शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

गोदावरी नदीतील पाणी शेवाळल्याने सुटली दुर्गंधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:19 IST

गोदावरी नदीपात्र-१ लोकमत न्यूज नेटवर्क कोपरगाव : शहरालगत वाहणाऱ्या गोदावरी नदीत संपूर्ण कोपरगाव शहराचे मैलामिश्रित सांडपाणी गेल्या अनेक ...

गोदावरी नदीपात्र-१

लोकमत न्यूज नेटवर्क

कोपरगाव : शहरालगत वाहणाऱ्या गोदावरी नदीत संपूर्ण कोपरगाव शहराचे मैलामिश्रित सांडपाणी गेल्या अनेक वर्षापासून सोडले जात आहे. सद्य:स्थितीत नदीतील पाणी हे पूर्णतः शेवाळले असून या पाण्याची दुर्गंधी सुटली आहे. त्यामुळे कोपरगाव शहरातील नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न गंभीर होऊन रोगराई वाढण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. मात्र, या गंभीर समस्येकडे कोपरगाव नगरपरिषद प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे.

गोदावरी नदीच्या काठावर वसलेल्या कोपरगाव शहराची लोकसंख्या सुमारे १ लाखांच्या आसपास असून घरांची संख्या अंदाजे २२ हजारांच्यावर आहे. यासर्व घरांचे मैलामिश्रित सांडपाणी तसेच शहरातील ज्या ज्या उद्योगात, व्यवसायात स्वच्छतेसाठी, प्रक्रियेसाठी पाण्याचा उपयोग करून झाल्यानंतरचे अशुद्ध पाणी नदीत सोडले जाते. त्यामध्ये हे मोहनीराजनगर, के. जे. एस. कॉलेज परिसर, जिल्हा परिषदेच्या शासकीय विश्रामगृहाच्या पाठीमागील लोकवस्ती, १०५ इंदिरानगर, दत्तनगर, गोरोबानगर, गांधीनगर, गजानन नगर, स्वामी समर्थ मंदिर परिसर, दत्तपार, सराफ बाजार येथील गटारीच्या माध्यमातून वहात जाते. त्यात आणखी उर्वरित शहरातील उपनगरांचे सर्व एकत्र होते. यानंतर ते पाणी खंदकनाल्यातून २४ तास सरळसरळ नदीपात्रात सोडले जात आहे. ज्यावेळी नदी प्रवाहित असते, त्यावेळी हे सर्व पाणी नदीच्या प्रवाहात वाहून जाते. उर्वरित आठ महिने मात्र, हे अशुद्ध पाणी नदीपात्रात साचले जाते. त्यातून नदीचे मोठे प्रदूषण तर होतेच आहे. परंतु, सद्य:स्थितीत हे पाणी नदीपात्रात साचलेले असून पूर्णतः शेवाळले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी सुटली आहे. त्यामुळे डासांचे प्रमाण वाढून साथीचे आजार वाढण्याची चिन्हे आहेत.

...........

कोपरगाव शहराचे मैलामिश्रित सांडपाणी तसेच इतर दूषित पाणी गोदावरी नदीत न सोडता यावर प्रक्रिया करावी, यासाठी कोपरगाव नगरपरिषदेकडे वारंवार पत्रव्यवहार करून मागणी केली आहे. सद्य:स्थितीत नदीतील पाणी दूषित झाले आहे. डासांचे प्रमाण वाढले आहे. परंतु, याकडे नगरपरिषद प्रशासनाने दुर्लक्षच केले आहे.

-आदिनाथ ढाकणे, अध्यक्ष, गोदामाई प्रतिष्ठान, कोपरगाव.

..............

कोपरगाव शहरातील सांडपाणी व्यवस्थापनासाठी नगरपरिषदेच्यावतीने १२५ कोटीं खर्चाचा सांडपाणी पुनर्प्रक्रिया प्रकल्पाचा प्रस्ताव तयार करून मागील वर्षीच शासनाकडे पाठविला आहे. त्यावर शासनस्तरावर अद्यापपर्यंत विचार झालेला नाही.

-प्रशांत सरोदे, मुख्याधिकारी, नगरपरिषद, कोपरगाव.

....