शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

विहिरी आटल्या, फळबागा सुकू लागल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:20 IST

कर्जत : कुकडीला पाणी नाही, विहिरी आटल्या, बोअरची पाणी पातळी खालावली, सुकलेल्या फळबागा, जळत चाललेली पिके, कोरडे पडलेले तलाव, ...

कर्जत : कुकडीला पाणी नाही, विहिरी आटल्या, बोअरची पाणी पातळी खालावली, सुकलेल्या फळबागा, जळत चाललेली पिके, कोरडे पडलेले तलाव, बंधारे अशी अवस्था कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांची झाली आहे. पाणीटंचाई जाणवू लागली आहे. दोन वर्षांपासून कुकडीच्या आवर्तनाचे गणित बिघडल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

तालुक्यातील तीस हजार हेक्टर क्षेत्र कुकडीमुळे सिंचनाखाली येते. या पाण्याच्या भरवशावर शेतकरी पिकांचे नियोजन करतात. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून कुकडीच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांना वाट पाहावी लागत आहे. गेल्या वर्षीही कुकडीचे पाणी मिळावे यासाठी माजी मंत्री प्रा. राम शिंदे, भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी कर्जत तहसील कार्यालयापुढे उपोषण केले होते. यावर्षी तर कुकडीच्या पाण्याने कळसच केला आहे.

गेल्या वर्षी पावसाळ्यात कुकडीअंतर्गत असलेल्या धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला होता. असे असतानाही कर्जतकरांना पूर्वीप्रमाणे ओव्हर फ्लोचे पाणी मिळाले नाही. शिवाय आवर्तन मंजुरीप्रमाणे सुटले नाही. मग कर्जतसाठीचे मंजूर पाणी गेले कोठे, हा प्रश्न उपस्थित होत आहे.

सध्या कुकडी लाभक्षेत्रातील विहिरी, बोअरची पाणी पातळी खालावली आहे. तलाव व बंधारे कोरडे पडले आहेत. फळबागा पाण्याअभावी सुकू लागल्या आहेत. पिके जळत आहेत. उन्हाळी कांदा अगोदरच काढून घेण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. हाती आलेली पिके डोळ्यांदेखत सुकत आहेत. या प्रश्नावर सत्ताधारी काहीच बोलत नाहीत, विरोधकही गप्प बसले आहेत. यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत आहे. यामुळे कुकडी पट्ट्यातील अनेक गावांत पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पिंपळवाडी, दूरगाव, चिलवडी, कोरेगाव, हंडाळवाडी, आंबिजळगाव, खातगाव, राशीन ग्रामपंचायतीने थेरवडी, दूरगाव तलावात कुकडीचे पाणी सोडावे, अशी मागणी केली आहे.

---

०८कुकडी कॅनाल, ०८ दूरगाव तलाव, ०८ पिके

कर्जत तालुक्यातील कोरडा पडलेला दूरगाव तलाव, कुकडीचा कॅनाॅल, राशीन परिसरातील पाण्याअभावी जळून चाललेला ऊस.