शहरं
Join us  
Trending Stories
1
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
2
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
3
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
4
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
5
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
6
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
7
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
8
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
9
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
10
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
11
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
12
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
13
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
14
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
15
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
16
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
17
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
18
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
19
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
20
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
Daily Top 2Weekly Top 5

श्रीरामपुरात गावचे प्रश्न आणि गावचेच नेतृत्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:50 IST

शिवाजी पवार श्रीरामपूर : श्रीरामपूर तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये तालुक्यातील बड्या राजकीय नेत्यांचे अस्तित्व केवळ पत्रके आणि फलकांपुरतेच मर्यादित ...

शिवाजी पवार

श्रीरामपूर : श्रीरामपूर तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये तालुक्यातील बड्या राजकीय नेत्यांचे अस्तित्व केवळ पत्रके आणि फलकांपुरतेच मर्यादित राहिले आहे. गावच्या कारभारी निवडीमध्ये नेत्यांचा कोणताही हस्तक्षेप येथे दिसून आला नाही. गावचे प्रश्न आणि गावचे नेतृत्व याच बळावर निवडणुका लढविल्या जात असून नेेते मात्र केवळ आधारस्तंभ आणि खंबीर साथ यापुरतेच उरले आहेत.

कोणत्याही ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत तालुका पातळीवरील बड्या नेत्याने सहभाग नोंदविलेला नाही. माजी आमदार भानुदास मुरकुटे, जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे हे निवडणुकीपासून लांब राहिल्याचे चित्र आहे. काँग्रेसचे आमदार लहू कानडे यांनी प्रारंभीच ग्रामसभांना मिळालेल्या अधिकारांचा वापर करत बिनविरोध निवडणुकांचा आग्रह धरला होता. भाजप नेते आमदार राधाकृष्ण विखे यांनीही आपल्या समर्थकांना बिनविरोध निवडणुका करण्याचे सूचित केले होते.

मात्र असे असले तरी केवळ खानापूर येथील निवडणूक बिनविरोध पार पडली. अन्य २६ ग्रामपंचायती मात्र सर्वत्र चुरशीने लढविल्या जात आहेत. मात्र त्यात नेत्यांचा कोणताही हस्तक्षेप नाही. पूर्वी उमेदवारी वाटपामध्ये नेत्यांच्या शब्दाला महत्त्व होते. गावची निवडणूक स्थानिक कोणत्या नेत्याच्या नेतृत्वाखाली लढवावी, याचेही निर्देश ते देत होते.

ग्रामपंचायत निवडणुकीकडे कार्यकर्ता निर्माण करण्याच्या प्रक्रियेचा भाग म्हणून नेते मंडळी पाहत होती. आता मात्र स्थानिक कार्यकर्त्यांच्याच हवाली सर्व सूत्रे देण्यात आली आहेत. कार्यकर्त्यांनीही आपल्या सोयीनुसार गावात आघाड्या केल्या आहेत.

-----------

प्रतिमा जपण्याचा प्रयत्न

ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये हस्तक्षेप केल्यास तालुक्यातील बड्या नेत्यांना आरोप प्रत्यारोपाला सामोरे जावे लागते. त्यातून प्रतिमेला धक्का बसण्याची भीती असते. त्यामुळे नेते निवडणुकीपासून दूर आहेत. तालुक्याच्या राजकारणात सर्वमान्य नेतृत्वाचा मोठा अभाव आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींमध्ये हस्तक्षेप करून आपला शिक्का चालेल याचीही त्यांना शाश्वती नाही. त्यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांनी राजकीय सोय पाहून झेंडे हाती घेतले आहेत.

----------