शहरं
Join us  
Trending Stories
1
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
2
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
3
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटचा वादातून शाळेतच संपवले
4
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
5
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
6
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
7
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
8
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
9
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
10
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले
11
उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
12
तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे
13
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
14
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
15
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
16
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
17
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
18
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
19
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
20
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”

पाणी नियोजन महत्वाचे

By admin | Updated: May 27, 2014 00:29 IST

अहमदनगर : कृषी विभागाने जिल्हानिहाय, तालुकानिहाय खरीप हंंगामाच्या यशस्वीतेसाठी बियाणे, खतांचे नियोजन केलेले आहे.

अहमदनगर : कृषी विभागाने जिल्हानिहाय, तालुकानिहाय खरीप हंंगामाच्या यशस्वीतेसाठी बियाणे, खतांचे नियोजन केलेले आहे. मात्र, गावनिहाय पाण्याचे नियोजन होणे आवश्यक असून ते झाले तरच हंगाम यशस्वी होऊ शकतो, असा विश्वास पालकमंत्री मधुकरराव पिचड यांनी व्यक्त केला. जिल्हा नियोजन मंडळाच्या सभागृहात खरीप हंगामाच्या बैठक ते बोलत होते. यावेळी आमदार बबनराव पाचपुते, जिल्हाधिकारी अनिल कवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल, जि. प. अध्यक्ष विठ्ठलराव लंघे, सभापती बाबासाहेब तांबे, कैलास वाकचौरे, कृषी अधीक्षक अंकुशराव माने, कृषी विकास अधिकारी विलास नलगे, आत्माचे संचालक शिवाजी आमले आदी उपस्थित होते. पालकमंत्री पिचड म्हणाले की, सुरूवातीला एल निनोमुळे जिल्ह्यात खरीप हंगामात अडचण निर्माण होऊ शकते, अशी परिस्थिती होती. मात्र, नवीन अहवाला नुसार सरासरी पेक्षा चांगला पाऊस होईल असे सांगण्यात येत आहे. मात्र, कृषी विभागाने पीक विम्यावर अधिक भर देणे आवश्यक आहे. कोणत्याही परिस्थितीत शेतकर्‍यांना बोगस खते आणि बियाणे मिळणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. जिल्ह्यातील शेतकर्‍यांना गत वर्षी १ हजार ५२० कोटी रुपयांची मदत देण्यात आलेली आहे. यात चारा, छावणी, गारपीटग्रस्त, नरेगा, पीक विमा यांचा समावेश आहे. तसेच शेतकर्‍यांना एक हजार ७०० कोटीचा पत पुरवठा करण्यात आलेला आहे. यंदा देखील कृषी विभागाने गावनिहाय पीक आणि पाण्याचे नियोजन करावे. जास्तीजास्त चारा पीक घेण्यासाठी प्रयत्न करावेत. आ. पाचपुते यांनी प्रशासनाने एल निनोचा प्रभाव झाल्यास काय उपाययोजना करणे आवश्यक आहे, याचा आराखडा करणे गरजेचे आहे. गाळ काढण्याची मोहीम सुरू असताना गेल्या आठ दिवसांत महसूल कडून अडवणूक होत आहे. गाळ आणि मुरूम काढणार्‍यांना रॉयल्टी भरण्यास सांगण्यात येत आहे. जिल्हाधिकारी कवडे यांनी खरीप आणि रब्बी हंगामातील गावांचा निकष बदलून घेणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. यामुळे प्रत्येक तालुक्याची पैसेवारी सुधारित होईल असे सांगितले. पर्जन्यावर आधारित पैसेवारी आकारली जावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. शेतीतील आधुनिक प्रयोगाचे सार्वत्रिकरण होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. प्रास्ताविक माने तर आभार संभाजी गायकवाड यांनी मानले. जिल्हा परिषद सदस्य सुजीत झावरे, शरद नवले, उपस्थित होता.(प्रतिनिधी)घोसपुरी पाणी योजनेचे जिल्हा परिषदेकडे हस्तांतरण रखडलेले आहे. या योजना बंद असल्याने जनतेचे हाल होत आहेत. जिल्हा परिषदेने याकडे लक्ष द्यावेत. पूर्वी मी बोलत नव्हतो, पण आता बोलणार. प्रत्येकाने स्वत:चे काम केले पाहिजे. महावितरणने आपल्या कामकाजात सुधारणा करावी, आकडेबहाद्दरांवर कारवाई करावी अशी मागणी आ. पाचपुते यांनी केली.बैठकीत आ. पाचपुते संतप्त झाले असल्याचे सर्वाच्या लक्षात आले होते. यामुळे समारोपाला पालकमंत्री पिचड यांनी बबनराव नाराज होऊ नका, अच्छे दिन आने वाले है ! असे म्हणताच सभागृहात खसखस पिकली.