शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

कोपरगावच्या पाणी प्रश्नाबाबत वहाडणे यांनी गैरसमज पसरविले - के. एस. रेड्डी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2019 12:51 IST

कोपरगाव नगरपरिषदेच्या पाच नंबर साठवण तलावाच्या खोदाईच्या कामासंदर्भात नगरपरिषदेचे नगराध्यक्ष विजय वहाडणे वारंवार चुकीची वस्तुस्थिती जनतेपर्यंत पोहोचवत

कोपरगाव : कोपरगाव नगरपरिषदेच्या पाच नंबर साठवण तलावाच्या खोदाईच्या कामासंदर्भात नगरपरिषदेचे नगराध्यक्ष विजय वहाडणे वारंवार चुकीची वस्तुस्थिती जनतेपर्यंत पोहोचवत असल्याचा खुलासा गायत्री कन्स्ट्रक्शन कंपनीचे व्हाईस प्रेसिडेंट के. एस. रेड्डी यांनी केला आहे. मंगळवारी  रेड्डी यांनी पत्रकार परिषद घेऊन पाच नंबर साठवण तलावाच्या कामासंदर्भात घटनाक्रम सांगितला. रेड्डी म्हणाले, गायत्री कन्स्ट्रक्शनचे काम रस्ते बनविण्याचे आहे. या कंपनीमार्फत मुंबई - नागपूर समृध्दी महामार्गाचे काम चालू आहे. या रस्त्याच्या भरावासाठी तीन किलोमीटर अंतरातून माती व मुरूम घेतला जातो. तेथील शेतक-यांना विनामूल्य शेततळे तयार करून दिले जाते. आमदार स्नेहलता कोल्हे यांनी आम्हांला १५ जानेवारी २०१९ रोजी समृध्दी महामार्ग भरावासाठी मोठ्या प्रमाणात माती व मुरूम लागणार आहे. त्यासाठी कोपरगाव नगरपालिकेने प्रस्तावित केलेल्या साठवण तलाव क्रमांक ५ मध्ये खोदकाम करून माती व मुरूम उचलावा याबाबतचे पत्र दिले. कोपरगावच्या पिण्याच्या पाण्याची दाहकता लक्षात घेऊन आम्ही या कामास संमती दिली. यावर आम्ही नगरपालिकेला पत्र देऊन तलाव ते समृध्दी महामार्ग हे अंतर १५ किलोमीटर आहे. त्यासाठी आम्हाला ५ कोटी रूपयांचा वाहतूक खर्च लागणार आहे, असे कळविले.  दरम्यान जिल्हाधिकारी यांच्याशी या कामाबाबात सविस्तर चर्चा करून माती उचलण्यासाठी लागणारा पैसा आम्ही एकटे खर्च करू शकत नाही. पालिकेने अधिकचा खर्च द्यावा व यासंदर्भात शासकीय टेंडर काढून माती उचलण्याची परवानगी द्यावी. आवश्यक  त्या कागदपत्रांची पूर्तता पालिकेने करून द्यावी, असे  सांगितले. मात्र पालिकेने अद्याप कुठलीही कागदपत्रे आम्हाला दिलेली नाहीत.या कामासंदर्भात जिल्हाधिकारी व आपली बैठक आटोपल्यानंतर आशुतोष काळे यांची जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दालनाबाहेर भेट झाली त्यावेळीही त्यांना आपण स्पष्ट कल्पना दिली की,तीन किलोमीटर अंतरातील वाहतुकीची परवानगी आहे. मात्र पालिकेचा साठवण तलाव पंधरा किलोमीटर अंतरावर आहे. या तलावाची माती नेण्यास आपण तयार आहोत. मात्र वाहतुकीला लागणारा खर्च नगरपालिकेने करावा. नगराध्यक्ष विजय वहाडणे हे देखील आपल्याला दोन वेळा भेटले आहेत. त्यांनाही आम्ही वरीलप्रमाणेच सांगितले. मार्चपर्यंत रस्त्याच्या कामाला मातीची गरज आहे. तोपर्यंत नगरपालिकेने टेंडर काढावे असेही पालिकेला कळविण्यात आले असल्याचे कंपनीने सांगितले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKopargaonकोपरगाव