शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

विहिरी आटल्या, फळबागा सुकू लागल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:20 IST

कर्जत : कुकडीला पाणी नाही, विहिरी आटल्या, बोअरची पाणी पातळी खालावली, सुकलेल्या फळबागा, जळत चाललेली पिके, कोरडे पडलेले तलाव, ...

कर्जत : कुकडीला पाणी नाही, विहिरी आटल्या, बोअरची पाणी पातळी खालावली, सुकलेल्या फळबागा, जळत चाललेली पिके, कोरडे पडलेले तलाव, बंधारे अशी अवस्था कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांची झाली आहे. पाणीटंचाई जाणवू लागली आहे. दोन वर्षांपासून कुकडीच्या आवर्तनाचे गणित बिघडल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

तालुक्यातील तीस हजार हेक्टर क्षेत्र कुकडीमुळे सिंचनाखाली येते. या पाण्याच्या भरवशावर शेतकरी पिकांचे नियोजन करतात. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून कुकडीच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांना वाट पाहावी लागत आहे. गेल्या वर्षीही कुकडीचे पाणी मिळावे यासाठी माजी मंत्री प्रा. राम शिंदे, भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी कर्जत तहसील कार्यालयापुढे उपोषण केले होते. यावर्षी तर कुकडीच्या पाण्याने कळसच केला आहे.

गेल्या वर्षी पावसाळ्यात कुकडीअंतर्गत असलेल्या धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला होता. असे असतानाही कर्जतकरांना पूर्वीप्रमाणे ओव्हर फ्लोचे पाणी मिळाले नाही. शिवाय आवर्तन मंजुरीप्रमाणे सुटले नाही. मग कर्जतसाठीचे मंजूर पाणी गेले कोठे, हा प्रश्न उपस्थित होत आहे.

सध्या कुकडी लाभक्षेत्रातील विहिरी, बोअरची पाणी पातळी खालावली आहे. तलाव व बंधारे कोरडे पडले आहेत. फळबागा पाण्याअभावी सुकू लागल्या आहेत. पिके जळत आहेत. उन्हाळी कांदा अगोदरच काढून घेण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. हाती आलेली पिके डोळ्यांदेखत सुकत आहेत. या प्रश्नावर सत्ताधारी काहीच बोलत नाहीत, विरोधकही गप्प बसले आहेत. यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत आहे. यामुळे कुकडी पट्ट्यातील अनेक गावांत पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पिंपळवाडी, दूरगाव, चिलवडी, कोरेगाव, हंडाळवाडी, आंबिजळगाव, खातगाव, राशीन ग्रामपंचायतीने थेरवडी, दूरगाव तलावात कुकडीचे पाणी सोडावे, अशी मागणी केली आहे.

---

०८कुकडी कॅनाल, ०८ दूरगाव तलाव, ०८ पिके

कर्जत तालुक्यातील कोरडा पडलेला दूरगाव तलाव, कुकडीचा कॅनाॅल, राशीन परिसरातील पाण्याअभावी जळून चाललेला ऊस.