शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

गाव बंद, मात्र चौकाचौकांत गप्पांचे फड रंगलेलेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क दहिगावने : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने ३० एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लागू केले आहेत. जीवनावश्यक वस्तूंची ...

लोकमत न्यूज नेटवर्क

दहिगावने : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने ३० एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लागू केले आहेत. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता इतर दुकाने कडकडीत बंद आहेत. मात्र, सकाळी चौकाचौकांत गप्पांचे फड नेहमीप्रमाणेच रंगलेले पहायला मिळत आहेत. दहिगावने, भावीनिमगाव, शहरटाकळीसह शेवगाव तालुक्यातील ग्रामीण भागातीलही परिस्थिती चिंताजनक आहे. याला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांकडून घातली जाणारी गस्तही निष्फळ ठरत आहे.

मागीलवर्षी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रशासनाला गावागावांतील आपत्ती व्यवस्थापन समित्या मदत करीत होत्या. या समितीच्या वतीने नागरिकांना घराबाहेर न निघण्याच्या, जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीवेळी गर्दी न करण्याचे वेळोवेळी आवाहन करण्यात येत होते. गावात पहाराही देण्यात येत होता. त्यामुळे गर्दी नियंत्रणात राहत होती. मात्र, सद्यस्थितीत या समित्याच कार्यान्वित नसल्याने परिस्थिती नियंत्रणात आणणारी यंत्रणाच उपलब्ध नाही. त्यामुळे अनेक गावांतील चौकाचौकांत नागरिक गर्दी करीत आहेत. विशेषतः सकाळी ७ ते ९ आणि संध्याकाळी ६ ते ९ यावेळेत गावातील चौकांमध्ये मोठी गर्दी होत आहे. यामुळे अबालवृद्धांचा जीव टांगणीला लागला असून ग्रामस्थ चिंता व्यक्त करीत आहेत. दरम्यान, पोलिसांनी दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला पाहिजे. प्रशासनाने कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्यांची शोधमोहीम हाती घेऊन त्यांची कोरोना चाचणी करावी, अशी मागणी आरोग्यमित्रांकडून होत आहे.

...

नागरिकांना गर्दी कमी करण्याचे अनेकदा आवाहन केले. समजावून सांगितले आहे. मात्र, गावातील प्रशासकीय अधिकारी व पदाधिकाऱ्यांना लोक जुमानत नाहीत. पोलीस दुपारच्या वेळी गस्त घालण्यास येतात. त्यावेळी ऊन असल्याने गावागावांत शुकशुकाट असतो. त्यामुळे पोलीस प्रशासनाने सकाळी ७ ते ९ आणि सायंकाळी ६ ते ८ या वेळेतील गस्तींची संख्या वाढवून नियम मोडणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करावी.

-सुभाष पवार, सरपंच, दहिगावने, ता. शेवगाव.

...

शेवगाव तालुक्यात मागील दहा दिवसांत १०४५ नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असताना बेफिकिरी बाळगणारे नागरिक समाजासाठी आणखी घातक ठरत आहेत. नागरिकांच्या वर्तनबदलाने कोरोनाची साखळी तुटू शकते. त्यामुळे प्रशासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करा.

-डॉ सलमा हिराणी, तालुका आरोग्य अधिकारी, शेवगाव.

...