शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

श्रीरामपुरात गावचे प्रश्न आणि गावचेच नेतृत्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:50 IST

शिवाजी पवार श्रीरामपूर : श्रीरामपूर तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये तालुक्यातील बड्या राजकीय नेत्यांचे अस्तित्व केवळ पत्रके आणि फलकांपुरतेच मर्यादित ...

शिवाजी पवार

श्रीरामपूर : श्रीरामपूर तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये तालुक्यातील बड्या राजकीय नेत्यांचे अस्तित्व केवळ पत्रके आणि फलकांपुरतेच मर्यादित राहिले आहे. गावच्या कारभारी निवडीमध्ये नेत्यांचा कोणताही हस्तक्षेप येथे दिसून आला नाही. गावचे प्रश्न आणि गावचे नेतृत्व याच बळावर निवडणुका लढविल्या जात असून नेेते मात्र केवळ आधारस्तंभ आणि खंबीर साथ यापुरतेच उरले आहेत.

कोणत्याही ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत तालुका पातळीवरील बड्या नेत्याने सहभाग नोंदविलेला नाही. माजी आमदार भानुदास मुरकुटे, जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे हे निवडणुकीपासून लांब राहिल्याचे चित्र आहे. काँग्रेसचे आमदार लहू कानडे यांनी प्रारंभीच ग्रामसभांना मिळालेल्या अधिकारांचा वापर करत बिनविरोध निवडणुकांचा आग्रह धरला होता. भाजप नेते आमदार राधाकृष्ण विखे यांनीही आपल्या समर्थकांना बिनविरोध निवडणुका करण्याचे सूचित केले होते.

मात्र असे असले तरी केवळ खानापूर येथील निवडणूक बिनविरोध पार पडली. अन्य २६ ग्रामपंचायती मात्र सर्वत्र चुरशीने लढविल्या जात आहेत. मात्र त्यात नेत्यांचा कोणताही हस्तक्षेप नाही. पूर्वी उमेदवारी वाटपामध्ये नेत्यांच्या शब्दाला महत्त्व होते. गावची निवडणूक स्थानिक कोणत्या नेत्याच्या नेतृत्वाखाली लढवावी, याचेही निर्देश ते देत होते.

ग्रामपंचायत निवडणुकीकडे कार्यकर्ता निर्माण करण्याच्या प्रक्रियेचा भाग म्हणून नेते मंडळी पाहत होती. आता मात्र स्थानिक कार्यकर्त्यांच्याच हवाली सर्व सूत्रे देण्यात आली आहेत. कार्यकर्त्यांनीही आपल्या सोयीनुसार गावात आघाड्या केल्या आहेत.

-----------

प्रतिमा जपण्याचा प्रयत्न

ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये हस्तक्षेप केल्यास तालुक्यातील बड्या नेत्यांना आरोप प्रत्यारोपाला सामोरे जावे लागते. त्यातून प्रतिमेला धक्का बसण्याची भीती असते. त्यामुळे नेते निवडणुकीपासून दूर आहेत. तालुक्याच्या राजकारणात सर्वमान्य नेतृत्वाचा मोठा अभाव आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींमध्ये हस्तक्षेप करून आपला शिक्का चालेल याचीही त्यांना शाश्वती नाही. त्यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांनी राजकीय सोय पाहून झेंडे हाती घेतले आहेत.

----------