शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

कोल्हापूर बंधाऱ्यासाठी पाणी वापर संस्था सक्तीची

By admin | Updated: March 13, 2016 23:57 IST

अहमदनगर : कोल्हापूर पद्धतीने बंधारे बांधण्यापूर्वी त्या ठिकाणी पाणी वापर संस्था स्थापन करण्याचे सक्त आदेश जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे यांनी दिले आहेत.

अहमदनगर : जिल्ह्यातील प्रत्येक गावात कोल्हापूर पद्धतीने बंधारे बांधण्यापूर्वी त्या ठिकाणी पाणी वापर संस्था स्थापन करण्याचे सक्त आदेश जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे यांनी दिले आहेत. पाणी वापर संस्था स्थापन न करता कोल्हापूर पद्धतीचा बंधारा बांधल्यास त्याची जबाबदारी संबंधीत शाखा अभियंता आणि कार्यकारी अभियंत्यांवर राहणार असल्याचे कोल्हे यांनी बजावले आहे. ३ फेबु्रवारी २०१६ ला झालेल्या लोकलेखा समितीच्या साक्षीत जिल्ह्यात जलआराखडा न बनवता लघुसिंचनाची कामे मंजूर केल्याबद्दल समितीच्या सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. यापुढे सक्तीने जलआराखडे बनविल्याशिवाय नवीन सिंचनाची कामे घेवू नयेत, असे आदेश दिलेले आहेत. जलआराखडा तयार करताना त्या भागात यापूर्वी झालेली जलसंधारणाची कामे, तेथे पडणारा पाऊस, गावातील पाण्याच्या टँकरची स्थिती आदी बाबींचा समावेश त्यात करण्यात यावा. या जलआराखड्याला जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन समितीपुढे मांडून त्यातून टंचाईग्रस्त गावांची निवड करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच २००० च्या शासन निर्णयानुसार पाणी वापर संस्था स्थापन केल्याशिवाय कोल्हापूर पद्धतीने बंधारे घेण्यात येऊ नयेत, परवानगी दिल्यास संबंधीत शाखा अभियंता आणि कार्यकारी अभियंत्यांवर राहणार आहे. संबंधीत बंधारे गेट चोरीस गेल्यास तत्काळ पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे कोल्हे यांच्या आदेशात स्पष्ट करण्यात आले. नव्याने या ठिकाणी गेटची खरेदी न करण्याच्या त्यांच्या सूचना आहेत. (प्रतिनिधी)