शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

आम्हाला नाही कोरोनाची भीती...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:14 IST

विसापूर : श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर येथील मार्चअखेरच्या दि.२८ आठवडे बाजारात विक्रेते व ग्राहकांची उदंड गर्दी पाहायला मिळाली. या ठिकाणी ...

विसापूर : श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर येथील मार्चअखेरच्या दि.२८ आठवडे बाजारात विक्रेते व ग्राहकांची उदंड गर्दी पाहायला मिळाली. या ठिकाणी ‘आम्हाला नाही कोरोनाची भीती’, अशा आवेशात लोक वावरत असल्याचे चित्र होते. येथे फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता.

कोरोना शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागात पाय पसरत असताना लोक मात्र निर्धास्त आहेत. काळजी घेतली तर सरकारला सार्वजनिक कार्यक्रमांबरोबरच आठवडी बाजार बंद करण्याची गरज पडणार नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी दि. २९ पासून दि. १५ एप्रिलपर्यंत आठवडी बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्या निर्णयाचा परिणाम विसापूर येथील आठवडी बाजारात दिसून आला. लोकांनी नेहमीपेक्षा या वेळी शेवटचा बाजार म्हणून बाजारहाट करण्यासाठी जास्त गर्दी केली होती. काही लोक मास्क लावून कोरोनापासून बचाव करण्यासाठी जागरूक असल्याचे दिसून आले. कोरोनाची आम्हाला कोणीही भीती नसल्याच्या आविर्भावात वावरत होते. विक्रेतेही सोशल डिस्टन्स व मास्कचा वापर करायला तयार नाहीत.

--

शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर मात्र चिंता

पुढील काही दिवस आठवडी बाजार बंद राहणार असल्याने आपण मोठ्या कष्टाने पिकविलेला भाजीपाला कोठे विकायचा, या विवंचनेत शेतकरी सापडला आहे. १५ एप्रिलपर्यंत आठवडी बाजार बंद ठेवण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी डेटलाइन दिली आहे. मात्र, त्यात पुढे वाढ झाली तर काय, हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. मागील वर्षी लॉकडाऊनमध्ये घरोघरी जाऊन भाजीपाला विक्री करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली होती. या‌वेळीही उन्हाळ्यात शेतकऱ्यांना या परिस्थितीचा सामना तर करावा लागणार नाही ना? अशी भीती व्यक्त होत आहे.

--

२८ विसापूर

विसापूर आठवडी बाजारात ग्रामस्थांची झालेली गर्दी.