शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
3
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
4
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
5
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
6
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
7
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
8
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
9
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
10
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
11
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
12
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
13
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
14
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
15
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
16
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
17
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
18
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
19
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
20
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!

राळेगणसिद्धी ‘उर्जा’ देणारे गाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 15:22 IST

अहमदनगर : राळेगणसिद्धीतून देशाला विकासाची उर्जा मिळते. देशातील पहिला पथदर्शी सौरउर्जा प्रकल्पही राळेगणसिद्धीतून सुरू होत आहे. सौरउर्जा प्रकल्पामुळे शेतक-यांना मुबलक वीज मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

ठळक मुद्देमुख्यमंत्री : सौरप्रकल्पाचे भूमिपूजन

अहमदनगर : राळेगणसिद्धीतून देशाला विकासाची उर्जा मिळते. देशातील पहिला पथदर्शी सौरउर्जा प्रकल्पही राळेगणसिद्धीतून सुरू होत आहे. सौरउर्जा प्रकल्पामुळे शेतक-यांना मुबलक वीज मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.राळेगणसिद्धी (ता. पारनेर) येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी योजनेच्या सौर प्रकल्पाचे भूमिपूजन झाले. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. या कार्यक्रमास ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, उर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे, खासदार दिलीप गांधी, आ. विजय औटी, आ. शिवाजी कर्डिले आदी उपस्थित होते.मुख्यमंत्री म्हणाले, सौर उर्जा प्रकल्प आणि ग्रामसुरक्षा दल कायद्याची अंमलबजावणी देशात राळेगणसिद्धीतूनच प्रथम होत आहे. अण्णा हजारे आणि पोपटराव पवार हे दोन विकासपुरुष राळेगणसिद्धीने देशाला दिले आहेत. त्या अर्थाने राळेगणसिद्धी हे देशाला ‘उर्जा’ देणारे गाव आहे. तीन महिन्यात राळेगणसिद्धीतील सौरप्रकल्प पूर्ण होईल. सौरउर्जा प्रकल्पाची अन्य राज्यात अंमलबजावणी करण्यासाठी विचारणा सुरू झाली आहे. पूर्वी सहा रुपये दराने वीज खरेदी करावी लागायची, ती आता अडीच रुपये प्रतियुनिट दराने वीज मिळणार आहे. त्यासाठी तोटा भरून काढण्यासाठी द्यावी लागणारी सरकारची दहा हजार कोटीची सबसिडी वाचणार आहे. सौर प्रकल्पामुळे शेतक-यांना बारा तास वीज मिळणार आहे.ग्रामसुरक्षा दल कायद्याची अंमलबजावणीची जबाबदारी ही कायद्यापेक्षा ग्रामस्थांचीच आहे. हा कायदा करून थांबणार नाही तर अवैध दारुबाबत जागृती करण्याबाबत गावोगावी फिरणार असल्याचे अण्णा हजारे यांनी मला आश्वस्त केले आहे. त्यामुळे या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. तसेच पाणलोटाद्वारे विहीर पुर्नभरणाच्या माध्यमातून राज्यातील २० हजार गावे दुष्काळमुक्त करण्याचे नियोजन असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.--सभेत गोंधळएका अपंग तरुणाला रोजगार मिळत नसल्याने त्याला मुख्यमंत्र्यांना भेटून निवेदन द्यायचे होते. त्याला पोलिसांनी अटकाव केल्याने पोलिसांचे सुरक्षाकडे तोडून त्याने मुख्यमंत्र्यांकडे धाव घेतली. यामुळे पोलिसांची धावपळ उडाली, तर सभेत गोंधळ झाला. सभेत बाटली भिरकावण्याचा कोणताही प्रकार झाला नाही.---