शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

निंबोडीच्या ग्रामस्थांनी शाळेला ठोकले कुलुप, नवीन इमारतीची मागणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 13:27 IST

शाळेची इमारत कोसळून तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याने संतप्त गावक-यांनी गावातील शाळेला कुलूप ठोकले असून नवीन इमारत उभी करेपर्यत मुले शाळेत न पाठविण्याचा निर्णय घेतला. या घटनेचा निषेध म्हणून ग्रामस्थानी अहमदनगर - बीड राज्यमार्र्गावर दोन तास रास्ता रोको करण्यात आले.

ठळक मुद्देअहमदनगर - बीड राज्यमार्गावर दोन तास रास्तोरोको गावात उभारणार फायबरचे वर्ग 

लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : शाळेची इमारत कोसळून तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याने संतप्त गावक-यांनी गावातील शाळेला कुलूप ठोकले असून नवीन इमारत उभी करेपर्यत मुले शाळेत न पाठविण्याचा निर्णय घेतला. या घटनेचा निषेध म्हणून ग्रामस्थानी अहमदनगर - बीड   राज्यमार्र्गावर दोन तास रास्ता रोको करण्यात आले. यावेळी आ. शिवाजी कर्डीले, आ. राहुल जगताप, शिवसेनेचे दक्षिण जिल्हा प्रमुख प्रा. शशिकांत गाडे, संदेश कार्ले, घनश्याम शेलार, संपत म्हस्के यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने रास्तारोकोत सहभागी झाले होते. 

सोमवारी सायंकाळच्या सुमारास शाळेची इमारत कोसळून दुर्घटना घडली. तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. यामुळे संतप्त ग्रामस्थांनी गावातील शाळेच्या उर्वरित खोल्यांना कुलुप ठोकण्यात आल्यानंतर अहमदनगर- बीड  राज्यमार्गावर सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास रास्तोरोकोस सुरुवात केली. तसेच जोपर्यत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यत माघार घेणार नसल्याची भुमिका ग्रामस्थांनी घेतली. यावेळी गावात दुसरी शाळा उभारण्याची मागणीही करण्यात आली. तसेच मयतांच्या कुटुबियांना जास्तीत जास्त शासकिय मदत मिळावी. सद्यस्थितीतील शाळा ओढ्याच्या कडेला असल्याने सर्व वर्ग पाडण्यात यावेत. शाळा सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करुन नवीन वर्ग उभारावेत. जखमींचा सर्व खर्च शासनाने करावा, यासह विविध मागण्या यावेळी ग्रामस्थांनी केल्या.

आ.शिवाजी कर्डीले यांनी ग्रामस्थांना रास्तारोको मागे घेण्याचे आवाहन करत दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. फोनवरुन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याशी संपर्क साधला. यावेळी तावडे यांनी गावक-यांच्या सर्व मागण्या मान्य करत असून येत्या आठ दिवसात नवीन शाळेसाठी सर्व मदत करु असे आश्वासन दिले. त्यानंतर साडेअकरा वाजण्याच्या सुमारास रास्ता रोको मागे घेण्यात आला. 

फायबरचे वर्ग उद्यापासून उभारणार दरम्यान ग्रांमस्थांनी शाळेला कुलुप ठोकून विद्यार्र्थी शाळेत न पाठविण्याची भुमिका घेतली. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून उद्यापासून फायबरचे वर्ग उभारण्यात येणार असल्याचे आ. शिवाजी कर्डीले यांनी यावेळी सांगितले. 

ग्रामस्थांच्या मागण्यामयतांच्या कुटुबियांना जास्तीत जास्त शासकिय मदत मिळावी. सद्यस्थितीतील शाळा ओढ्याच्या कडेला असल्याने सर्व वर्ग पाडण्यात यावेत.गावात सुरक्षित ठिकाणी दुसरी शाळा उभारण्यात यावी.जखमींचा सर्व खर्च शासनाने करावा.