शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलंबियाची ४८ तासांत कोलांटी उडी! शशी थरूरनी शाळाच घेतली; पाकिस्तानच्या बाजुने केलेले वक्तव्य मागे घ्यायला लावले
2
पीक नुकसानभरपाईच्या मदत रकमेत आता कपात; तीनऐवजी दोन हेक्टरपर्यंतच मिळणार मदत
3
'या' ४ ठिकाणी पत्नी मिळवून देऊ शकते जबरदस्त नफा; पाहा कोणत्या आहेत या स्कीम्स?
4
आजचे राशीभविष्य: शनिवार 31 मे 2025; खर्चाचे प्रमाण वाढेल, एखाद्या स्त्रीमुळे त्रास होऊ शकतो
5
'केईएम'मध्ये पुन्हा पाणी साचायला नको, उपाययोजनांसह प्रतिज्ञापत्र सादर करा : हायकोर्ट
6
युद्धनौका, पाणबुड्यांची नावे, ठावठिकाणा वर्माने पाकला पुरवला; कोठडीत रवानगी
7
दुनिया हिला देंगे हम! MI नं 'बेबी ओव्हर'सह GT चा खेळ खल्लास करत मिळवलं क्वालिफायर २ चं तिकीट
8
राज्यात साडेएकवीस हजार शासकीय वाहने भंगारात; अपघातांसह प्रदूषणास बसेल आळा
9
गेट लॉस्ट, मि. मस्क! दुसऱ्याच्या पदच्युतीसाठी किमान चार वर्षे लागतील
10
गाळ टाकण्याच्या जागेतही हेराफेरी; लॉगशीटवर गुंदवली, माल उतरवला दिवे गावात!
11
विलीनीकरणाचा कोणताही प्रस्ताव आमच्याकडे नाही; राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खा. तटकरे यांचे स्पष्टीकरण
12
तुर्की एअरलाइन्ससोबतचा करार रद्द करा, भारत सरकारने इंडिगोला निर्देश दिले
13
मामांचे पितळ उघडे पडले! शंशाक, सुशीलला दिलेल्या शस्त्र परवान्यावर सुपेकरांची सही
14
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान एकाकी पडला; तालिबानशी संबंध सुधारण्याची घोषणा
15
आधी कॅच घेताना गडबडला; बॅटिंग करताना Hit Wicket झाला! मग नेटकऱ्यांमध्ये रंगली मॅच 'फिक्सिंग'ची चर्चा
16
"राज्यपातळीवरुन 'गोकुळ'च्या राजकारणात हस्तक्षेप झाला नाही..."; सतेज पाटलांनी स्पष्टच सांगितलं
17
MI vs GT : हार्दिक पांड्याची कडक फटकेबाजी; त्याच्या षटकारानंतर लक्षवेधी ठरली ही सुंदरी (VIDEO)
18
रेल्वेकडून धाराशिवचे नामांतर फायनल, दोन स्थानके निर्णयाधिन;अहिल्यानगर आणि छ. संभाजीनगरला प्रतिक्षा : रेल्वे बोर्डाकडून होणार निर्णय

बोगस सुशिक्षित बेरोजगारांची होणार पडताळणी

By admin | Updated: April 25, 2016 23:19 IST

अहमदनगर : जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडे नोंदणी केलेले अनेक सुशिक्षित बेरोजगार हे सध्या सरकारी व खासगी नोकरी करत आहेत.

अहमदनगर : जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडे नोंदणी केलेले अनेक सुशिक्षित बेरोजगार हे सध्या सरकारी व खासगी नोकरी करत आहेत. या सुशिक्षित बेरोजगारांची पडताळणी करण्याचा निर्णय जिल्हा परिषद प्रशासनाने घेतला आहे. सोमवारी अध्यक्षा मंजुषा गुंंड आणि मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल यांच्या उपस्थितीत झालेल्या आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या आठवड्यात बुधवारी जि. प. स्थायी समितीची बैठक पार पडली होती. त्यावेळी काही प्रमुख अधिकारी गैरहजर होते. यामुळे सोमवारी पुन्हा आढावा बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी स्थायी समितीचे सर्व अधिकारी आणि सदस्य उपस्थित होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात काही सुशिक्षित बेरोजगार यांच्याकडून निविदा दरापेक्षा कमी दराने निविदा भरण्यात येत आहेत. निविदा दरापेक्षा ५ ते १० टक्के कमी दराची निविदा आल्यास संबंधीत कामाच्या गुणवत्तेचा प्रश्न निर्माण होत आहे. अनेक ठिकाणी कामे रद्द करण्याची वेळ जि. प. वर आली आहे. यामुळे कमी दराने येणाऱ्या निविदा रोखण्यासाठी हा विषय शासन पातळीवर नेण्याचा निर्णय घेण्यात आला. या विषयाचा सरकार पातळीवर पाठपुरावा करण्याची जबाबदारी कॅफो अरूण कोल्हे यांच्यावर सोपवण्यात आली. तसेच तातडीचा उपाय म्हणून सरकारच्या आदेशानुसार कामाची निविदा मंजूर झाल्यानंतर १५ दिवसांच्या आत काम सुरू करण्याची अट टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच १५ दिवसात काम सुरू न झाल्यास त्या कामाचा पंचनामा करून काम रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बैठकीला उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार, सभापती बाबासाहेब दिघे, मीरा चकोर, शरद नवले, सदस्य बाळासाहेब हराळ, सुजित झावरे, सुवर्णा निकम, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)