शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
2
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
3
मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
4
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
5
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
6
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
7
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
8
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
9
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
10
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
11
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
12
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
13
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
14
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
15
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
16
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
17
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
18
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
19
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
20
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले

साठ वर्षांपासून गावातील निवडणुका बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोतूळ (जि. अहमदनगर) : अकोले तालुक्यात मोग्रस गावात गेल्या साठ वर्षांत एकदाही निवडणूक झाली नाही. ग्रामपंचायत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोतूळ (जि. अहमदनगर) : अकोले तालुक्यात मोग्रस गावात गेल्या साठ वर्षांत एकदाही निवडणूक झाली नाही. ग्रामपंचायत साठ वर्षांपासून तर सेवा सोसायटी पन्नास वर्षांपासून बिनविरोध होत आहे. यंदा गावातील तीन वाॅर्डांत सात जागांसाठी गावाची बैठक पार पडली. त्यात आरक्षणानुसार उमेदवारी अर्ज भरण्याचे निश्चित केले.

मोग्रस गावात गेल्या साठ वर्षांपासून एकही निवडणूक झाली नाही. १९६० पूर्वी धामणगावपाट व मोग्रस ही ग्रुप ग्रामपंचायत विभक्त झाली. तेव्हापासून आजपर्यंत ग्रामपंचायत व सेवा सोसायटीची एकही निवडणूक झाली नाही. त्यामुळे गावात वाद, गट, तंटा या भानगडी नाहीत. जिल्ह्यात या गावाला जिल्ह्यातील हगणदारी मुक्ती, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता, वन व्यवस्थापन, तंटामुक्तीचे पुरस्कार मिळाले आहेत. गावची दोन हजार लोकसंख्या असताना खुर्चीचे भांडण गावात कधीच नाही. गावात सतत एकाच कुटुंबात किंवा एकाच व्यक्तीला पद दिले जात नाही. गावचा निर्णय झाल्यानंतर कुणीही ठरलेल्या उमेदवाराव्यतिरिक्त अर्ज दाखल करत नाही.

.........

गावाने गेली साठ वर्षे बिनविरोध निवडणुकीची परंपरा चालवली, ती पुढे चालू राहावी. गावातील एकीने मी अकोले पंचायत समितीचा सभापती, जिल्हा परिषद सदस्य होऊ शकलो. ग्रामपंचायतीचे सर्वच पुरस्कार व विकास निधी यामुळे सहज मिळाले.

- भानुदास गायकर, माजी सभापती

...........

गावातील बैठकीत निर्णय घेताना तरुण, ज्येष्ठ नागरिक, महिला यांनाही समान संधी दिली जाते. पक्ष, गट-तट बाजूला ठेवतात. यंदा तरुणांना संधी देण्याचे ठरले. त्यानुसार गावाचा बिनविरोधचा निर्णय ठरला. मोग्रस गावात आजपर्यंत एकही निवडणूक झाली नाही.

- सीताराम गायकर, अध्यक्ष, मूळमाता देवस्थान, मोग्रस