शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

कोपरगावातील शंभर घरांमध्ये घुसले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 11:35 IST

तालुक्याच्या पश्चिम भागातील चांदेकसारे येथील आनंदवाडी परिसरात गुरुवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास अतिवृष्टी झाली.

कोपरगाव : तालुक्याच्या पश्चिम भागातील चांदेकसारे येथील आनंदवाडी परिसरात गुरुवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास अतिवृष्टी झाली. त्यात सहाशे लोकवस्तीच्या शंभर घरांना त्याचा तडाखा बसला. संजीवनी आपत्ती निवारण पथकाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी रेस्क्यू आॅपरेशन राबवून या नागरिकांची सुटका केली. परिणामी जीवितहानी झाली नाही. मात्र त्यात गायी व वीस शेळ्यांना जीव गमवावा लागला.अचानक आलेल्या पाण्यामुळे लहान मुले, मुली भयभीत झाले होते. पाण्याचा वेग एवढा प्रचंड होता, की आनंदवाडी येथील रहिवाशांच्या घरात साडेपाच फूट उंच पाणी साठून वाहत होते. पावसाच्या पाण्यामुळे रस्ता खचला असून, संसारोपयोगी वस्तू ओढ्याला आलेल्या पुराच्या पाण्यात वाहून गेल्या. त्यामुळे नागरिकांना गुरुवारची रात्र डोक्यावर घेत जागून काढावी लागली.दरम्यान, शुक्रवारी आ. स्नेहलता कोल्हे, तहसीलदार किशोर कदम, पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे, गटविकास अधिकारी कपिलनाथ कलोडे, कृषी अधिकारी अशोक आढाव व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळास भेट देऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली. आ.कोल्हे यांनी तातडीने पंचनामे करून आवश्यक ती शासकीय मदत आपत्तीग्रस्तांना देण्याच्या सूचना दिल्या. पोहेगाव पर्जन्यमापक केंद्रात गुरुवारी पडलेल्या पावसाची ७३ मिलिमीटर अशी नोंद झाली आहे.या भागातील रहिवाशांनी यापूर्वी एव्हढ्या मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी कधीही पाहिली नव्हती, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. आनंदवाडीतील आपत्तीग्रस्त नागरिकांना तूर्त चांदेकसारे येथील शाळेत पुनर्वसीत करून येथील गाळ व मृत जनावरे जेसीबीच्या साह्याने बाजूला करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. आ. कोल्हे यांनी घटनेची सर्व माहिती जिल्हाधिकारी व प्रांताधिकारी यांना दिली आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKopargaonकोपरगाव