शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

विखेंनी नगर-नाशिक-मराठवाडा वाद पेटविला- दादा भुसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 20:04 IST

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे हे मुख्यमंत्र्यांचे चांगले मित्र आहेत. पण, ते भाजपवर कमी व शिवसेनेवरच जास्त टीका करतात. जिल्ह्यातील पाण्यासंदर्भात त्यांनी अहमदनगर-नाशिक-मराठवाडा असा वाद पेटविला.

कोपरगाव : विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे हे मुख्यमंत्र्यांचे चांगले मित्र आहेत. पण, ते भाजपवर कमी व शिवसेनेवरच जास्त टीका करतात. जिल्ह्यातील पाण्यासंदर्भात त्यांनी अहमदनगर-नाशिक-मराठवाडा असा वाद पेटविला. आमच्यावर टीका करण्यात शक्ती वाया घालविण्याऐवजी पश्चिमेस वाहून जाणारे पाणी अडवून जिल्हा सुजलाम सुफलाम करावा, असा टोला ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी गुरूवारी येथे विखेंना लगावला.भोजडे येथे शिवसेनेच्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी खासदार सदाशिव लोखंडे होते. संपर्कप्रमुख दिलीप नाईक, जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, उपजिल्हाप्रमुख नाना बावके, नाशिकचे उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव, जिल्हा संघटक विजय काळे, माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे आदी उपस्थित होते.भुसे म्हणाले, अहमदनगर हा सहकार व साखर सम्राटांचा जिल्हा असताना या भागातील शेतक-यांचा म्हणावा तसा विकास झाला नाही. जून २०१७ अखेरपर्यंतच्या कर्जदार शेतक-यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला पाहिजे. नियमित कर्जफेड करणा-या शेतक-यांना २५ हजारांची तुटपुंजी कर्जमाफी वाढवून देण्याची आमची भूमिका आहे. केवळ घोषणा करून चालणार नाही, तर अंमलबजावणी झाली पाहिजे. सेनेला संपवायला निघालेले नारायण राणे व छगन भुजबळांची अवस्था काय झाली? हे उभा महाराष्ट्र बघत आहे. आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याच्या तयारीला लागावे, असे सांगत एक वर्ष पक्षासाठी द्या, सरकार भगव्याचे असेल, असे भुसे यांनी सांगितले.भोजडे ग्रामपंचायत इमारतीसाठी बाळासाहेब ठाकरे स्मृती योजनेतून ११ लाख २० हजारांचा निधी देण्याची घोषणा त्यांनी केली. लोखंडे यांनी २००५ चा समन्यायी पाणी वाटप कायदा रद्द करून आपल्या हक्काचे पाणी आपल्याच भागात जिरवा, असे आवाहन करीत पश्चिमेकडून समुद्रात वाहून जाणारे ४ दशलक्ष घनफूट पावसाचे पाणी अडवून कोरडवाहू शेतक-यांना देण्यासाठी ४ कोटींचा प्रस्ताव केंद्र सरकारला दिल्याचे सांगितले. तालुकाप्रमुख शिवाजी ठाकरे यांनी प्रास्ताविक केले. अशोक कानडे यांनी सूत्रसंचालन केले. रावसाहेब थोरात यांनी आभार मानले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKopargaonकोपरगाव