शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

राळेगणसिद्धी ‘उर्जा’ देणारे गाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 15:22 IST

अहमदनगर : राळेगणसिद्धीतून देशाला विकासाची उर्जा मिळते. देशातील पहिला पथदर्शी सौरउर्जा प्रकल्पही राळेगणसिद्धीतून सुरू होत आहे. सौरउर्जा प्रकल्पामुळे शेतक-यांना मुबलक वीज मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

ठळक मुद्देमुख्यमंत्री : सौरप्रकल्पाचे भूमिपूजन

अहमदनगर : राळेगणसिद्धीतून देशाला विकासाची उर्जा मिळते. देशातील पहिला पथदर्शी सौरउर्जा प्रकल्पही राळेगणसिद्धीतून सुरू होत आहे. सौरउर्जा प्रकल्पामुळे शेतक-यांना मुबलक वीज मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.राळेगणसिद्धी (ता. पारनेर) येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी योजनेच्या सौर प्रकल्पाचे भूमिपूजन झाले. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. या कार्यक्रमास ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, उर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे, खासदार दिलीप गांधी, आ. विजय औटी, आ. शिवाजी कर्डिले आदी उपस्थित होते.मुख्यमंत्री म्हणाले, सौर उर्जा प्रकल्प आणि ग्रामसुरक्षा दल कायद्याची अंमलबजावणी देशात राळेगणसिद्धीतूनच प्रथम होत आहे. अण्णा हजारे आणि पोपटराव पवार हे दोन विकासपुरुष राळेगणसिद्धीने देशाला दिले आहेत. त्या अर्थाने राळेगणसिद्धी हे देशाला ‘उर्जा’ देणारे गाव आहे. तीन महिन्यात राळेगणसिद्धीतील सौरप्रकल्प पूर्ण होईल. सौरउर्जा प्रकल्पाची अन्य राज्यात अंमलबजावणी करण्यासाठी विचारणा सुरू झाली आहे. पूर्वी सहा रुपये दराने वीज खरेदी करावी लागायची, ती आता अडीच रुपये प्रतियुनिट दराने वीज मिळणार आहे. त्यासाठी तोटा भरून काढण्यासाठी द्यावी लागणारी सरकारची दहा हजार कोटीची सबसिडी वाचणार आहे. सौर प्रकल्पामुळे शेतक-यांना बारा तास वीज मिळणार आहे.ग्रामसुरक्षा दल कायद्याची अंमलबजावणीची जबाबदारी ही कायद्यापेक्षा ग्रामस्थांचीच आहे. हा कायदा करून थांबणार नाही तर अवैध दारुबाबत जागृती करण्याबाबत गावोगावी फिरणार असल्याचे अण्णा हजारे यांनी मला आश्वस्त केले आहे. त्यामुळे या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. तसेच पाणलोटाद्वारे विहीर पुर्नभरणाच्या माध्यमातून राज्यातील २० हजार गावे दुष्काळमुक्त करण्याचे नियोजन असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.--सभेत गोंधळएका अपंग तरुणाला रोजगार मिळत नसल्याने त्याला मुख्यमंत्र्यांना भेटून निवेदन द्यायचे होते. त्याला पोलिसांनी अटकाव केल्याने पोलिसांचे सुरक्षाकडे तोडून त्याने मुख्यमंत्र्यांकडे धाव घेतली. यामुळे पोलिसांची धावपळ उडाली, तर सभेत गोंधळ झाला. सभेत बाटली भिरकावण्याचा कोणताही प्रकार झाला नाही.---