शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
3
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
4
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
5
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
6
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
7
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
8
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
9
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
10
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
11
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
12
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
13
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
14
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
15
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
16
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
17
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
18
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
19
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
20
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."

निधीअभावी खेडे ‘आऊट आॅफ रेंज’

By admin | Updated: April 27, 2016 23:51 IST

अण्णा नवथर, अहमदनगर सरकारने प्रशासकीय सेवा आॅनलाईन पुरविण्याचा धडाका लावला आहे़ सातबारा आॅनलाईन करण्यापर्यंत प्रशासनाने मजल मारली़

अण्णा नवथर, अहमदनगरसरकारने प्रशासकीय सेवा आॅनलाईन पुरविण्याचा धडाका लावला आहे़ सातबारा आॅनलाईन करण्यापर्यंत प्रशासनाने मजल मारली़ मात्र, ग्रामीण भागात रेंज पुरविण्यासाठी आवश्यक सुविधा अद्याप सरकारकडून पुरविल्या गेल्या नाहीत़ जिल्हा प्रशासनाने ५० लाखांचा प्रस्ताव तयार केला़ परंतु निधीची कुठे तरतूद नाही़ आडातच नाही तर पोहऱ्यात येणार कुठून, असा प्रश्न आहे़ प्रशासकीय सेवा पुरविण्यासाठी माहिती आणि तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करण्याचे सरकारचे धोरण आहे़ सरकारने लालफितीचा कारभार हटवून बहुतांश सेवा आॅनलाईन केल्या आहेत़ त्यामुळे प्रशासनाचा कारभार कागदावर गतिमान झाला़ मात्र, ही सेवा सुरू करताना त्यासाठी आवश्यक सुविधा पुरविण्याकडे शासनाचे दुर्लक्ष झाले़ परिणामी ग्रामीण भागात या सेवेचा पुरता बोजवारा उडाला आहे़ त्याचे परिणाम सर्वत्र दिसू लागले आहेत़ विशेषकरुन ग्रामीण भागात आॅनलाईन सेवा ठप्प झाली आहे़ ग्रामीण भागात रेंज मिळावी, यासाठी सुविधा पुरविण्याची मागणी जिल्ह्यातून पुढे आली़ त्याची दखल घेऊन जिल्हा प्रशासनाने बीएसएनलशी चर्चा करून ५० लाख रुपयांचा प्रस्ताव तयार केला़ त्यामध्ये १४ तालुक्यांच्या मुख्यालयी वर्क स्टेशन उभारणे, देखभाल- दुरुस्तीसाठी तांत्रिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे, तलाठींना नवीन लॅपटॉप आदींचा समावेश आहे़ हा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने राज्याच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाकडे पाठविला आहे़ मात्र, त्यास अद्याप मंजुरी मिळाली नाही़ त्यामुळे आॅनलाईन सेवा पुरविण्यासाठी आवश्यक सुविधा पुरविणे प्रशासनाला अशक्य झाले आहे़ यावर कळस असा की, हा खर्च कशातून करायचा, यावर सध्या मंथन सुरू आहे़ राज्याच्या अर्थसंकल्पातही याविषयी निधीची तरतूद नसल्याने ग्रामीण भागात रेंजचा प्रश्न निर्माण झाला आहे़ आॅनलाईन सातबारा करण्यात नगर जिल्ह्याने आघाडी घेतली़ जिल्ह्यातील १४ तालुक्यातील सातबारांचे संगणकीकरण करून ते पुणे येथील जमाबंदी आयुक्त कार्यालयाकडे पाठविण्यात आले़ या कार्यालयाने नगर जिल्ह्यातील १४ तालुक्यातील सातबारे आॅनलाईन केले आहेत़ हस्तलिखित सातबारा देणे बंद करण्यात आले़ त्यामुळे आॅनलाईन सातबारा तर सोडाच पण, आता हस्तलिखित सातबारा मिळणे कठीण झाल्याने तलाठी व मंडल अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे़