शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

कोल्हापूर बंधाऱ्यासाठी पाणी वापर संस्था सक्तीची

By admin | Updated: March 13, 2016 23:57 IST

अहमदनगर : कोल्हापूर पद्धतीने बंधारे बांधण्यापूर्वी त्या ठिकाणी पाणी वापर संस्था स्थापन करण्याचे सक्त आदेश जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे यांनी दिले आहेत.

अहमदनगर : जिल्ह्यातील प्रत्येक गावात कोल्हापूर पद्धतीने बंधारे बांधण्यापूर्वी त्या ठिकाणी पाणी वापर संस्था स्थापन करण्याचे सक्त आदेश जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे यांनी दिले आहेत. पाणी वापर संस्था स्थापन न करता कोल्हापूर पद्धतीचा बंधारा बांधल्यास त्याची जबाबदारी संबंधीत शाखा अभियंता आणि कार्यकारी अभियंत्यांवर राहणार असल्याचे कोल्हे यांनी बजावले आहे. ३ फेबु्रवारी २०१६ ला झालेल्या लोकलेखा समितीच्या साक्षीत जिल्ह्यात जलआराखडा न बनवता लघुसिंचनाची कामे मंजूर केल्याबद्दल समितीच्या सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. यापुढे सक्तीने जलआराखडे बनविल्याशिवाय नवीन सिंचनाची कामे घेवू नयेत, असे आदेश दिलेले आहेत. जलआराखडा तयार करताना त्या भागात यापूर्वी झालेली जलसंधारणाची कामे, तेथे पडणारा पाऊस, गावातील पाण्याच्या टँकरची स्थिती आदी बाबींचा समावेश त्यात करण्यात यावा. या जलआराखड्याला जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन समितीपुढे मांडून त्यातून टंचाईग्रस्त गावांची निवड करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच २००० च्या शासन निर्णयानुसार पाणी वापर संस्था स्थापन केल्याशिवाय कोल्हापूर पद्धतीने बंधारे घेण्यात येऊ नयेत, परवानगी दिल्यास संबंधीत शाखा अभियंता आणि कार्यकारी अभियंत्यांवर राहणार आहे. संबंधीत बंधारे गेट चोरीस गेल्यास तत्काळ पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे कोल्हे यांच्या आदेशात स्पष्ट करण्यात आले. नव्याने या ठिकाणी गेटची खरेदी न करण्याच्या त्यांच्या सूचना आहेत. (प्रतिनिधी)