शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
2
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
3
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
4
Operation Sindoor Live Updates: राज्यांना आपत्कालीन अधिकारांचा वापर करण्याची परवानगी, गृह मंत्रालयाचा निर्णय
5
हा दिग्गज १०८ अब्ज डॉलर्सची संपत्ती दान करणार; ठरणार आजवरचं सर्वात मोठं परोपकारी कार्य
6
भारतीय सेनेचा 'सुपर हीरो', पाकिस्तानच्या नाकीनऊ आणलं! काय आहे 'आकाश'मध्ये खास?
7
'सर, मला फक्त एकदा परवानगी द्या, मी पाकिस्तानविरूद्ध..."; बिहारच्या शिक्षकाचे पत्र व्हायरल
8
जगा आणि जगू द्या..; मेहबूबा मुफ्तींचे रडत-रडत भारत आणि पाकिस्तानच्या प्रमुखांना आवाहन
9
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर RSSची मोदी सरकारच्या पाठीवर कौतुकाची थाप, भारतीय सैन्याचे केले अभिनंदन
10
Gold Price 9 May : भारत-पाक तणावादरम्यान सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर?
11
India Pakistan War: 'आमचे पंतप्रधान भित्रे, ते मोदींचे नाव घ्यायला घाबरतात'; पाकिस्तानी खासदाराने त्यांच्याच सरकारला सुनावले
12
"सत्याला अभिनय करु नको असं सांगितलंय", महेश मांजरेकरांचा लेकाबद्दल खुलासा, म्हणाले- "ट्रोल केल्यावर मी..."
13
India Pakistan Vidoe: पाकिस्तानने डागलेली उखळी तोफ थेट घरावर, क्षणात दिसेनासं झालं, बघा काय घडलं?
14
यशस्वी जैस्वालचा यू-टर्न ! गोवा नव्हे, मुंबई संघाकडूनच क्रिकेट खेळणार... काय दिलं कारण?
15
हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त! पाकिस्तानच्या गोळीबारात जुळ्या भावंडांचा मृत्यू
16
पाक लष्कर प्रमुखाला मिळाली विशेष 'पॉवर'; पाकिस्तानी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
17
लग्नाच्या अवघ्या १५व्या दिवशीच नवरीनं उडवली सासरची झोप; नवरदेवालाही लावला चुना अन्...  
18
Mumbai: टाटा मेमोरियल हॉस्पिटलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; भारत- पाकिस्तान तणावादरम्यान मेल
19
उद्यापासून महाराष्ट्रातील या ठिकाणी पेट्रोल पंपावर UPI पेमेंट बंद; कारण काय? जाणून घ्या...
20
तुमच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक नियोजन कसे करावे? महागाई लक्षात घेऊन 'या' टिप्स फॉलो करा

गावाने दु:ख केले हलके

By admin | Updated: December 22, 2015 23:11 IST

श्रीरामपूर : विलास रभाजी पटेकर हा ४७ वर्षीय शेतकरी कांदा लागवड करताना हृदयविकाराचा झटका येऊन मरण पावला. अन् त्याच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला.

श्रीरामपूर : विलास रभाजी पटेकर हा ४७ वर्षीय शेतकरी कांदा लागवड करताना हृदयविकाराचा झटका येऊन मरण पावला. अन् त्याच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला. आई देऊबाई, वडील रभाजी, पत्नी सोनाली, सिया व समीक्षा या दोन चिमुकल्या मुली पोरक्या झाल्या. निर्मलग्राम वडगाव आमलीने हे दु:ख एका कुटुंबाचे न मानता अख्ख्या गावाचे मानून हे दु:ख हलके केले.कोरडेपणाने निव्वळ प्रतिमेला फुले वाहून, श्रद्धांजली वाहून गावकरी थांबले नाहीत. त्यांनी मृत शेतकरी विलासच्या दोन चिमुकल्या मुलींच्या शिक्षणासाठी उत्स्फूर्तपणे सुमारे १ लाख रुपयांची लोकवर्गणी जमा केली. हागणदारीमुक्त गाव व निर्मलग्रामचा राज्यस्तरीय पुरस्कार मिळविलेल्या वडगाव आमली (ता. पारनेर) येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक रभाजी पटेकर यांचा विलास हा एकुलता एक मुलगा. कांद्याची लागवड करताना छातीत दुखू लागले. कामामुळे चमक भरली असेल म्हणून दोघे नवरा- बायको भाळवणीला दवाखान्यात निघाले. मध्येच एक मोटारसायकलस्वार भेटला. त्याने या दोघांना दवाखान्यात पोहोचविले. डॉक्टरांनी तपासले. हृदयविकाराचा झटका असल्याने नगरला हलविण्यासाठी रुग्णवाहिका बोलावली. रुग्णवाहिका बोलावण्यापूर्वीच दुसरा झटका आला. अन् संपूर्ण पटेकर कुटुंबालाच विलासने अखेरचा झटका देत जगाचा निरोप घेतला. आई आजारी बहिणीला भेटायला मुंबईला गेली होती. त्यांच्यासह दूरवरच्या नातलगांना निरोप गेले. मुंबईवाले येता येता पहाटेचे ३ वाजले. आई, बहीण पहाटे ३.३० वाजता पोहोचले. पहाटेच्या कुडकुडत्या थंडीत पाहुणे वाट पाहत होते. कोणी शेकोटीचा आधार घेत होते. कोणी सोबतच्या पांघरुणात ऊब शोधत होते. पहाटे ४ च्या सुमारास विलासवर अंत्यसंस्कार झाले. नंतर जलदान विधी (दशक्रिया) झाला. हनुमान मंदिरात अख्खा गाव जमला होता. कार्यक्रमाचं नियोजन सारं गावानेच हाती घेतलं होतं. पटेकर गुरूजींना न सांगता गावानेच अन्नदानाची सोय केली होती. श्रद्धांजलीची भाषणं सुरू झाली. गावातल्या एका ज्येष्ठाने कल्पना मांडली. उपस्थितांनी आपापल्या परीने पटेकर कुटुंबाला नाही तर विलासच्या दोन चिमुकल्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत करावी. पाहता पाहता सुमारे १ लाख रुपयांचा निधी जमा झाला. गावातील ज्येष्ठ नागरिक, पेन्शनर, नोकरदार, शेतकरी, महिला अशा साऱ्यांनीच यात खारीचा सहभाग दिला. ही रक्कम विलासच्या सिया व समिक्षा या दोन मुलींच्या नावावर बँकेत एफ. डी. केली जाणार आहे. गावाने एका परिवाराचे दु:ख हलके करताना दु:खाच्या घटनेतूनही समाजासमोर आदर्श निर्माण केला. (प्रतिनिधी)