शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

अवकाळी पावसाने २४ जनावरे दगावली; २५ घरांची पडझड

By चंद्रकांत शेळके | Updated: November 27, 2023 18:09 IST

ग्रामीण भागात काही नागरिकांच्या घरांचे किंवा जनावरांच्या गोठ्याचे नुकसान झाले.

अहमदनगर : जिल्ह्यात रविवारी झालेल्या गारपीट व अवकाळी पावसाने शेतपिकांचे मोठे नुकसान झाले. याशिवाय राहुरी व संगमनेर तालुक्यात मेंढ्या, श्रीरामपूरमध्ये १ बैल, तर पारनेर तालुक्यात ५ हजार कोंबड्या दगावल्या. २५ ठिकाणी घरांचीही पडझड झाली. दरम्यान, या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रशासनास दिल्या आहेत.

जिल्ह्यात रविवारी रात्री व सोमवारी पहाटे अवकाळी पाऊस तसेच गारपीट झाली. यामुळे ग्रामीण भागात काही नागरिकांच्या घरांचे किंवा जनावरांच्या गोठ्याचे नुकसान झाले. प्राथमिक माहितीनुसार पारनेर तालुक्यात शेतपिकांचे मोठे नुकसान झाले. १०० जनावरे जखमी झाले असून चार घरांची पडझड झाली आहे. शिवाय ५ हजार कोंबड्याही दगावल्या. संगमनेर तालुक्यात ४ मेंढ्या मयत झाल्या असून १० घरांची पडझड झाली आहे. राहुरी तालुक्यात १२ कोकरू, ६ मेंढ्या व १ शेळी मयत झाली, तर घरांची पडझड झाली. अकोले, कोपरगाव, श्रीरामपूर या तालुक्यांतही घरांची पडझड झाली. श्रीरामपूरमध्ये १ बैल दगावल्याची प्राथमिक माहिती आहे.

दरम्यान, नुकसान झालेल्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी अधिकाऱ्यांसमवेत पाहणी दौरा करणार असून सद्य:स्थितीत स्थानिक अधिकाऱ्यांनी नुकसान झालेल्या ठिकाणांचे पंचनामे करून अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले.आठ मंडळांत अतिवृष्टीपारनेर तालुक्यातील निघोज ८२ मिमी, भातकुडगाव (ता. शेवगाव) ६९ मिमी, नेवाशातील सलाबतपूर ६९ मिमी, कुकाणा ६९ मिमी, देवळाली ७४, आश्वी ७२ मिमी, तळेगाव ७० मिमी, पोहेगाव ६६ या आठ मंडळांत अतिवृष्टी झाली. याशिवाय पळशी ६०, समनापूर ५०, पिंपरणे ६१, सात्रळ ६१, ताहाराबाद ५३, टाकळीमियाँ ५७ आदी ठिकाणीही अवकाळी पाऊस झाला आहे.तालुकानिहाय पाऊस (मिलिमीटरमध्ये)नगर - १५पारनेर - ३९श्रीगोंदा ६कर्जत ३जामखेड २शेवगाव ४१पाथर्डी २७नेवासा ३५राहुरी ४५संगमनेर ५०अकोले ४६कोपरगाव ४४श्रीरामपूर ४६राहाता ४२

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर