शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

हवामान खाते भरकटले

By admin | Updated: June 27, 2016 01:01 IST

अहमदनगर : बदलत्या हवामानाचा वेध घेण्यात प्रशासकीय यंत्रणाही अपयशी ठरली असून, हवामान खात्याचे अंदाज चुकत चालले आहेत

अहमदनगर : बदलत्या हवामानाचा वेध घेण्यात प्रशासकीय यंत्रणाही अपयशी ठरली असून, हवामान खात्याचे अंदाज चुकत चालले आहेत, असे सांगून राज्याचे हवामान खाते भरकटले आहे, अशी स्पष्टोक्ती देत दुरुस्तीच्या दिशेने सरकार पावले उचलत आहे, अशी सारवासारव पालकमंत्री तथा राज्याचे कृषी व पर्यटन मंत्री राम शिंदे यांनी रविवारी येथे केली़जिल्हा कृषी विभाग कर्मचारी पतसंस्थेच्या वतीने माउली संकुल येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते़ कृषी विभागाचे विभागीय संचालक विजयकुमार इंगळे, पतसंस्थेचे अध्यक्ष सोमनाथ बाचकर, उपाध्यक्ष सुभाष खेमनार, कृषी अधीक्षक भाऊसाहेब बऱ्हाटे आदी यावेळी उपस्थित होते़ राज्यातील हवामान खात्याने वेळोवेळी जाहीर केलेले अंदाज आणि प्रत्यक्ष पडणाऱ्या पावसावर शिंदे यांनी प्रकाश टाकला़ ते म्हणाले, राज्यात तीव्र दुष्काळानंतर पावसाला सुरुवात झाली़ हवामान खात्याने गेल्या एप्रिल महिन्यांत यंदा २५ ते ३१ टक्के जास्त पाऊस पडेल, असा अंदाज व्यक्त केला होता़ आता हेच हवामान खाते १०६ टक्के पाऊस पडेल, असा अंदाज व्यक्त करत आहे, म्हणजे ६ टक्के इतकाच जास्त पाऊस पडेल, असा त्यांचा अंदाज आहे, असे सांगून एकाच मालकाच्या दोन वाटण्यांचे उदाहरण शिंदे यांनी दिले़ एका वाटणीत जर पाऊस पडला तर दुसऱ्या वाटणीत पडेलच, असे नाही, असेही ते म्हणाले़इतर देशांच्या तुलनेत हवामानाचा वेध घेण्यात आपण कमी पडत आहोत़ त्याचा फटका सर्वसामान्य शेतकऱ्यांना बसत आहे़ त्यामुळे हवामान खात्यात मोठे बदल भविष्यात करण्यात येणार आहे़ अत्याधुनिक हवामान केंद्र उभारण्याच्या दिशेने सरकार पावले उचलत आहे़ त्यासाठी कृषी विभागातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची मदत घेतली जाणार आहे़ त्यांच्या ज्ञानाचा उपयोग करून घेतला जाणार असून, सेवानिवृत्त अधिकाऱ्यांनी निवृत्तीनंतर कृषीसाठी योगदान द्यावे, असे आवाहन शिंदे यांनी यावेळी केले़ कार्यक्रमाचे प्रास्ताविक सोमनाथ बाचकर यांनी तर आभार रुपाली काळे यांनी मानले़ जिल्ह्यातील कृषी विभागातून सेवानिवृत्त कर्मचारी व गुणवंत विद्यार्थ्यांचा शिंदे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला़(प्रतिनिधी)विद्यार्थ्यांना मिळालेले गुण आणि प्रवेश प्रक्रिया यावर भाष्य करत नीटच्या निर्णयामुळे बरेच ‘नीट’ झाले आहेत, असे सांगून शिंदे यांनी राज्यातील शिक्षणसम्राटांवरही निशाणा साधला़