शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
3
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
4
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
5
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
6
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
7
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
8
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
9
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
10
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
11
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
12
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
13
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
14
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
15
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
16
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
17
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
18
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
19
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
20
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!

गाव बंद, मात्र चौकाचौकांत गप्पांचे फड रंगलेलेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क दहिगावने : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने ३० एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लागू केले आहेत. जीवनावश्यक वस्तूंची ...

लोकमत न्यूज नेटवर्क

दहिगावने : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने ३० एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लागू केले आहेत. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता इतर दुकाने कडकडीत बंद आहेत. मात्र, सकाळी चौकाचौकांत गप्पांचे फड नेहमीप्रमाणेच रंगलेले पहायला मिळत आहेत. दहिगावने, भावीनिमगाव, शहरटाकळीसह शेवगाव तालुक्यातील ग्रामीण भागातीलही परिस्थिती चिंताजनक आहे. याला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांकडून घातली जाणारी गस्तही निष्फळ ठरत आहे.

मागीलवर्षी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रशासनाला गावागावांतील आपत्ती व्यवस्थापन समित्या मदत करीत होत्या. या समितीच्या वतीने नागरिकांना घराबाहेर न निघण्याच्या, जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीवेळी गर्दी न करण्याचे वेळोवेळी आवाहन करण्यात येत होते. गावात पहाराही देण्यात येत होता. त्यामुळे गर्दी नियंत्रणात राहत होती. मात्र, सद्यस्थितीत या समित्याच कार्यान्वित नसल्याने परिस्थिती नियंत्रणात आणणारी यंत्रणाच उपलब्ध नाही. त्यामुळे अनेक गावांतील चौकाचौकांत नागरिक गर्दी करीत आहेत. विशेषतः सकाळी ७ ते ९ आणि संध्याकाळी ६ ते ९ यावेळेत गावातील चौकांमध्ये मोठी गर्दी होत आहे. यामुळे अबालवृद्धांचा जीव टांगणीला लागला असून ग्रामस्थ चिंता व्यक्त करीत आहेत. दरम्यान, पोलिसांनी दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला पाहिजे. प्रशासनाने कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्यांची शोधमोहीम हाती घेऊन त्यांची कोरोना चाचणी करावी, अशी मागणी आरोग्यमित्रांकडून होत आहे.

...

नागरिकांना गर्दी कमी करण्याचे अनेकदा आवाहन केले. समजावून सांगितले आहे. मात्र, गावातील प्रशासकीय अधिकारी व पदाधिकाऱ्यांना लोक जुमानत नाहीत. पोलीस दुपारच्या वेळी गस्त घालण्यास येतात. त्यावेळी ऊन असल्याने गावागावांत शुकशुकाट असतो. त्यामुळे पोलीस प्रशासनाने सकाळी ७ ते ९ आणि सायंकाळी ६ ते ८ या वेळेतील गस्तींची संख्या वाढवून नियम मोडणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करावी.

-सुभाष पवार, सरपंच, दहिगावने, ता. शेवगाव.

...

शेवगाव तालुक्यात मागील दहा दिवसांत १०४५ नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असताना बेफिकिरी बाळगणारे नागरिक समाजासाठी आणखी घातक ठरत आहेत. नागरिकांच्या वर्तनबदलाने कोरोनाची साखळी तुटू शकते. त्यामुळे प्रशासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करा.

-डॉ सलमा हिराणी, तालुका आरोग्य अधिकारी, शेवगाव.

...