ हजार लोकसंख्येपर्यंत दीड हजार आणि आठ हजारापेक्षा जास्त लोकसंख्येच्या गावच्या सरपंचांना दोन हजार रुपये मानधन दिले जात होते. आता या मानधनात वाढ झाली असून नव्याने सरपंच-उपसरपंच झालेल्यांना हे मानधन मिळणार आहे. या मानधनातील ७५ टक्के रक्कम शासन अनुदानातून तर २५ टक्के रक्कम ग्रामपंचायत स्वनिधीमधून दिली जाते. ग्रामपंचायत सदस्यांना मात्र केवळ २०० ते ३०० रुपये बैठक भत्ता व चहापाणी एवढ्यावरच समाधान मानावे लागते.

------------

असे मिळते दरमहा मानधन

लोकसंख्यानिहाय ग्रामपंचायती सरपंचांना- उपसरपंचांना मिळणारे मानधन

० ते २००० लोकसंख्या ३००० रुपये १००० रुपये

२००१ ते ८००० पर्यंत लोकसंख्या ४००० रुपये १५०० रुपये

८ हजारांपेक्षा जास्त लोकसंख्या ५००० रुपये २००० रुपये

-------------------------

सरपंचांना दरमहा सद्या लोकसंख्येच्या निकषानुसार ३ ते ५ हजार रुपये मानधन मिळते. सरपंचांना ज्या समस्यांना सामारे जावे लागते, त्या समस्या लोकसंख्येनुसार नसतात. त्यामुळे सरपंचांना लोकसंख्येनिहाय नव्हे तर सरसकट १० हजार रुपये मानधन देण्यात यावे, अशी आमची मागणी आहे. हीच मागणी आम्ही सरकारकडे करणार आहोत. गावातील करवसुली व्हावी, या उद्देशाने मानधनातील २५ टक्के रक्कम स्वनिधीतून देण्याबाबत आमची काहीही हरकत नाही.

-अनिल गिते, राज्य उपाध्यक्ष, सरपंच परिषद