शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासाठी १९ इनोव्हा मागवल्या, डिझेल भरायला गेल्या आणि पाणी भरून आल्या...
2
आज दोघं एक पाऊल पुढे आलेत, भविष्यात एकत्र दिसतील ही खात्री; ठाकरे बंधूंचे मामा काय बोलले?
3
" हा तर गमावलेली राजकीय स्पेस मिळवण्याचा प्रयत्न, यांना मराठी भाषेशी…’’, ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चाची भाजपाकडून खिल्ली
4
सरकारी नोकरीसाठी फक्त परीक्षा पास होणे पुरेसे नाही? CIBIL स्कोअरही महत्त्वाचा; एकाची नियुक्ती रद्द
5
जगन्नाथ रथयात्रेत मोठी घटना टळली! १८ हत्तींचे नेतृत्व करणाराच हत्ती बिथरला, अन्...
6
संजय लीला भन्साळींसोबत करीनाचं असं आहे नातं, विकीसमोर केला खुलासा, म्हणाली - "लव्ह अ‍ॅण्ड वॉरवाला..."
7
'बाप माणूस' KL राहुलनं असं जपलं टीम इंडियातील आपल्या जबाबदारीचं भान!
8
चीनमध्ये गाढवे का गायब होत आहेत? ५८,००० कोटी रुपयांचा व्यवसाय संकटात? काय आहे प्रकरण?
9
Maharashtra Politics : "मला खूप आनंद झाला, सुरुवात चांगली झाली"; ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चावर मनसे नेत्याने स्पष्टच सांगितलं
10
Rohit Pawar: ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर...; रोहित पवारांचं सूचक ट्वीट!
11
₹२ च्या मजुरीपासून ते ₹२००० कोटींच्या मालक; पद्मश्री मिळवणाऱ्या अकोल्याच्या कल्पना सरोज यांचा कसा होता प्रवास
12
"मराठी माणसाच्या हितासाठी..." मनसे प्रमुख राज ठाकरेंचा संजय राऊतांना फोन, काय झाला संवाद?
13
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
14
Sonam Raghuvanshi : आरोपींनी पोलिसांसमोर गुन्हा कबुल केला, पण न्यायाधीशांसमोर वेगळंच सांगितलं; राजा रघुवंशी प्रकरणात नवा ट्विस्ट
15
नोएल टाटांनी करुन दाखवलं! अशी कामगिरी करणारा टाटा ग्रुप पहिलाच भारतीय ब्रँड; दुसरा-तिसरा कोण?
16
Mumbai: पालकांनो लक्ष द्या! १ जुलैपासून तुमच्या मुलांना घ्यायला व सोडवायला शाळेची बस न येण्याची शक्यता
17
...म्हणून मुलांना जन्म देण्यास टाळाटाळ करताहेत भारतीय जोडपी, समोर आलं धक्कादायक कारण
18
मराठी समाज विभागलाय, मुंबईत उत्तर भारतीय महापौर बनवण्याची हीच वेळ; सुनील शुक्लानं मांडलं गणित
19
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
20
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...

शिर्डीतील पाणी संपले

By admin | Updated: June 27, 2016 00:56 IST

शिर्डी : साई संस्थानच्या तलावापाठोपाठ नगरपंचायतच्या साठवण तलावानेही मान टाकली़ रविवारी या तलावातून अखेरचे पाणी उपसून नागरिकांना देण्यात आले़

शिर्डी : साई संस्थानच्या तलावापाठोपाठ नगरपंचायतच्या साठवण तलावानेही मान टाकली़ रविवारी या तलावातून अखेरचे पाणी उपसून नागरिकांना देण्यात आले़ त्यामुळे आगामी काही दिवस शिर्डीकरांना पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे. शिर्डीत प्रथमच एवढी भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे़गेल्या पंधरवाड्यात संस्थानने पाण्याअभावी भक्तनिवास बंद ठेवण्याचा निर्णय घेतला़ नगरपंचायत गेले काही दिवसांपासून दर दहा दिवसांनी पाणी पुरवठा करत होती, ते पाणीही आता संपले़ शिर्डीतील कूपनलिका दोन महिन्यांपूर्वीच कोरड्या पडल्या आहेत़ शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या दारणा धरणातील पाणीही संपुष्टात आले़ पैसे देऊनही पाणी मिळेनासे झाले आहे़ आपापल्या प्रभागात टँकरद्वारे पाणी पुरवठा करणाऱ्या नेतेमंडळींचीही पाण्याच्या उपलब्धतेसाठी दमछाक होत आहे़ डॉ़ सुजय विखे यांनी लोकसहभागातून राबवलेल्या जलक्रांती योजनेतून ओढे, नाल्यांचे खोलीकरण झाले़ मात्र आता या योजनेलाही पावसाची प्रतीक्षा आहे़या पार्श्वभूमीवर नगरपंचायतने शहरात तातडीने टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक गोंदकर यांनी केली आहे. गेल्या १४ जून रोजी नगरपंचायतने विशेष सभा घेऊन याबाबत ठराव केल्याचेही गोंदकर यांनी सांगितले़ नव्यानेच रूजू झालेले मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी या ठरावाची तातडीने अंमलबजावणी करावी व टँकरने थेट मुळा धरणातून पाणीपुरवठा करावा, अन्यथा पक्षाच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा गोंदकर यांनी दिला आहे़(तालुका प्रतिनिधी)नगरपंचायतच्या साठवण तलावाची क्षमता मोठी असली तरी ६५ टक्क्याहून अधिक पाण्याची गळती होत असल्याने या तलावात तातडीने प्लॅस्टिक कागद टाकावा किंवा कायम स्वरूपी काँक्रिटीकरण करावे, शहरासाठी मंजूर झालेल्या २२ कोटींच्या नवीन पाणी पुरवठा योजनेचे काम सुरू करावे, थेट निळवंडे धरणातून बंद पाईपने पाणी आणावे आदी मागण्याही गोंदकर यांनी केल्या आहेत़