शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

वांबोरीचे पाणी : चारीच्या कामातच तांत्रिक त्रुटी

By सुधीर लंके | Updated: October 27, 2018 11:35 IST

वांबोरी पाईप चारीचे पाणी १०२ तलावांसाठी प्रस्तावित असले तरी यातील जास्तीत जास्त पाणी ६० तलावांतच पोहोचते.

सुधीर लंकेअहमदनगर : वांबोरी पाईप चारीचे पाणी १०२ तलावांसाठी प्रस्तावित असले तरी यातील जास्तीत जास्त पाणी ६० तलावांतच पोहोचते. उर्वरित तलावांत तांत्रिक अडचणींमुळे पुरेसे पाणी पोहोचत नाही, असे प्रशासनाचेही सर्वेक्षण आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. सरकारने यावर अद्याप उपाययोजना केलेली नाही.वांबोरी पाईप चारीद्वारे राहुरी, नगर, नेवासा व पाथर्डी या चार तालुक्यातील साडेतीन हजार हेक्टर क्षेत्र अप्रत्यक्ष ओलिताखाली येईल, असे स्वप्न पाहण्यात आले होते. मात्र, १३६ कोटीपेक्षा अधिक खर्च झालेल्या या योजनेतून हे स्वप्न अद्याप साकारलेले नाही. या चारीद्वारे नगर तालुक्यातील १६, राहुरी ३८, नेवासा १५ व पाथर्डी तालुक्यातील ३३ असे १०२ तलाव भरणे अपेक्षित आहे. मात्र, यातील ६५ तलावांतच पाणी पोहोचते.उर्वरित तलावांत उंचीमुळे पाणी पोहोचत नाही. याचा फटका मढी, तिसगाव या परिसराला बसतो. हा परिसर चढावर असल्याने या भागात पाणी सोडताच मागील पाईपलाईनला गळती लागते.एकाच वेळी १०२ तलावांत पाणी पोहोचायला हवे, अशा पद्धतीचा हा प्रकल्प आहे. मात्र, सर्व तलावांत पाणीच पोहोचत नाही. मध्यम प्रकल्प विभागामार्फत या योजनेचे काम करण्यात आले आहे. जो भाग उंचावर असेल तेथील चढ काढूनच चारी टाकणे आवश्यक होते. मात्र त्या बाबीची पूर्तता झालेली दिसत नाही. त्यामुळे संबंधित ठेकेदाराचे बिलही थांबविण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.च्या चारीच्या लाभक्षेत्रातील चारही तालुक्यांत शिवाजी कर्डिले, मोनिका राजळे व बाळासाहेब मुरकुटे हे भाजपचे आमदार आहेत. खासदार दिलीप गांधी हेही भाजपचे आहेत. राज्यात व केंद्रात भाजपचीच सत्ता असल्याने या योजनेतील त्रुटी दूर करुन सरकार तोडगा काढू शकते. मात्र, आमदार-खासदार काय भूमिका घेतात याकडे शेतकºयांचे लक्ष आहे. ब-याचदा केवळ निवडणुकांच्या काळात या चारीचा प्रश्न काढला जातो व नंतर त्याकडे दुर्लक्ष केले जाते, असाही शेतक-यांचा अनुभव आहे. या चारीवर अवलंबून असणारे शेतकरी निवडणुकांत याबाबत जाब विचारण्याची शक्यता आहे.चारीत ज्या तांत्रिक अडचणी आहेत त्याबाबत या योजनेचे काम करणाºया संबंधित विभागाला कळविण्यात आले आहे. सर्व तलावांत पाणी पोहोचत नाही हे वास्तव आहे. - आर.पी. मोरे, कार्यकारी अभियंता.

(क्रमश:)

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरीPathardiपाथर्डी