शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं, आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
2
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
3
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
4
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
5
२, ३, ४BHK घर बांधायचेय? जीएसटीचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या
6
गर्लफ्रेंडने ब्लॉक केलं, प्रेमभंग जीवावर बेतला, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; उपचारादरम्यान मृत्यू
7
१०% नं घसरलाय हा शेअर, पण अजूनही IPO च्या किंमतीपेक्षा ६०% नं अधिक; काय म्हणाले एक्सपर्ट?
8
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
9
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
10
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
11
अंकिता लोखंडेचा नवरा रुग्णालयात दाखल; हाताला ४५ टाके अन्... मित्राने शेअर केली पोस्ट
12
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल
13
BAN vs SL Head to Head Record : 'टायगर वर्सेस शेर' भिडणार! 'नागिन डान्स'सह कोण कुणावर काढणार खुन्नस?
14
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
15
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
16
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
17
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
18
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
19
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
20
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक

विजयपूरकर झाले आक्रमक

By admin | Updated: June 16, 2014 00:10 IST

शेवगाव : पश्चिम महाराष्ट्रातील शेवटचे टोक असलेल्या तालुक्यातील विजयपूर ग्रामस्थांच्या सहनशीलतेचा बांध फुटून मुक्कामी असलेल्या जिल्हाधिकाऱ्यांसमोर त्यांनी तक्रारींचा पाढा वाचून कैफियत मांडली.

शेवगाव : पश्चिम महाराष्ट्रातील शेवटचे टोक असलेल्या तालुक्यातील विजयपूर ग्रामस्थांच्या सहनशीलतेचा बांध फुटून मुक्कामी असलेल्या जिल्हाधिकाऱ्यांसमोर त्यांनी तक्रारींचा पाढा वाचून कैफियत मांडली.जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी काही सहकारी अधिकाऱ्यांसह पुर्नवसित विजयपुरला मुक्कामी भेट देऊन गावकऱ्यांशी ग्रामसभेच्या माध्यमातून संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी गावकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांसमोर अनेक तक्रारी मांडल्या. तालुक्याचे ठिकाण असलेल्या शेवगावशी संपर्क साधण्यासाठी उपलब्ध करुन दिलेली यांत्रिक बोट पूर्ववत सुरु करावी, गावातील अंतर्गत रस्ते, पिण्याच्या पाण्याची समस्या, एस.टी. ची बस सेवा, पोलीस पाटील व कोतवालाची नियुक्ती, रानडुकरांचा बंदोबस्त, दारुबंदीची प्रभावी अंमलबजावणी, युवकांसाठी क्रीडा मैदान व क्रीडा संकुल, महिला बचत गटांसाठी कर्ज सुविधा या तक्रारींचा यामध्ये प्रामुख्याने समावेश होता. जायकवाडी जलाशयाच्या निर्मितीनंतर विजयपूर गावाचा संपर्क पैठण,लोहगाव, आगरनांदूर असा अंदाजे तीस कि.मी. ने वाढला. नित्याच्या कामासाठी शेवगावला जाणे-येणे अडचणीचे ठरत असल्याने आमच्या गावाचा समावेश शेवगाव तालुक्यातच कायमस्वरुपी करावा, असा आग्रह ग्रामस्थांनी धरला. दळणवळणाच्यादृष्टीने यांत्रिकी बोट व बोटसेवेच्या मागणीबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी मान्य केले. माजी सरपंच नानासाहेब जगदाळे, काकासाहेब काळे, दत्तात्रय काळे, श्रीमंत जगदाळे, रामदास काळे, अशोक सुरोसे,जनाबाई जगदाळे यांनी विविध प्रश्न मांडले.(तालुका प्रतिनिधी)दळणवळणाचा प्रश्न गंभीर विजयपूर दहिगाव-ने पासून अवघ्या पाच कि.मी. अंतरावरील गाव. मात्र जायकवाडी धरणाच्या निर्मितीमुळे या दोन्ही गावांमध्ये जलाशयाच्या पाण्यामुळे अंतराचा अडसर निर्माण झाला. अंतरात तीस कि.मी. ने वाढ झाली. आता पैठणला वळसा घालून लोहगाव आंगरनांदूर मार्गे विजयपूरला जावे लागते. गोदावरी नदीत कायम स्वरुपी पाणी असते. परंतु बोटसेवा नसल्याने दळणवळणात अडचण येते. सात वर्षापूर्वी माजी आमदार नरेंद्र घुले यांच्या प्रयत्नातून बोटसेवा सुरु झाली. परंतु बोट नादुरुस्त झाल्याने ही सेवा सध्या बंद आहे. त्यामुळे गावाचा दळणवळणाचा प्रश्न गंभीर आहे.