शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
5
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
6
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
7
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
8
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
9
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
10
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
11
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
12
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
13
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
14
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
15
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
16
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
17
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
18
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
19
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
20
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका

मावस भावंडांना जलसमाधी

By admin | Updated: June 19, 2024 14:11 IST

संगमनेर : पठार भागातील मुळा नदीत पोहण्यासाठी गेलेल्या सख्ख्या मावस भावंडांचा खोल पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना येठेवाडी येथे घडली.

संगमनेर : पठार भागातील मुळा नदीत पोहण्यासाठी गेलेल्या सख्ख्या मावस भावंडांचा खोल पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना येठेवाडी येथे घडली. याप्रकरणी घारगाव पोलिसांत अकस्मात मृत्युची नोंद केली आहे. पोलिसांची माहिती अशी, शाळेला सुट्टी लागल्याने अमोल गोरख भांड (वय १३, रा. वेल्हाळे) हा त्याचा सख्खा मावस भाऊ अरूण बाळासाहेब रोडे (वय १४, रा. येठेवाडी) याच्याकडे आला होता. सध्या ‘मे’ महिन्याच्या उष्णतेने प्रचंड उकाडा निर्माण झाला असून मुळा नदीतील पाण्यात पोहण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. रविवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास दोघे भावंड पोहण्यासाठी नदीवर गेले. नदी पात्रातील प्रचंड खोली असलेल्या डोहात दोघांनी उड्या मारल्या. परंतु खोलीचा अंदाज न आल्याने दोघेही पाण्यात बुडाले. प्रत्यक्षदर्शींनी आरडाओरड केली. काहींनी पाण्यात उड्या घेत शोधाशोध सुरू केली. मात्र अर्ध्या तासानंतर दोघा भावांचे मृतदेह एकाच ठिकाणी सापडले. मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी कुटीर रूग्णालयात पाठविण्यात आले. याप्रकरणी संपत रोडे यांनी दिलेल्या खबरीवरून घारगाव पोलिसांनी अकस्मात मृत्युची नोंद केली आहे. मयत अमोल भांड हा इयत्ता सातवीच्या वर्गात शिकत होता, तर अरूण रोडे हा आठवीत उत्तीर्ण होऊन नववीत गेला होता. (प्रतिनिधी)