शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

तान्हुल्या पाडसाला वाचविण्यासाठी हरिणीची जीवघेणी लढाई

By admin | Updated: May 4, 2017 13:36 IST

चहूबाजूंनी कुत्र्यांनी हल्ला चढविलेला आणि पाडसाला वाचविण्यासाठी हरिणीचा आटापिटा चाललेला़़ कुत्र्यांचा हल्ला परतवून लावित ती तान्हुल्या पाडसाला वाचविते़

आॅनलाइन लोकमतअहमदनगर, दि़ ४ - चहूबाजूंनी कुत्र्यांनी हल्ला चढविलेला आणि पाडसाला वाचविण्यासाठी हरिणीचा आटापिटा चाललेला़़ कुत्र्यांचा हल्ला परतवून लावित ती तान्हुल्या पाडसाला वाचविते़ मात्र, काही वेळानंतर पुन्हा कुत्र्यांचा हल्ला होतो़ तीची पुन्हा पाडसाला वाचविण्यासाठी कुत्र्यांसोबत लढाई सुरु होते़़ हे दृष्य वन्यप्रेमींच्या दृष्टीस पडल्यांनतर अखेर जीवघेण्या लढाईतून या मायलेकींना जीवदान मिळाले़ ही घटना कामरगाव येथे घडली़नगर-पुणे महामार्गावरील चास घाटानजिक नायकी शिवारात बुधवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ओढ्याच्या झाडीत आडोशाला हरिणीची प्रसुती होत होती. गोंडस पाडसाला तिने जन्म दिला. त्याचवेळी या पाडसाची शिकार करण्यासाठी चार ते पाच कुत्रे टपून बसले होते़ हरिणीची नजर चुकवून हे कुत्रे त्या पाडसावर हल्ला चढवित़ मात्र, हरिण प्रत्येकवेळी कुत्र्यांचा हल्ला परतवून लावित पाडसाचा जीव वाचवित होती़ कुत्रे हरिणीकडे धावून जात अन् पुन्हा पळत मागे येत असल्याचे दूरुनच बाळासाहेब देशमुख यांनी पाहिले़ त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता हरिणीच्या पाडसावर कुत्रे हल्ला करीत असल्याचे देशमुख यांना दिसले़ त्यांनी कुत्र्यांना हुसकावले़ पण कुत्रे तेथून दूर जाईनात़ हरिण व पाडसाला वाचविण्यासाठी देशमुख यांनी फोनवरुन हा घटनाक्रम वन्यप्राणी सेवा समितीचे तुकाराम कातोरे, विक्रम साठे, श्याम जाधव यांना सांगितला. त्यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन कुत्र्यांना पिटाळून लावले व जखमी पाडसावर प्रथमोपचार केले़ नंतर त्याला दूध पाजले. हरीण मात्र दूरवरुन टेहळणी करीत होती. नंतर सर्वांनी पाडसाला हरिणीच्या जवळ नेऊन सोडले़ पाडसाला घेऊन हरणीने जंगलाकडे धाव घेतली.वनविभागाचे दुर्लक्षकामरगाव-चास-वाळवणे हद्दीत वनविभागाची ५० ते ६० हेक्टर जमीन आहे. हरीण, ससे, तरस, लांडगे यांच्यासह अनेक वन्यजीव या परिसरात आसरा घेतात़ मात्र, पाण्यासाठी मानवी वस्तीकडे आलेल्या प्राण्यांना अनेकदा जीव गमवावा लागतो. वनविभागाला जंगलात पाणवठे करणे शक्य असताना वनविभाग याकडे दुर्लक्ष करीत आहे, असे वन्यजीव सेवा समितीने ‘लोकमत’ला सांगितले़