शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : टॉस जिंकून फसलो! थेट शुभमन गिलचं नाव घेत सूर्या म्हणाला, तो पहिल्याच बॉलवर आउट झाला अन्...
2
PM मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून सखोल चर्चा, 'या' ३ गोष्टींसाठी एकत्र काम करणार
3
‘गोल्डन डक’मुळं गिलच्या निवडीवर प्रश्नचिन्ह; संजूसह टीम इंडियातील ‘वशीलेबाजी’चा मुद्दा पुन्हा चर्चेत
4
धोकादायक सेस इमारतींचा तिढा सुटला; मुंबई 'पागडीमुक्त' होणार, पुनर्विकाच्या नव्या नियमावलीची शिंदेंकडून घोषणा
5
IND vs SA : दक्षिण आफ्रिकेचा पलटवार; घरच्या मैदानात टीम इंडियावर ओढावली T20I मधील सर्वात मोठ्या पराभवाची नामुष्की
6
वसंत मोरे थोडक्यात बचावले; नवले पुलावरील अपघातांवर बोलत असतानाच भरधाव टेम्पो आला अन्..
7
VIDEO : अर्शदीपची ओव्हर संपता संपेना; लाजिरवाण्या रेकॉर्डनंतर डगआउटमध्ये बसलेला गंभीर चिडला!
8
नीलेश घायवळ न्यायालयाकडून फरार घोषित; संपूर्ण मालमत्ता जप्त होण्याची शक्यता
9
FIH Hockey Men’s Junior World Cup 2025 : भारताच्या युवा हॉकी संघाचे PM मोदींकडून खास शब्दांत कौतुक, म्हणाले...
10
"एकदा भावाचा टी-शर्ट घालून मॅच खेळायला गेले अन्..."; महिला क्रिकेटर शेफालीचा धमाल किस्सा
11
IND vs SA : विकेटमागे जितेशची चपळाई! क्विंटन डी कॉकवर ओढावली 'नर्व्हस नाइंटी'ची नामुष्की (VIDEO)
12
"ते पार्ट टाइम पॉलिटिशियन, त्यांना गोपनीय परदेश दौऱ्यांचा छंद..."; मुस्लीम महिला नेत्या राहुल गांधींवर स्पष्टच बोलल्या
13
Indigo ला साडेसाती भोवली? दोन शत्रू ग्रहांमुळे अशी ‘दशा’ झाली; २०२७ पर्यंत आव्हान कायम अन्…
14
लुथरा बंधूंची अटकपूर्व जामीन याचिका फेटाळली; HC म्हणाले, “जिवाला धोका असल्याचा पुरावा...”
15
"मी स्वतःच फॉर्म भरला नाही, आता दंगलखोरांच्या पक्षासमोर...!" SIR वरून ममतांचा हल्लाबोल
16
इम्रान खानच्या तुरुंगात अडचणी आणखी वाढणार! पाकिस्तानने २४ तासात घेतले ५ मोठे निर्णय
17
"'मी गोमांस खातो, कोण मला अडवतं?', म्हणणाऱ्या मंत्र्यासोबत अमित शाह जेवताहेत, हिम्मत असेल तर...!"; उद्धव ठाकरे यांचं थेट आव्हान
18
T20 World Cup 2026 Tickets Live: ICC चा ऐतिहासिक निर्णय! फक्त १०० रुपयांत बूक करा वर्ल्ड कपचं तिकीट
19
"खुर्चीसाठी स्वत:चं पायपुसणं करून घेणाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांवर बोलू नये"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
20
IND vs SA 2nd T20I : अखेर सूर्या भाऊनं डाव साधला! टॉसचा बॉस होण्यासाठी यावेळी आजमावला हा फंडा
Daily Top 2Weekly Top 5

जनावरांच्या चा-यासाठी उसाचा वापर वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2019 17:21 IST

उसाचा पट्टा असलेल्या अहमदनगर जिल्ह्यात यंदा पावसाळा लांबल्याने जनावरांच्या चाऱ्यासाठी उसाचा वापर वाढला आहे़

भाऊसाहेब येवलेराहुरी : उसाचा पट्टा असलेल्या अहमदनगर जिल्ह्यात यंदा पावसाळा लांबल्याने जनावरांच्या चाऱ्यासाठी उसाचा वापर वाढला आहे़ जिल्ह्यातील साखर कारखाने यंदाच्या गळीत हंगामात अडचणीत येणार आहेत़ जिल्ह्यात केवळ ८० हजार हेक्टर क्षेत्रावर ऊस शिल्लक असल्याने साखर सम्राटांचे धाबे दणाणले आहेत़अहमदनगर जिल्ह्यात २३ साखर कारखाने आहेत़ गेल्यावर्षी १ लाख ३५ हजार हेक्टर क्षेत्रावर ऊस उभा होता़ यंदा मात्र उसाखालील क्षेत्र निम्म्याने घटले आहे़ पावसाळा लांबल्याने जनावरांच्या छावण्यासाठी उसाची मागणी वाढली आहे़ पावसाअभावी नव्याने गवत उगलेले नाही़ शेतात उभा असलेला उसही अखेरची घटका मोजीत आहे़ बागायती पट्ट्यात ऊस जळाल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे़ त्यामुळे शेतकऱ्यांचे लक्ष आभाळाकडे वेधले आहे़जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी ओव्हर आॅयलिंगची तयारी सुरू ठेवली आहे़ १आॅक्टोबर रोजी कारखान्यांचे धुराडे पेटणार आहे़ याशिवाय कारखान्यांनी ऊस तोडणी कामगारांशी करारही करण्यास सुरूवात केली आहे़ कार्यक्षेत्राबाहेरून ऊस आणण्याचे नियोजन करण्यात आले आहे़ त्यामुळे ऊस पळवापळवीचे धोरण चव्हाट्यावर येण्याची चिन्हे आहेत़ ऊस टंचाईमुळे काही कारखाने बंद राहणार का? असा सवालही उपस्थित केला जात आहे़ यंदा कमी गळीत करून साखर कारखाने चालवावे लागणार आहेत़ त्यामुळे भावाची स्पर्धाही होण्याची शक्यता आहे़जनावरांच्या चाºयासाठी ३५०० ते ४००० रूपये टन ऊस वाढे, पाचराटासह विकला जात आहे़पाण्याच्या टंचाईमुळे शेतकरीही ऊस जनावरांच्या छावण्याला विकत आहेत़ मका चार संपलेला आहे़ तणनाशकामुळे बागायती भागातही गवत उपलब्ध नाही़ घासावर लष्करी अळी पडल्याने अनेकांनी शेतात नांगर फिरविले आहेत़ जनावरांसाठी ऊस चारा हा एकमेव पर्याय असल्याने पशुधन वाचविण्यासाठी शेतकºयांची त्रेधातिरपट उडाली आहे़अहमदनगर जिल्ह्यात २३ साखर कारखाने आहे़ गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा निम्म्या क्षेत्रावर ऊस उपलब्ध आहे़ जनावरांच्या छावण्यासाठी उसाचा वापर होत आहे़ आॅगष्टमध्ये साखर कारखाने कमीशनरकडे ऊस गाळपाची परवानगी घेतली़ पावसाळा लांबल्याने जनावरांसाठी चाºयाचा वापर वाढला आहे़ -राजेंद्र पाटील, प्रादेशिक सहसंचालक साखर, अहमदनगर.बागायती पट्ट्यात पावसाअभावी उसाचे क्षेत्र संकटात सापडले आहे़ जनावरांच्या छावण्यांकडून उसाला चारा म्हणून मागणी वाढलेली आहे़ छावण्यासाठी शेतकºयांच्या शेतात येऊन चारा तोडून नेला जात आहे़ शेतीसाठी पावासाची गरज असून उभी पिके वाचविण्याचे शेतकºयांपुढे आव्हान आहे़ -भाऊराव ढगे, ऊस उत्पादक शेतकरी.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरी