शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
2
नोकरी बदलणाऱ्यांना EPFO चा मोठा दिलासा! 'ब्रेक'बाबतचे नियम बदलले; आता शनिवार-रविवारची सुट्टी अडथळा ठरणार नाही
3
दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
4
अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनामध्ये जेट विमानाचा अपघात; संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त
5
'...तर त्यांचा एक हात तोडून दुसऱ्या हातात दिला असता'; इम्तियाज जलील मंत्री संजय निषाद यांच्यावर संतापले
6
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
7
मुंबई विमानतळाची गोपनीय माहिती चोरट्यांच्या हाती; ऐरोलीतील घटना : अदानी ग्रुपच्या मॅनेजरचा लॅपटॉप चोरीला
8
मी सर्वांसमोर तिला चुकीच्या पद्धतीने का किस करेल? ट्रोल झाल्यावर राकेश बेदींनी दिलं स्पष्टीकरण
9
उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर बांग्लादेश पेटला, कट्टरपंथांनी भारताचे नाव घेतले; शेख हसीना यांच्या सरकारला हादीनेच दिले होते हादरे
10
राज्यातील पहिले 'जेन झी टपाल' आयआयटी मुंबईत; कार्यालयामध्ये नवीन सुविधांसह डिजिटल सेवा
11
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
12
'राहुल गांधींचं काम केलं, तुमचं नाही केलं तर लोक म्हणतील...'; नितीन गडकरींनी प्रियंका गांधींना खाऊ घातली स्पेशल डिश
13
Vijay Mallya : देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
14
आज होणार धमाका! महिलेच्या शरीरावर कांदबरीतील ओळीचं लिखाण, १८ वर्षीय मुलीचा इतका 'रेट' लावला
15
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
16
संपादकीय : सरकारच्या प्रतिमेचे काय? डागाळलेली प्रतिमा अन् सत्तेची अपरिहार्यता
17
विखुरलेले विरोधक : भाजपचा कॅल्क्युलेटर ऑन! भावनिक लाट ओसरली, आता गणिताची लढाई!
18
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
19
"छापा नाही, केवळ रुटीन व्हेरिफिकेशन...", शिल्पा शेट्टीच्या वकिलांनी छापेमारीचं वृत्त फेटाळलं
20
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
Daily Top 2Weekly Top 5

विजयपूरकर झाले आक्रमक

By admin | Updated: June 16, 2014 00:10 IST

शेवगाव : पश्चिम महाराष्ट्रातील शेवटचे टोक असलेल्या तालुक्यातील विजयपूर ग्रामस्थांच्या सहनशीलतेचा बांध फुटून मुक्कामी असलेल्या जिल्हाधिकाऱ्यांसमोर त्यांनी तक्रारींचा पाढा वाचून कैफियत मांडली.

शेवगाव : पश्चिम महाराष्ट्रातील शेवटचे टोक असलेल्या तालुक्यातील विजयपूर ग्रामस्थांच्या सहनशीलतेचा बांध फुटून मुक्कामी असलेल्या जिल्हाधिकाऱ्यांसमोर त्यांनी तक्रारींचा पाढा वाचून कैफियत मांडली.जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी काही सहकारी अधिकाऱ्यांसह पुर्नवसित विजयपुरला मुक्कामी भेट देऊन गावकऱ्यांशी ग्रामसभेच्या माध्यमातून संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी गावकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांसमोर अनेक तक्रारी मांडल्या. तालुक्याचे ठिकाण असलेल्या शेवगावशी संपर्क साधण्यासाठी उपलब्ध करुन दिलेली यांत्रिक बोट पूर्ववत सुरु करावी, गावातील अंतर्गत रस्ते, पिण्याच्या पाण्याची समस्या, एस.टी. ची बस सेवा, पोलीस पाटील व कोतवालाची नियुक्ती, रानडुकरांचा बंदोबस्त, दारुबंदीची प्रभावी अंमलबजावणी, युवकांसाठी क्रीडा मैदान व क्रीडा संकुल, महिला बचत गटांसाठी कर्ज सुविधा या तक्रारींचा यामध्ये प्रामुख्याने समावेश होता. जायकवाडी जलाशयाच्या निर्मितीनंतर विजयपूर गावाचा संपर्क पैठण,लोहगाव, आगरनांदूर असा अंदाजे तीस कि.मी. ने वाढला. नित्याच्या कामासाठी शेवगावला जाणे-येणे अडचणीचे ठरत असल्याने आमच्या गावाचा समावेश शेवगाव तालुक्यातच कायमस्वरुपी करावा, असा आग्रह ग्रामस्थांनी धरला. दळणवळणाच्यादृष्टीने यांत्रिकी बोट व बोटसेवेच्या मागणीबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी मान्य केले. माजी सरपंच नानासाहेब जगदाळे, काकासाहेब काळे, दत्तात्रय काळे, श्रीमंत जगदाळे, रामदास काळे, अशोक सुरोसे,जनाबाई जगदाळे यांनी विविध प्रश्न मांडले.(तालुका प्रतिनिधी)दळणवळणाचा प्रश्न गंभीर विजयपूर दहिगाव-ने पासून अवघ्या पाच कि.मी. अंतरावरील गाव. मात्र जायकवाडी धरणाच्या निर्मितीमुळे या दोन्ही गावांमध्ये जलाशयाच्या पाण्यामुळे अंतराचा अडसर निर्माण झाला. अंतरात तीस कि.मी. ने वाढ झाली. आता पैठणला वळसा घालून लोहगाव आंगरनांदूर मार्गे विजयपूरला जावे लागते. गोदावरी नदीत कायम स्वरुपी पाणी असते. परंतु बोटसेवा नसल्याने दळणवळणात अडचण येते. सात वर्षापूर्वी माजी आमदार नरेंद्र घुले यांच्या प्रयत्नातून बोटसेवा सुरु झाली. परंतु बोट नादुरुस्त झाल्याने ही सेवा सध्या बंद आहे. त्यामुळे गावाचा दळणवळणाचा प्रश्न गंभीर आहे.