शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

जनावरांच्या चा-यासाठी उसाचा वापर वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2019 17:21 IST

उसाचा पट्टा असलेल्या अहमदनगर जिल्ह्यात यंदा पावसाळा लांबल्याने जनावरांच्या चाऱ्यासाठी उसाचा वापर वाढला आहे़

भाऊसाहेब येवलेराहुरी : उसाचा पट्टा असलेल्या अहमदनगर जिल्ह्यात यंदा पावसाळा लांबल्याने जनावरांच्या चाऱ्यासाठी उसाचा वापर वाढला आहे़ जिल्ह्यातील साखर कारखाने यंदाच्या गळीत हंगामात अडचणीत येणार आहेत़ जिल्ह्यात केवळ ८० हजार हेक्टर क्षेत्रावर ऊस शिल्लक असल्याने साखर सम्राटांचे धाबे दणाणले आहेत़अहमदनगर जिल्ह्यात २३ साखर कारखाने आहेत़ गेल्यावर्षी १ लाख ३५ हजार हेक्टर क्षेत्रावर ऊस उभा होता़ यंदा मात्र उसाखालील क्षेत्र निम्म्याने घटले आहे़ पावसाळा लांबल्याने जनावरांच्या छावण्यासाठी उसाची मागणी वाढली आहे़ पावसाअभावी नव्याने गवत उगलेले नाही़ शेतात उभा असलेला उसही अखेरची घटका मोजीत आहे़ बागायती पट्ट्यात ऊस जळाल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे़ त्यामुळे शेतकऱ्यांचे लक्ष आभाळाकडे वेधले आहे़जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी ओव्हर आॅयलिंगची तयारी सुरू ठेवली आहे़ १आॅक्टोबर रोजी कारखान्यांचे धुराडे पेटणार आहे़ याशिवाय कारखान्यांनी ऊस तोडणी कामगारांशी करारही करण्यास सुरूवात केली आहे़ कार्यक्षेत्राबाहेरून ऊस आणण्याचे नियोजन करण्यात आले आहे़ त्यामुळे ऊस पळवापळवीचे धोरण चव्हाट्यावर येण्याची चिन्हे आहेत़ ऊस टंचाईमुळे काही कारखाने बंद राहणार का? असा सवालही उपस्थित केला जात आहे़ यंदा कमी गळीत करून साखर कारखाने चालवावे लागणार आहेत़ त्यामुळे भावाची स्पर्धाही होण्याची शक्यता आहे़जनावरांच्या चाºयासाठी ३५०० ते ४००० रूपये टन ऊस वाढे, पाचराटासह विकला जात आहे़पाण्याच्या टंचाईमुळे शेतकरीही ऊस जनावरांच्या छावण्याला विकत आहेत़ मका चार संपलेला आहे़ तणनाशकामुळे बागायती भागातही गवत उपलब्ध नाही़ घासावर लष्करी अळी पडल्याने अनेकांनी शेतात नांगर फिरविले आहेत़ जनावरांसाठी ऊस चारा हा एकमेव पर्याय असल्याने पशुधन वाचविण्यासाठी शेतकºयांची त्रेधातिरपट उडाली आहे़अहमदनगर जिल्ह्यात २३ साखर कारखाने आहे़ गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा निम्म्या क्षेत्रावर ऊस उपलब्ध आहे़ जनावरांच्या छावण्यासाठी उसाचा वापर होत आहे़ आॅगष्टमध्ये साखर कारखाने कमीशनरकडे ऊस गाळपाची परवानगी घेतली़ पावसाळा लांबल्याने जनावरांसाठी चाºयाचा वापर वाढला आहे़ -राजेंद्र पाटील, प्रादेशिक सहसंचालक साखर, अहमदनगर.बागायती पट्ट्यात पावसाअभावी उसाचे क्षेत्र संकटात सापडले आहे़ जनावरांच्या छावण्यांकडून उसाला चारा म्हणून मागणी वाढलेली आहे़ छावण्यासाठी शेतकºयांच्या शेतात येऊन चारा तोडून नेला जात आहे़ शेतीसाठी पावासाची गरज असून उभी पिके वाचविण्याचे शेतकºयांपुढे आव्हान आहे़ -भाऊराव ढगे, ऊस उत्पादक शेतकरी.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरी