शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

पाथर्डी तालुक्यातील ५० गावांच्या पाण्याचा प्रश्न तीव्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:36 IST

अहमदनगर : पाथर्डी तालुक्यातील ५० गावांना मुळा धारणातून शेतीसाठी पाणी सोडण्याची मागणी संयुक्तिक नसल्याचे लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाने नाशिक येथील ...

अहमदनगर : पाथर्डी तालुक्यातील ५० गावांना मुळा धारणातून शेतीसाठी पाणी सोडण्याची मागणी संयुक्तिक नसल्याचे लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाने नाशिक येथील जलसंपदा विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांना निवेदन दिले आहे. त्यामुळे पाथर्डी तालुक्यातील ५० गावांना पाणी उपलब्ध न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा स्थानिक कार्यकर्त्यांनी दिला आहे.

मुळा धरणाचे पाणी पाथर्डी तालुक्यातील ५० गावांना शेतीसाठी मिळावे याबाबतच्या मागणीचे निवेदन सन २०१८ मध्ये पाथर्डी तालुक्यातील कुत्तरवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते तुळशीराम सानप यांनी दिले होते. त्यानंतर लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाने जससंपदा विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांना पत्र लिहून पाणी देणे संयुक्तिक नसल्याचे कळविले आहे. सद्य:स्थितीत प्रकल्पाचे पाणी वापरामध्ये १,९७४ दशलक्ष इतकी तूट आहे. त्यामुळे मागणी केलेल्या पन्नास गावांना शेतीसाठी पाणी उपलब्ध होऊ शकत नाही. त्यामुळे प्रस्थापित मागणी तांत्रिकदृष्ट्या संयुक्त नाही, असे २८ डिसेंबर २०२० च्या पत्रात नमूद करण्यात आले होते.

त्यामुळे सानप यांनी गत आठवड्यात मुंबईत जलसंपदामंत्री जयंत पाटील, पालकमंत्री हसन मुश्रईफ यांची भेट घेतली. यावेळी त्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पाइपलाइनच्या साह्याने मुळा धरणाचे पाणी पाथर्डी तालुक्यातील मौजे शिरसाटवाडी तलाव, मोहरी तलाव, घाटशीळ पारगाव मध्यम प्रकल्पामध्ये सोडून पाथर्डी तालुक्यातील ५० गावांना शेतीसाठी पाणी द्यावे. सध्या मुळा धरणाचे पाणी साकेगाव (ता. पाथर्डी) येथे उपलब्ध आहे. तेथून मध्यम प्रकल्प पारगाव, शिरसवडी तलावांमध्ये मुळा धरणाचे पाणी पाइपलाइनने सोडले, तर तांत्रिकदृष्ट्या अडचण येणार नाही. मुळा धरणाच्या भिंतीची उंची दोन ते तीन फूट वाढवून मुळा धरणाचे पाणी पाथर्डी तालुक्यातील ५० गावांना देण्याबाबतचा कार्यवाहीचा प्रश्न अधिवेशनामध्ये विशेष बाब म्हणून उपस्थित करावा. मुळा धरणाचे पाणी पाथर्डी तालुक्यातील ५० गावांना शेतीसाठी देण्याबाबतचा मुद्दा उपस्थित केला नाही, तर १० मे रोजी पाथर्डीत रास्ता रोको करण्याचा इशारा दिला आहे.