शहरं
Join us  
Trending Stories
1
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
2
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
3
"खू्प कर्ज झालंय..."; सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय?
4
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
5
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
6
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!
7
ऑनलाईन App वरुन ऑर्डर केलं जेवण अन् डिलिव्हरी बॉयच्याच पडली प्रेमात, आता केलं लग्न
8
अष्टविनायक चित्रपटातील साधीभोळी गणेशभक्त वीणा आता दिसते अशी, अनेक वर्षे होती चित्रपटांपासून दूर
9
"सूनेने गोळी मारून हत्या केली, माझा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता"; तीन महिन्यातच पतीची हत्या
10
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
11
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
12
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
13
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
14
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
15
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
16
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
17
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
18
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
19
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
20
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता

चौघा तरुणांना जलसमाधी

By admin | Updated: April 15, 2016 23:12 IST

शेवगाव/ कोपरगाव(अहमदनगर) : दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या चौघा तरुणांना जलसमाधी मिळाल्याची दुर्दैवी घटना

पोहणे बेतले जिवावर : राक्षी व सोनारी गावावर शोककळा

शेवगाव/ कोपरगाव(अहमदनगर) : दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या चौघा तरुणांना जलसमाधी मिळाल्याची दुर्दैवी घटना घडली़ पहिल्या घटनेतील मुले शेवगाव तालुक्यातील राक्षी येथील शेततळ्यात पोहण्यासाठी उतरले होते़ तर दुसऱ्या घटनेतील तरुण कोपरगाव तालुक्यातील सोनारी येथे विहिरीत पोहण्यासाठी गेले होते़ शेवगाव तालुक्यातील राक्षी येथे शुक्रवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास उन्हाळी सुट्ट्या असल्याने अक्षय रामेश्वर झुंबड, अक्षय बाळासाहेब मगर (वय १८) व विशाल प्रकाश मगर (वय १४) ही तीन शाळकरी मुले माळरानावर गुरे चारण्यासाठी गेले होते. दरम्यान, राक्षी-कुरुडगाव रस्त्यावरील रामनाथ काळे यांच्या शेततळ्यात पोहण्यासाठी हे मुले उतरले. परंतु तिघांनाही पोहता येत नसल्याने तसेच पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने यातील अक्षय झुंबड व अक्षय मगर हे दोघे पाण्यात बुडाले़ तर तेथे जमलेल्या लोकांनी दोर सोडून विशाल मगर याला कसेबसे शेततळ्याबाहेर काढले. अत्यवस्थ असलेल्या विशाल यास पुढील उपचारासाठी नगर येथे हलविण्यात आले. बहिणीच्या लग्नासाठी नोकरीच्या ठिकाणाहून गावाकडे आलेल्या दोन सख्या भावांचा विहिरीत पोहोताना मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी (दि़१४) सायंकाळी कोपरगाव तालुक्यातील सोनारी गावात घडली़ विक्रांत अर्जुन शेलार (वय २४) व विशाल अर्जुन शेलार (वय २१) अशी मयतांची नावे आहेत़ विक्रांत हा सुरत येथे तर विशाल जळगाव येथे नोकरीस होता़ गुरुवारी (दि़ १४) शेतातील विहिरीत ते पोहण्यासाठी गेले़ प्रथम विक्रांतने विहिरीत उडी घेतली़ तो गटांगळ्या खात असल्याचे पाहून विशालनेही उडी घेतली़ तेव्हा विक्रांतने विशालला मिठी मारली़ त्यामुळे दुर्दैवाने दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला़ (प्रतिनिधी) ़़़़़़़़़़़़ दोघे एकुलेत एक राक्षी येथे घडलेल्या या दुर्घटनेतील मयत अक्षय झुंबड, अक्षय मगर या दोघांनी नुकतीच बारावीची परीक्षा दिली होती़ उन्हाळी सुट्टीचा आनंद लुटत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने दोघांना जीव गमवावा लागला़ हे दोघेही आई-वडिलांना एकुलते एक होते. ़़़़़़़़ बहिणीचे लग्न दोन दिवसांवर आणि काळ ओढावला विक्रांत शेलार व विशाल शेलार हे दोघे सख्खे भाऊ होते़ त्यांच्या बहिणीचे लग्न १७ एप्रिलला होते़ लग्नाच्या तयारीसाठी विक्रांत व विशाल दोघे भाऊ सोनारी येथे आले़ बहिणीचे लग्न दोन दिवसांवर असतानाच काळाने या सख्या भावांवर घाला घातला़