शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
3
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
4
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
5
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
6
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
7
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
8
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
9
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
10
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
11
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
12
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
13
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
14
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
15
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?
16
Indian Railway: आता रेल्वेतही विमानासारखा नियम; ‘जादा' सामान बाळगल्यास दंड!
17
ट्रम्प यांना भेटायला गेलेल्या झेलेन्स्कींनी मेलानियांसाठी पाठवले खास पत्र; काय आहे या पत्रात?
18
आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची घोषणा करणार 'I.N.D.I.A.'? ही 3 नावं शर्यतीत!
19
पैसे दुप्पट करते ही सरकारी योजना; ५ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल १० लाखांचा गॅरंटीड रिटर्न, पाहा डिटेल्स
20
पतीच्या निधनामुळे खचलेल्या तिच्या आयुष्यात 'तो' आला अन् मोठा झटका देऊन गेला! तरुणीसोबत घडलं असं काही की...

गावाने दु:ख केले हलके

By admin | Updated: December 22, 2015 23:11 IST

श्रीरामपूर : विलास रभाजी पटेकर हा ४७ वर्षीय शेतकरी कांदा लागवड करताना हृदयविकाराचा झटका येऊन मरण पावला. अन् त्याच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला.

श्रीरामपूर : विलास रभाजी पटेकर हा ४७ वर्षीय शेतकरी कांदा लागवड करताना हृदयविकाराचा झटका येऊन मरण पावला. अन् त्याच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला. आई देऊबाई, वडील रभाजी, पत्नी सोनाली, सिया व समीक्षा या दोन चिमुकल्या मुली पोरक्या झाल्या. निर्मलग्राम वडगाव आमलीने हे दु:ख एका कुटुंबाचे न मानता अख्ख्या गावाचे मानून हे दु:ख हलके केले.कोरडेपणाने निव्वळ प्रतिमेला फुले वाहून, श्रद्धांजली वाहून गावकरी थांबले नाहीत. त्यांनी मृत शेतकरी विलासच्या दोन चिमुकल्या मुलींच्या शिक्षणासाठी उत्स्फूर्तपणे सुमारे १ लाख रुपयांची लोकवर्गणी जमा केली. हागणदारीमुक्त गाव व निर्मलग्रामचा राज्यस्तरीय पुरस्कार मिळविलेल्या वडगाव आमली (ता. पारनेर) येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक रभाजी पटेकर यांचा विलास हा एकुलता एक मुलगा. कांद्याची लागवड करताना छातीत दुखू लागले. कामामुळे चमक भरली असेल म्हणून दोघे नवरा- बायको भाळवणीला दवाखान्यात निघाले. मध्येच एक मोटारसायकलस्वार भेटला. त्याने या दोघांना दवाखान्यात पोहोचविले. डॉक्टरांनी तपासले. हृदयविकाराचा झटका असल्याने नगरला हलविण्यासाठी रुग्णवाहिका बोलावली. रुग्णवाहिका बोलावण्यापूर्वीच दुसरा झटका आला. अन् संपूर्ण पटेकर कुटुंबालाच विलासने अखेरचा झटका देत जगाचा निरोप घेतला. आई आजारी बहिणीला भेटायला मुंबईला गेली होती. त्यांच्यासह दूरवरच्या नातलगांना निरोप गेले. मुंबईवाले येता येता पहाटेचे ३ वाजले. आई, बहीण पहाटे ३.३० वाजता पोहोचले. पहाटेच्या कुडकुडत्या थंडीत पाहुणे वाट पाहत होते. कोणी शेकोटीचा आधार घेत होते. कोणी सोबतच्या पांघरुणात ऊब शोधत होते. पहाटे ४ च्या सुमारास विलासवर अंत्यसंस्कार झाले. नंतर जलदान विधी (दशक्रिया) झाला. हनुमान मंदिरात अख्खा गाव जमला होता. कार्यक्रमाचं नियोजन सारं गावानेच हाती घेतलं होतं. पटेकर गुरूजींना न सांगता गावानेच अन्नदानाची सोय केली होती. श्रद्धांजलीची भाषणं सुरू झाली. गावातल्या एका ज्येष्ठाने कल्पना मांडली. उपस्थितांनी आपापल्या परीने पटेकर कुटुंबाला नाही तर विलासच्या दोन चिमुकल्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत करावी. पाहता पाहता सुमारे १ लाख रुपयांचा निधी जमा झाला. गावातील ज्येष्ठ नागरिक, पेन्शनर, नोकरदार, शेतकरी, महिला अशा साऱ्यांनीच यात खारीचा सहभाग दिला. ही रक्कम विलासच्या सिया व समिक्षा या दोन मुलींच्या नावावर बँकेत एफ. डी. केली जाणार आहे. गावाने एका परिवाराचे दु:ख हलके करताना दु:खाच्या घटनेतूनही समाजासमोर आदर्श निर्माण केला. (प्रतिनिधी)