शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मनसे सोबत आल्यास स्वागतच, पण एकच अट; प्रवीण दरेकरांची खुली ऑफर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2020 20:03 IST

हिंदुत्वाच्या मुद्यावर भाजपसोबत कुणीही आले तरी त्यांना सोबत घेऊ. मनसे सोबत आल्यास त्यांचेही स्वागतच आहे, अशी एकप्रकारे खुली आॅफरच भाजपचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना नगर येथे पत्रकारांशी बोलताना दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कअहमदनगर : हिंदुत्वाच्या मुद्यावर भाजपसोबत कुणीही आले तरी त्यांना सोबत घेऊ. मनसे सोबत आल्यास त्यांचेही स्वागतच आहे, अशी एकप्रकारे खुली आॅफरच भाजपचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना नगर येथे पत्रकारांशी बोलताना दिली.विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते दरेकर रविवारी नगर दौºयावर आले होते. त्यांनी पाथर्डी तालुक्यातील भारजवाडी येथील आत्महत्याग्रस्त शेतकºयाच्या कुटुंबीयांची भेट घेऊन एक लाख रुपयांची मदत दिली. ही भेट घेतल्यानंतर शासकीय विश्रामगृहात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आमदार मोनिका राजळे, जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, शाम पिंपळे आदी उपस्थित होते. मुंबई महापालिकेतील निवडणुकीबाबत पत्रकारांनी छेडले असता दरेकर म्हणाले, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप सरकारच्या एनआरसी आणि सीएए कायद्याचे समर्थनच केलेले आहे. त्यांनी हिंदुत्वाचा मुद्दा प्रखरपणे मांडला असून, हिंदुत्वाच्या मुद्यावर जे कोणी भाजपसोबत येतील त्यांचे स्वागतच आहे. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र आलेले मुंबईतील सुशिक्षित मतदारांना आवडलेले नाही. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीत सुशिक्षित मतदार भाजपाच्या बाजूने राहिल, असे सूतोवाचही दरेकर यांनी केले. शिवसेनेच्या सहयोगी अल्पसंख्याक मंत्रीनवाब मलिक यांनी मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा सभागृहात उपस्थित केला. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी मान डोलावून मुस्लिम आरक्षणाचे समर्थन केले. महाविकास आघाडीतील आबू आझमी यांनीही मुख्यमंत्र्यांसोबत राम मंदिराबरोबरच मशिदीतही जाणार असल्याचे सांगितले. याशिवाय राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मशिदीसाठीचे ट्रस्ट स्थापन करण्याचे सूतोवाच केले आहे. महाविकास आघाडीत राम मंदिराबाबत मोठा विसंवाद निर्माण झाला असून, सेनेचा गोंधळ उडालेला दिसतो, अशी टीका दरेकर यांनी केली......तर बळीराजाचे प्राण वाचले असतेकर्जाला कंटाळून मल्हारी बटुळे या शेतकºयाने आत्महत्या केली. बटुळे यांच्याकडे अल्प, मध्यम आणि दीर्घ मुदतीचे ११ लाखांचे कर्ज होते. परंतु,सरकारने केवळ दोन लाखांपर्यंतचेच कर्ज माफ केले. सरसकट कर्जमाफीचा निर्णय सरकारने घेतला असता तर बटुळे यांनी आत्महत्या केली नसती. बटुळे यांची आत्महत्या हे महाविकास आघाडी सरकारचेच पाप आहे, अशी टीका दरेकर यांनी यावेळी केली.