शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : आनंदाची बातमी! या राज्यांमध्ये मान्सूनचे दमदार आगमन; मुसळधार पावसाचा इशारा, महाराष्ट्रात कधी येणार?
2
मोदींच्या नेतृत्वात एनडीएचे जोरदार शक्तीप्रदर्शन; २० मुख्यमंत्री, १७ उपमुख्यमंत्री बैठकीला हजर...
3
'जोपर्यंत हिंदू स्वतः मजबूत होत नाही, तोपर्यंत...', RSS प्रमुख मोहन भागवत यांची स्पष्टोक्ती
4
सोन्याच्या तेजीचा फायदा घ्यायचाय? दागिन्यांऐवजी नाणे खरेदी करा; 'हे' आहेत ८ मोठे फायदे
5
...ती पोस्ट नडली, तेजप्रताप यादव यांची RJDमधून हकालपट्टी, वडील लालूप्रसाद यादव यांनी केली कारवाई
6
Harsha Richhariya : “महाकुंभमुळे माझं आयुष्य पूर्णपणे बदललं, कधी कल्पनाही...”; असं का म्हणाली हर्षा रिछारिया?
7
भयावह! शेकडो ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला, १३ जणांचा मृत्यू
8
महिलांसाठी खुशखबर! पोस्ट ऑफिसच्या 'या' ५ योजनांमध्ये करा गुंतवणूक, बँकांपेक्षाही जास्त व्याज आणि सुरक्षित भविष्य!
9
एअरटेलच्या वारसदाराने युके सोडले! श्रीमंतावर कर लादला म्हणून? अरबांच्या देशात शिफ्ट झाले...
10
"१० वर्षांपूर्वी माझा घटस्फोट झाला, त्यानंतर...", Divorce बद्दल अपूर्वा नेमळेकरचं भाष्य, म्हणाली- "मी अजूनही सिंगल..."
11
पाकिस्तानच्या २ गद्दारांना अमेरिकेतून अटक, बनावट कंपनीच्या नावाखाली सरकारलाही फसवत होते!
12
वरमाला घालतेवेळी नवऱ्याचे हात पाहून नवरीला आला संशय! संतापत लग्न करण्यास दिला नकार
13
फक्त हॉटेल्सच नाही, आता तुमचं घरही 'ओयो' भाड्याने देणार! कंपनीचा 'हा' प्लॅन ठरणार गेम चेंजर?
14
हुंड्यासाठी तगादा, चारचाकी गाडीची मागणी..! त्रासलेल्या विवाहितेचा टोकाचा निर्णय
15
अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या पथकावर साधूने त्रिशूळाने केला हल्ला, एक पोलीस अधिकारी जखमी   
16
शनैश्चर जयंती: ३ राशींची साडेसाती, शनिला प्रसन्न करण्याची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा उपासना
17
एक-एक करत 3 गाड्या उडवल्या; पाकिस्तानी सैन्यावर दहशतवादी हल्ला, 32 जवानांचा मृत्यू
18
Narendra Modi : "ऑपरेशन सिंदूर हे फक्त मिशन नाही, बदलत्या भारताचं चित्र"; पंतप्रधान मोदींनी केलं सैन्याचं कौतुक
19
शनि जयंती: तुमची रास कोणती? राशीनुसार ‘हे’ उपाय करा, शनिच्या अशुभ प्रभावातून मुक्तता मिळवा!

ग्रामपंचायत सदस्यपदाचा उपयोग आहे तरी काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:34 IST

दहिगावने : ग्रामपंचायत निवडणुकांनी ग्रामीण भाग ढवळून निघाला. निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर सामाजिक वातावरणात काहीशी शांतता जाणवली. परंतु, सरपंचपदाचे आरक्षण ...

दहिगावने : ग्रामपंचायत निवडणुकांनी ग्रामीण भाग ढवळून निघाला. निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर सामाजिक वातावरणात काहीशी शांतता जाणवली. परंतु, सरपंचपदाचे आरक्षण जाहीर होताच पुन्हा मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. ठरावीक प्रवर्गासाठी सरपंचपद राखीव झाल्याने अनेकांचे सरपंचपदाचे स्वप्न भंग पावले आहे. मग आता ग्रामपंचायत सदस्य पदाचा उपयोग आहे तरी काय? अशी खंत सरपंचपद मिळत नसलेल्या सदस्यांमधून व्यक्त होत आहे.

७३ व्या घटनादुरूस्तीनंतर ग्रामपंचायती विकासाच्या केंद्रबिंदू बनल्या. केंद्र शासनाने ग्रामपंचायतींना अधिकार दिले. जिल्हा परिषदेकडून मिळणारा निधी चौदाव्या वित्त आयोगामार्फत थेट ग्रामपंचायतींना मिळू लागला. यातून कोट्यवधींची कामे ग्रामस्तरावर होत आहेत. मात्र, सरपंचपद आरक्षित झाल्याने बहुमत असो अगर नसो त्या प्रवर्गाचा व्यक्ती सरपंच होतो. अशावेळी निर्णय घेणारी व्यक्ती प्रत्येकवेळी इतर ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात घेतेच असे म्हणता येणार नाही. खासदारांना लाखोंचे वेतन मिळते. आमदारांना मतदारसंघासाठी भरीव निधी मिळतो. जिल्हा परिषद सदस्य, महानगरपालिका, नगरपालिकेच्या नगरसेवकांना आपल्या वाॅर्डाच्या विकासासाठी स्वतंत्र निधी मिळतो. सरपंचांनाही २ हजार २५० रुपये शासनाकडून वेतन मिळते. गावची लोकसंख्या व वार्षिक उत्पन्नानुसार त्यात आणखी वाढ होते.

याउलट ग्रामपंचायत सदस्यांना मासिक सभेला केवळ दोनशे रुपये बैठक भत्ता आणि एक कप चहा मिळतो. लोकांना देण्यासाठी किंवा आपण निवडून आलेल्या वाॅर्डाच्या विकासासाठीही स्वतंत्र निधीची तरतूद नाही. ग्रामसचिवालयात बसायला साधी खुर्चीही मिळत नाही.

----

पंचायतराज व्यवस्थेतील ग्रामपंचायत सदस्य अविभाज्य घटक आहे. आपल्या सक्रिय सहभागातून ग्रामपंचायत सदस्यही गावचा विकास साधू शकतात. त्याची अनेक उदाहरणे आहेत. सरपंचपदी विराजमान व्यक्तीच्या एखाद्या निर्णयाविरुद्ध थेट विरोध करण्याचा अधिकार सदस्यांना आहे. शिवाय सरपंचपदाच्या व्यक्तीवर अविश्वास ठराव दाखल करून तो बहुमताने पारित झाल्यास अशावेळी सरपंचपदाची व्यक्ती पायउतार होऊ शकते.

-बाळासाहेब कासार,

सहाय्यक गटविकास अधिकारी, शेवगाव