शहरं
Join us  
Trending Stories
1
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
2
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
3
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
4
एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
5
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
6
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
7
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
8
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
9
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
10
Ahmedabad Plane Crash :या अपघाताला जबाबदार कोण? बोइंग विमानातील त्रुटी की...?
11
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
12
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
13
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
14
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
15
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
16
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
17
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
18
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण
19
ग्रुप बुकिंग केल्यास एसटीने थेट पंढरपूरला जाता येणार, ‘आषाढी’साठी ५ हजार विशेष बसेस : सरनाईक
20
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 

विद्यापीठाच्या क्रेडिट, टक्केवारीच्या खेळात विद्यार्थी ‘फेल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2018 11:10 IST

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या क्रेडिट की टक्केवारी या घोळात नगर, पुणे, नाशिक जिल्ह्यातील इंजिनिअरींगच्या विद्यार्थ्यांवर नापास होण्याची वेळ ओढावली आहे.

अहमदनगर : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या क्रेडिट की टक्केवारी या घोळात नगर, पुणे, नाशिक जिल्ह्यातील इंजिनिअरींगच्या विद्यार्थ्यांवर नापास होण्याची वेळ ओढावली आहे. विद्यापीठाने तृतीय वर्षाच्या प्रथम सत्राची परीक्षा टक्केवारी पद्धतीने घेऊन निकाल के्रडिट पद्धतीने जाहीर केला.  तर द्वितीय सत्राची परीक्षा सुरु झाल्यानंतर पाचदिवसांनी विद्यापीठाने पुन्हा टक्केवारी पद्धत लागू केली. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांवर नापासाचा शिक्का बसलाआहे़विद्यापीठाने २०१७ मध्ये तृतीय वर्षाच्या प्रथम सत्राची परीक्षा घेतली. त्यावेळी ही परीक्षा टक्केवारी पध्दतीने होणार असल्याचे सांगितले. निकालही टक्केवारीनुसारच जाहीर करण्याचे परिपत्रकही काढले. मात्र विद्यापीठाने क्रेडिट सिस्टिमनुसार निकाल जाहीर केला. त्यानंतर मे- २०१८ मध्ये व्दितीय सत्राची परीक्षा झाली.यामध्ये परीक्षा सुरु होऊन पाच दिवस झाल्यानंतर विद्यापीठाने अचानक टक्केवारी पद्धत लागू करण्यात येणार असल्याचे परिपत्रक काढले. मात्र विद्यार्थ्यांनी अगोदरची क्रेडिट पद्धती गृहित धरुन पेपर सोडविले़ विद्यापीठाने टक्केवारी पद्धतीनुसार निकाल जाहीर केला. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांवर तीनपेक्षा जास्त विषयात नापास होण्याची वेळ आली. तीनपेक्षा जास्त विषयात नापास झाल्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील वर्गात आता प्रवेश मिळणार नाही़ त्यामुळे विद्यापीठाने सर्वच निकाल क्रे डिट पध्दतीने जाहीर करावा, अशी मागणी विद्यार्थ्यांनी विद्यापीठाकडे केली आहे.क्रेडिट व टक्केवारी पद्धतीमधील फरकके्रडिट सिस्टिममध्ये पास होण्याची संधी जास्त असते. के्रडिट सिस्टिममध्ये तुम्ही किती विषयांत नापास झाला हे पाहिले जात नाही, तर सर्व विषयांत २५ पेक्षा जास्त के्रडिट असेल तर पुढील वर्गात प्रवेश मिळतो. त्यामुळे क्रेडिट सिस्टिम विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर आहे. टक्केवारी पद्धतीत १०० पैकी ४० टक्के गुण व तीन विषयांत उत्तीर्ण असाल तरच पुढील वर्गात प्रवेश मिळतो. विद्यापीठाच्या चुकीच्या निर्णयामुळे अनेक विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे विद्यापीठाने निर्णय बदलून सर्वच निकाल क्रेडिट सिस्टिमने जाहीर करावेत. जेणेकरुन विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही.-धीरज कुमटकर, विद्यार्थीविद्यापीठाने परीक्षा सुरु असताना अचानकपणे निर्णय कळविला. त्यामुळे विद्यार्थी गोंधळून गेले. या निर्णयामुळे नक्कीच विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे. विद्यार्थ्यांचे म्हणणे विद्यापीठाला कळविले असून सकारात्मक निर्णयाची अपेक्षा आहे. - डॉ. राजकुमार देशपांडे, प्राचार्य, छत्रपती शिवाजी महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय, नेप्ती

टॅग्स :AhmednagarअहमदनगरPune universityपुणे विद्यापीठ