शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
3
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
4
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
5
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
6
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
7
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
8
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
9
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
10
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
11
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
12
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
13
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
14
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
15
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
16
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
17
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
18
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
19
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
20
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं

मनसे सोबत आल्यास स्वागतच, पण एकच अट; प्रवीण दरेकरांची खुली ऑफर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2020 20:03 IST

हिंदुत्वाच्या मुद्यावर भाजपसोबत कुणीही आले तरी त्यांना सोबत घेऊ. मनसे सोबत आल्यास त्यांचेही स्वागतच आहे, अशी एकप्रकारे खुली आॅफरच भाजपचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना नगर येथे पत्रकारांशी बोलताना दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कअहमदनगर : हिंदुत्वाच्या मुद्यावर भाजपसोबत कुणीही आले तरी त्यांना सोबत घेऊ. मनसे सोबत आल्यास त्यांचेही स्वागतच आहे, अशी एकप्रकारे खुली आॅफरच भाजपचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना नगर येथे पत्रकारांशी बोलताना दिली.विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते दरेकर रविवारी नगर दौºयावर आले होते. त्यांनी पाथर्डी तालुक्यातील भारजवाडी येथील आत्महत्याग्रस्त शेतकºयाच्या कुटुंबीयांची भेट घेऊन एक लाख रुपयांची मदत दिली. ही भेट घेतल्यानंतर शासकीय विश्रामगृहात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आमदार मोनिका राजळे, जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, शाम पिंपळे आदी उपस्थित होते. मुंबई महापालिकेतील निवडणुकीबाबत पत्रकारांनी छेडले असता दरेकर म्हणाले, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप सरकारच्या एनआरसी आणि सीएए कायद्याचे समर्थनच केलेले आहे. त्यांनी हिंदुत्वाचा मुद्दा प्रखरपणे मांडला असून, हिंदुत्वाच्या मुद्यावर जे कोणी भाजपसोबत येतील त्यांचे स्वागतच आहे. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र आलेले मुंबईतील सुशिक्षित मतदारांना आवडलेले नाही. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीत सुशिक्षित मतदार भाजपाच्या बाजूने राहिल, असे सूतोवाचही दरेकर यांनी केले. शिवसेनेच्या सहयोगी अल्पसंख्याक मंत्रीनवाब मलिक यांनी मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा सभागृहात उपस्थित केला. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी मान डोलावून मुस्लिम आरक्षणाचे समर्थन केले. महाविकास आघाडीतील आबू आझमी यांनीही मुख्यमंत्र्यांसोबत राम मंदिराबरोबरच मशिदीतही जाणार असल्याचे सांगितले. याशिवाय राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मशिदीसाठीचे ट्रस्ट स्थापन करण्याचे सूतोवाच केले आहे. महाविकास आघाडीत राम मंदिराबाबत मोठा विसंवाद निर्माण झाला असून, सेनेचा गोंधळ उडालेला दिसतो, अशी टीका दरेकर यांनी केली......तर बळीराजाचे प्राण वाचले असतेकर्जाला कंटाळून मल्हारी बटुळे या शेतकºयाने आत्महत्या केली. बटुळे यांच्याकडे अल्प, मध्यम आणि दीर्घ मुदतीचे ११ लाखांचे कर्ज होते. परंतु,सरकारने केवळ दोन लाखांपर्यंतचेच कर्ज माफ केले. सरसकट कर्जमाफीचा निर्णय सरकारने घेतला असता तर बटुळे यांनी आत्महत्या केली नसती. बटुळे यांची आत्महत्या हे महाविकास आघाडी सरकारचेच पाप आहे, अशी टीका दरेकर यांनी यावेळी केली.