शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

श्रीरामपुरात गावचे प्रश्न आणि गावचेच नेतृत्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:50 IST

शिवाजी पवार श्रीरामपूर : श्रीरामपूर तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये तालुक्यातील बड्या राजकीय नेत्यांचे अस्तित्व केवळ पत्रके आणि फलकांपुरतेच मर्यादित ...

शिवाजी पवार

श्रीरामपूर : श्रीरामपूर तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये तालुक्यातील बड्या राजकीय नेत्यांचे अस्तित्व केवळ पत्रके आणि फलकांपुरतेच मर्यादित राहिले आहे. गावच्या कारभारी निवडीमध्ये नेत्यांचा कोणताही हस्तक्षेप येथे दिसून आला नाही. गावचे प्रश्न आणि गावचे नेतृत्व याच बळावर निवडणुका लढविल्या जात असून नेेते मात्र केवळ आधारस्तंभ आणि खंबीर साथ यापुरतेच उरले आहेत.

कोणत्याही ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत तालुका पातळीवरील बड्या नेत्याने सहभाग नोंदविलेला नाही. माजी आमदार भानुदास मुरकुटे, जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे हे निवडणुकीपासून लांब राहिल्याचे चित्र आहे. काँग्रेसचे आमदार लहू कानडे यांनी प्रारंभीच ग्रामसभांना मिळालेल्या अधिकारांचा वापर करत बिनविरोध निवडणुकांचा आग्रह धरला होता. भाजप नेते आमदार राधाकृष्ण विखे यांनीही आपल्या समर्थकांना बिनविरोध निवडणुका करण्याचे सूचित केले होते.

मात्र असे असले तरी केवळ खानापूर येथील निवडणूक बिनविरोध पार पडली. अन्य २६ ग्रामपंचायती मात्र सर्वत्र चुरशीने लढविल्या जात आहेत. मात्र त्यात नेत्यांचा कोणताही हस्तक्षेप नाही. पूर्वी उमेदवारी वाटपामध्ये नेत्यांच्या शब्दाला महत्त्व होते. गावची निवडणूक स्थानिक कोणत्या नेत्याच्या नेतृत्वाखाली लढवावी, याचेही निर्देश ते देत होते.

ग्रामपंचायत निवडणुकीकडे कार्यकर्ता निर्माण करण्याच्या प्रक्रियेचा भाग म्हणून नेते मंडळी पाहत होती. आता मात्र स्थानिक कार्यकर्त्यांच्याच हवाली सर्व सूत्रे देण्यात आली आहेत. कार्यकर्त्यांनीही आपल्या सोयीनुसार गावात आघाड्या केल्या आहेत.

-----------

प्रतिमा जपण्याचा प्रयत्न

ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये हस्तक्षेप केल्यास तालुक्यातील बड्या नेत्यांना आरोप प्रत्यारोपाला सामोरे जावे लागते. त्यातून प्रतिमेला धक्का बसण्याची भीती असते. त्यामुळे नेते निवडणुकीपासून दूर आहेत. तालुक्याच्या राजकारणात सर्वमान्य नेतृत्वाचा मोठा अभाव आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींमध्ये हस्तक्षेप करून आपला शिक्का चालेल याचीही त्यांना शाश्वती नाही. त्यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांनी राजकीय सोय पाहून झेंडे हाती घेतले आहेत.

----------