शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

शिर्डीतील पाणी संपले

By admin | Updated: June 27, 2016 00:56 IST

शिर्डी : साई संस्थानच्या तलावापाठोपाठ नगरपंचायतच्या साठवण तलावानेही मान टाकली़ रविवारी या तलावातून अखेरचे पाणी उपसून नागरिकांना देण्यात आले़

शिर्डी : साई संस्थानच्या तलावापाठोपाठ नगरपंचायतच्या साठवण तलावानेही मान टाकली़ रविवारी या तलावातून अखेरचे पाणी उपसून नागरिकांना देण्यात आले़ त्यामुळे आगामी काही दिवस शिर्डीकरांना पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे. शिर्डीत प्रथमच एवढी भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे़गेल्या पंधरवाड्यात संस्थानने पाण्याअभावी भक्तनिवास बंद ठेवण्याचा निर्णय घेतला़ नगरपंचायत गेले काही दिवसांपासून दर दहा दिवसांनी पाणी पुरवठा करत होती, ते पाणीही आता संपले़ शिर्डीतील कूपनलिका दोन महिन्यांपूर्वीच कोरड्या पडल्या आहेत़ शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या दारणा धरणातील पाणीही संपुष्टात आले़ पैसे देऊनही पाणी मिळेनासे झाले आहे़ आपापल्या प्रभागात टँकरद्वारे पाणी पुरवठा करणाऱ्या नेतेमंडळींचीही पाण्याच्या उपलब्धतेसाठी दमछाक होत आहे़ डॉ़ सुजय विखे यांनी लोकसहभागातून राबवलेल्या जलक्रांती योजनेतून ओढे, नाल्यांचे खोलीकरण झाले़ मात्र आता या योजनेलाही पावसाची प्रतीक्षा आहे़या पार्श्वभूमीवर नगरपंचायतने शहरात तातडीने टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक गोंदकर यांनी केली आहे. गेल्या १४ जून रोजी नगरपंचायतने विशेष सभा घेऊन याबाबत ठराव केल्याचेही गोंदकर यांनी सांगितले़ नव्यानेच रूजू झालेले मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी या ठरावाची तातडीने अंमलबजावणी करावी व टँकरने थेट मुळा धरणातून पाणीपुरवठा करावा, अन्यथा पक्षाच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा गोंदकर यांनी दिला आहे़(तालुका प्रतिनिधी)नगरपंचायतच्या साठवण तलावाची क्षमता मोठी असली तरी ६५ टक्क्याहून अधिक पाण्याची गळती होत असल्याने या तलावात तातडीने प्लॅस्टिक कागद टाकावा किंवा कायम स्वरूपी काँक्रिटीकरण करावे, शहरासाठी मंजूर झालेल्या २२ कोटींच्या नवीन पाणी पुरवठा योजनेचे काम सुरू करावे, थेट निळवंडे धरणातून बंद पाईपने पाणी आणावे आदी मागण्याही गोंदकर यांनी केल्या आहेत़