शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात कोरोना रिटर्न! आज दिवसभरात आढळले ६५ नवीन रुग्ण; मुंबईत २२ कोविड रुग्ण
2
IPL मध्ये सूर्यकुमार यादवचा मोठा पराक्रम! एबी डिव्हिलियर्सच्या विक्रम मोडीत काढत रचला नवा इतिहास
3
हगवणे कुटुंबियांचे जेसीबी मशीन जप्त; महाळुंगे एमआयडीसी पोलिसांची कारवाई
4
युक्रेनचं 'ऑपरेशन स्पायडरवेब'! ४ एअरबेस, ४० एअरक्राफ्ट उद्ध्वस्त; रशियाला २०० कोटी डॉलरचा फटका
5
PBKS vs MI : रोहितचा कॅच सुटल्यावर अय्यरचा मास्टर स्ट्रोक! स्टॉयनिसनं तर छाती बडवत केलं सेलिब्रेशन
6
भारताच्या मित्राने चीन सीमेवर उभी केली F-35 लढाऊ विमाने; जिनपिंग यांचं टेन्शन वाढलं
7
आता पिनकोड नाही तर 'Digipin' शेअर करा; भारतीय डाक विभागानं आणली पत्ता शोधणारी नवी प्रणाली
8
MI ला फायनल खेळायची हौस; पण Qualifier 2 मॅच आधी पाऊस! आकाश अंबानी यांची रिअ‍ॅक्शन व्हायरल
9
हनीमूनसाठी शिलांगला गेलेले जोडपे गायब, रहस्य उलगडेना; ९ दिवसांपासून काहीच सुगावा नाही
10
रशियाच्या एअरबेसवर युक्रेनचा मोठा हल्ला, बॉम्ब वर्षाव करणारी 40 विमानं उद्ध्वस्त केल्याचा दावा!
11
अन्नपदार्थांवर बुरशी, अस्वच्छता..; धारावीत Zepto चा परवाना निलंबित, महाराष्ट्र FDA ची कारवाई
12
Shreyas Iyer: मुंबईविरुद्ध श्रेयस अय्यरकडे इतिहास रचण्याची संधी, आतापर्यंत कोणालाही जमलं नाही असं!
13
IPL 2025 Qualifier 2 : MI ला धक्का; सावरण्यासाठी ६ फूट ७ इंच उंचीच्या तगड्या गड्यावर खेळला डाव
14
आसाम ते सिक्किमपर्यंत 'जल'प्रलय; पूर अन् भूस्खलनामुळे आतापर्यंत ३० मृत्यू, दिल्लीलाही इशारा
15
मे महिन्यात विक्रमी GST संकलन; सरकारच्या तिजोरीत आले ₹2.01 लाख कोटी
16
...ती माहिती संरक्षण मंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीत दिली पाहिजे होती, CDS च्या विधानानंतर काँग्रेस आक्रमक  
17
पाकिस्तानने युद्धविरामासाठी विनवणी केली; भारतीय शिष्टमंडळाने सांगितला 'त्या' दिवसाचा घटनाक्रम
18
अजित पवार सामाजिक न्याय योजनांसाठी निधी देत नाहीत; लक्ष्मण हाकेंचा थेट आरोप
19
कोण आहे २२ वर्षीय शर्मिष्ठा पनोली?; जिच्या अटकेमुळे भारतात सुरू झाला नवा वाद
20
शेतीच्या वादातून जन्मदात्या आईचा खून; मुलासह सून, व्याही पोलिसांच्या जाळ्यात अडकले

हवामान खाते भरकटले

By admin | Updated: June 27, 2016 01:01 IST

अहमदनगर : बदलत्या हवामानाचा वेध घेण्यात प्रशासकीय यंत्रणाही अपयशी ठरली असून, हवामान खात्याचे अंदाज चुकत चालले आहेत

अहमदनगर : बदलत्या हवामानाचा वेध घेण्यात प्रशासकीय यंत्रणाही अपयशी ठरली असून, हवामान खात्याचे अंदाज चुकत चालले आहेत, असे सांगून राज्याचे हवामान खाते भरकटले आहे, अशी स्पष्टोक्ती देत दुरुस्तीच्या दिशेने सरकार पावले उचलत आहे, अशी सारवासारव पालकमंत्री तथा राज्याचे कृषी व पर्यटन मंत्री राम शिंदे यांनी रविवारी येथे केली़जिल्हा कृषी विभाग कर्मचारी पतसंस्थेच्या वतीने माउली संकुल येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते़ कृषी विभागाचे विभागीय संचालक विजयकुमार इंगळे, पतसंस्थेचे अध्यक्ष सोमनाथ बाचकर, उपाध्यक्ष सुभाष खेमनार, कृषी अधीक्षक भाऊसाहेब बऱ्हाटे आदी यावेळी उपस्थित होते़ राज्यातील हवामान खात्याने वेळोवेळी जाहीर केलेले अंदाज आणि प्रत्यक्ष पडणाऱ्या पावसावर शिंदे यांनी प्रकाश टाकला़ ते म्हणाले, राज्यात तीव्र दुष्काळानंतर पावसाला सुरुवात झाली़ हवामान खात्याने गेल्या एप्रिल महिन्यांत यंदा २५ ते ३१ टक्के जास्त पाऊस पडेल, असा अंदाज व्यक्त केला होता़ आता हेच हवामान खाते १०६ टक्के पाऊस पडेल, असा अंदाज व्यक्त करत आहे, म्हणजे ६ टक्के इतकाच जास्त पाऊस पडेल, असा त्यांचा अंदाज आहे, असे सांगून एकाच मालकाच्या दोन वाटण्यांचे उदाहरण शिंदे यांनी दिले़ एका वाटणीत जर पाऊस पडला तर दुसऱ्या वाटणीत पडेलच, असे नाही, असेही ते म्हणाले़इतर देशांच्या तुलनेत हवामानाचा वेध घेण्यात आपण कमी पडत आहोत़ त्याचा फटका सर्वसामान्य शेतकऱ्यांना बसत आहे़ त्यामुळे हवामान खात्यात मोठे बदल भविष्यात करण्यात येणार आहे़ अत्याधुनिक हवामान केंद्र उभारण्याच्या दिशेने सरकार पावले उचलत आहे़ त्यासाठी कृषी विभागातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची मदत घेतली जाणार आहे़ त्यांच्या ज्ञानाचा उपयोग करून घेतला जाणार असून, सेवानिवृत्त अधिकाऱ्यांनी निवृत्तीनंतर कृषीसाठी योगदान द्यावे, असे आवाहन शिंदे यांनी यावेळी केले़ कार्यक्रमाचे प्रास्ताविक सोमनाथ बाचकर यांनी तर आभार रुपाली काळे यांनी मानले़ जिल्ह्यातील कृषी विभागातून सेवानिवृत्त कर्मचारी व गुणवंत विद्यार्थ्यांचा शिंदे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला़(प्रतिनिधी)विद्यार्थ्यांना मिळालेले गुण आणि प्रवेश प्रक्रिया यावर भाष्य करत नीटच्या निर्णयामुळे बरेच ‘नीट’ झाले आहेत, असे सांगून शिंदे यांनी राज्यातील शिक्षणसम्राटांवरही निशाणा साधला़