शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

जनावरांच्या चा-यासाठी उसाचा वापर वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2019 17:21 IST

उसाचा पट्टा असलेल्या अहमदनगर जिल्ह्यात यंदा पावसाळा लांबल्याने जनावरांच्या चाऱ्यासाठी उसाचा वापर वाढला आहे़

भाऊसाहेब येवलेराहुरी : उसाचा पट्टा असलेल्या अहमदनगर जिल्ह्यात यंदा पावसाळा लांबल्याने जनावरांच्या चाऱ्यासाठी उसाचा वापर वाढला आहे़ जिल्ह्यातील साखर कारखाने यंदाच्या गळीत हंगामात अडचणीत येणार आहेत़ जिल्ह्यात केवळ ८० हजार हेक्टर क्षेत्रावर ऊस शिल्लक असल्याने साखर सम्राटांचे धाबे दणाणले आहेत़अहमदनगर जिल्ह्यात २३ साखर कारखाने आहेत़ गेल्यावर्षी १ लाख ३५ हजार हेक्टर क्षेत्रावर ऊस उभा होता़ यंदा मात्र उसाखालील क्षेत्र निम्म्याने घटले आहे़ पावसाळा लांबल्याने जनावरांच्या छावण्यासाठी उसाची मागणी वाढली आहे़ पावसाअभावी नव्याने गवत उगलेले नाही़ शेतात उभा असलेला उसही अखेरची घटका मोजीत आहे़ बागायती पट्ट्यात ऊस जळाल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे़ त्यामुळे शेतकऱ्यांचे लक्ष आभाळाकडे वेधले आहे़जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी ओव्हर आॅयलिंगची तयारी सुरू ठेवली आहे़ १आॅक्टोबर रोजी कारखान्यांचे धुराडे पेटणार आहे़ याशिवाय कारखान्यांनी ऊस तोडणी कामगारांशी करारही करण्यास सुरूवात केली आहे़ कार्यक्षेत्राबाहेरून ऊस आणण्याचे नियोजन करण्यात आले आहे़ त्यामुळे ऊस पळवापळवीचे धोरण चव्हाट्यावर येण्याची चिन्हे आहेत़ ऊस टंचाईमुळे काही कारखाने बंद राहणार का? असा सवालही उपस्थित केला जात आहे़ यंदा कमी गळीत करून साखर कारखाने चालवावे लागणार आहेत़ त्यामुळे भावाची स्पर्धाही होण्याची शक्यता आहे़जनावरांच्या चाºयासाठी ३५०० ते ४००० रूपये टन ऊस वाढे, पाचराटासह विकला जात आहे़पाण्याच्या टंचाईमुळे शेतकरीही ऊस जनावरांच्या छावण्याला विकत आहेत़ मका चार संपलेला आहे़ तणनाशकामुळे बागायती भागातही गवत उपलब्ध नाही़ घासावर लष्करी अळी पडल्याने अनेकांनी शेतात नांगर फिरविले आहेत़ जनावरांसाठी ऊस चारा हा एकमेव पर्याय असल्याने पशुधन वाचविण्यासाठी शेतकºयांची त्रेधातिरपट उडाली आहे़अहमदनगर जिल्ह्यात २३ साखर कारखाने आहे़ गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा निम्म्या क्षेत्रावर ऊस उपलब्ध आहे़ जनावरांच्या छावण्यासाठी उसाचा वापर होत आहे़ आॅगष्टमध्ये साखर कारखाने कमीशनरकडे ऊस गाळपाची परवानगी घेतली़ पावसाळा लांबल्याने जनावरांसाठी चाºयाचा वापर वाढला आहे़ -राजेंद्र पाटील, प्रादेशिक सहसंचालक साखर, अहमदनगर.बागायती पट्ट्यात पावसाअभावी उसाचे क्षेत्र संकटात सापडले आहे़ जनावरांच्या छावण्यांकडून उसाला चारा म्हणून मागणी वाढलेली आहे़ छावण्यासाठी शेतकºयांच्या शेतात येऊन चारा तोडून नेला जात आहे़ शेतीसाठी पावासाची गरज असून उभी पिके वाचविण्याचे शेतकºयांपुढे आव्हान आहे़ -भाऊराव ढगे, ऊस उत्पादक शेतकरी.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरी