शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

बोगस सुशिक्षित बेरोजगारांची होणार पडताळणी

By admin | Updated: April 25, 2016 23:19 IST

अहमदनगर : जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडे नोंदणी केलेले अनेक सुशिक्षित बेरोजगार हे सध्या सरकारी व खासगी नोकरी करत आहेत.

अहमदनगर : जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडे नोंदणी केलेले अनेक सुशिक्षित बेरोजगार हे सध्या सरकारी व खासगी नोकरी करत आहेत. या सुशिक्षित बेरोजगारांची पडताळणी करण्याचा निर्णय जिल्हा परिषद प्रशासनाने घेतला आहे. सोमवारी अध्यक्षा मंजुषा गुंंड आणि मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल यांच्या उपस्थितीत झालेल्या आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या आठवड्यात बुधवारी जि. प. स्थायी समितीची बैठक पार पडली होती. त्यावेळी काही प्रमुख अधिकारी गैरहजर होते. यामुळे सोमवारी पुन्हा आढावा बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी स्थायी समितीचे सर्व अधिकारी आणि सदस्य उपस्थित होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात काही सुशिक्षित बेरोजगार यांच्याकडून निविदा दरापेक्षा कमी दराने निविदा भरण्यात येत आहेत. निविदा दरापेक्षा ५ ते १० टक्के कमी दराची निविदा आल्यास संबंधीत कामाच्या गुणवत्तेचा प्रश्न निर्माण होत आहे. अनेक ठिकाणी कामे रद्द करण्याची वेळ जि. प. वर आली आहे. यामुळे कमी दराने येणाऱ्या निविदा रोखण्यासाठी हा विषय शासन पातळीवर नेण्याचा निर्णय घेण्यात आला. या विषयाचा सरकार पातळीवर पाठपुरावा करण्याची जबाबदारी कॅफो अरूण कोल्हे यांच्यावर सोपवण्यात आली. तसेच तातडीचा उपाय म्हणून सरकारच्या आदेशानुसार कामाची निविदा मंजूर झाल्यानंतर १५ दिवसांच्या आत काम सुरू करण्याची अट टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच १५ दिवसात काम सुरू न झाल्यास त्या कामाचा पंचनामा करून काम रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बैठकीला उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार, सभापती बाबासाहेब दिघे, मीरा चकोर, शरद नवले, सदस्य बाळासाहेब हराळ, सुजित झावरे, सुवर्णा निकम, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)