शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

श्रीगोंदा में बेहत्तर इंन्सानियत हमने देखी..!; उत्तरप्रदेशातील युवकाच्या भावना 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 12:41 IST

लॉकडाऊनमध्ये आम्ही पायी उत्तरप्रदेशकडे जात असताना निमगाव खलू चेक पोस्टवर पकडलो गेलो. त्यावेळी खूप घाबरलो. पण श्रीगोंदा येथील निवारा केंद्रात आम्हाला घरच्यासारखे प्रेम दिले. भोजन दिले. मैने इंन्सानियत किताब पढी थी.. लेकीन उससे बेहत्तर इंन्सानियत हमन श्रीगोंदा हमने देखी.. अशी भावना उत्तरप्रदेशातील युवक मोहम्मद आसिफ यांंनी व्यक्त केली.

बाळासाहेब काकडे/लोकमत न्यूज नेटवर्क  श्रीगोंदा : लॉकडाऊनमध्ये आम्ही पायी उत्तरप्रदेशकडे जात असताना निमगाव खलू चेक पोस्टवर पकडलो गेलो. त्यावेळी खूप घाबरलो. पण श्रीगोंदा येथील निवारा केंद्रात आम्हाला घरच्यासारखे प्रेम दिले. भोजन दिले. मैने इंन्सानियत किताब पढी थी.. लेकीन उससे बेहत्तर इंन्सानियत हमन श्रीगोंदा हमने देखी.. अशी भावना उत्तरप्रदेशातील युवक मोहम्मद आसिफ यांंनी व्यक्त केली. यावेळी आसिफ याला डोळ्यातील आनंदाश्रू लपविता आले नाहीत.    मोहम्मद असीफ हा मूळ उत्तरप्रदेशमधील आहे. तो पुणे येथे आयटीचे प्रशिक्षण घेत आहे. पुण्यावरून तो व त्याचे सहकारी मित्र दौंडला पायी आले.परंतु त्यांना श्रीगोंदा तालुक्यातील निमगाव खलू चेक पोस्टवर  पोलिसांनी पकडले.  पोलिसांनी त्यांना श्रीगोंदा येथील महानिवारा केंद्रात आणले होते. मोहम्मद असिफ  पुढे म्हणाला, पोलिसांनी पकडले. त्यावेळी आम्ही खूप घाबरलेले होतो. प्रशासनाने महादजी शिंदे विद्यालयात आमची घराच्यासारखी व्यवस्था केली. चहा, नाष्टा, जेवण वेळेवर आणि पिण्यास  फिल्टर पाणी होते. तहसीलदार महेंद्र महाजन साहेब  व इतरांनी आमची आस्थेने विचारपूस करीत होते. जेवण बनविणारे खूपच चांगली माणसे होती. या ठिकाणी पापा, माँ सारखे प्रेम मिळाले. भविष्यात कुणावर संकट आले तर मी पुढच्या रांगेत उभा राहील व माझे कर्तव्य बजावेल. ही शिकवण येथे मिळाली आहे. देवाच्या रुपाने काम करणारे प्रशासकीय अधिकारी, येथील नागरिकांना माझा आदरपूर्वक सलाम आहे. ६४४ मजूर लखनऊला रवाना  लॉकडॉऊनमुळे श्रीगोंदा तालुक्यात अडकलेले सुमारे साडेसहा हजार नागरिक अडकले होते. त्यामध्ये उत्तरप्रदेश राज्यातील ६४४ मजूर होते.   रविवारी (दि.१० मे) तहसीलदार महेंद्र महाजन यांच्या उपस्थितीत १३ बस करून त्यांना नगरला रेल्वे स्टेशनवर पाठविण्यात आले. हे विशेष रेल्वेने लखनऊला रवाना झाले. या सर्व मजुरांना  फूड पॅकेट, पाणी, बिस्कीट, भेळ देण्यात आली. यावेळी तहसीलदार महेंद्र महाजन, निवासी तहसीलदार डॉ. योगिता ढोले, श्रीगोंदा आगार व्यवस्थापक प्रवीण शिंदे, पुरवठा विभागाचे दत्तात्रय सांळुके, मंडलाधिकारी प्रशांत कांबळे, तलाठी कृष्णा गुजर, गणेश मुसळे, रवी लष्करे यांनी त्यांना निरोप दिला. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदाcorona virusकोरोना वायरस बातम्याLabourकामगार