शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
6
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
7
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
9
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
10
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
11
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
12
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
13
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
14
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
15
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
16
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
17
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
18
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
19
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

सरपंच-उपसरपंचांना काय मिळणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:19 IST

अहमदनगर : जिल्ह्यातील सरपंच- उपसरपंचांच्या निवडी पार पडल्या. आता या सरपंचांना काय मिळणार? याबाबत सामान्य लोकांमध्ये उत्सुकता आहे. सरपंचांना ...

अहमदनगर : जिल्ह्यातील सरपंच- उपसरपंचांच्या निवडी पार पडल्या. आता या सरपंचांना काय मिळणार? याबाबत सामान्य लोकांमध्ये उत्सुकता आहे. सरपंचांना ३ ते ५ हजार रुपये तर उपसरपंचांना १ ते२ हजार रुपये मानधन मिळणार? आहे. सदस्य म्हणून निवडून आलेल्यांना मात्र केवळ चहा-पाण्यावरच समाधान मानावे लागणार आहे.

जिल्ह्यात ७६७ ग्रामपंचायतीसाठी निवडणूक जाहीर झाली होती. त्यापैकी ९ ग्रामपंचायतींमधील पदे रिक्त असून उर्वरित ७५९ गावांमध्ये सरपंच-उपसरपंच निवड प्रक्रिया पार पडली आहे. त्यामुळे सरपंच-उपसरपंचांना नक्की काय मिळते, याबाबत गावपातळीवर चांगलीच चर्चा आहे. पूर्वी फक्त सरपंचांनाच मानधन मिळत होते. तेही कमीत कमी एक हजार व जास्तीत जास्त २ हजार रुपये मानधन मिळायचे. राज्य सरकारने ३० जुलै २०१९ च्या आदेशान्वये सरपंचांच्या मानधनात जवळपास तिपटीने वाढ केली. यासोबतच उपसरपंचांनाही मानधन देण्याचे जाहीर केले. त्यावेळी तत्कालीन सरकारने या मानधनासाठी अर्थसंकल्पात दोनशे कोटी रुपयांची तरतूद केली होती. महाराष्ट्रातील सरपंच संघटना व लोकप्रतिनिधी यांनी वेळोवेळी केलेल्या मागणीनुसार तसेच महागाई निर्देशांकात झालेली वाढ, सरपंचांच्या कर्तव्यात झालेली वाढ विचारात घेऊन सरपंच मानधनात वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. ग्रामपंचायतीची लोकसंख्यानिहाय वर्गवारी विचारात घेऊन सरपंच ग्रामनिधीतून दरमहा सरपंचांना मानधन देण्यात येते. २०१९ पूर्वी २ हजारपर्यंत लोकसंख्येच्या ग्रामपंचायती असलेल्या सरपंचांना एक हजार रुपये व आठ हजार लोकसंख्येपर्यंत दीड हजार आणि आठ हजारापेक्षा जास्त लोकसंख्येच्या गावच्या सरपंचांना दोन हजार रुपये मानधन दिले जात होते. आता या मानधनात वाढ झाली असून नव्याने सरपंच-उपसरपंच झालेल्यांना हे मानधन मिळणार आहे. या मानधनातील ७५ टक्के रक्कम शासन अनुदानातून तर २५ टक्के रक्कम ग्रामपंचायत स्वनिधीमधून दिली जाते. ग्रामपंचायत सदस्यांना मात्र केवळ २०० ते ३०० रुपये बैठक भत्ता व चहापाणी एवढ्यावरच समाधान मानावे लागते.

------------

असे मिळते दरमहा मानधन

लोकसंख्यानिहाय ग्रामपंचायती सरपंचांना- उपसरपंचांना मिळणारे मानधन

० ते २००० लोकसंख्या ३००० रुपये १००० रुपये

२००१ ते ८००० पर्यंत लोकसंख्या ४००० रुपये १५०० रुपये

८ हजारांपेक्षा जास्त लोकसंख्या ५००० रुपये २००० रुपये

-------------------------

सरपंचांना दरमहा सद्या लोकसंख्येच्या निकषानुसार ३ ते ५ हजार रुपये मानधन मिळते. सरपंचांना ज्या समस्यांना सामारे जावे लागते, त्या समस्या लोकसंख्येनुसार नसतात. त्यामुळे सरपंचांना लोकसंख्येनिहाय नव्हे तर सरसकट १० हजार रुपये मानधन देण्यात यावे, अशी आमची मागणी आहे. हीच मागणी आम्ही सरकारकडे करणार आहोत. गावातील करवसुली व्हावी, या उद्देशाने मानधनातील २५ टक्के रक्कम स्वनिधीतून देण्याबाबत आमची काहीही हरकत नाही.

-अनिल गिते, राज्य उपाध्यक्ष, सरपंच परिषद