शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

रेल्वे प्रवासातील अनोखे व्यक्तीमत्व...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2019 12:11 IST

अख्खा भारत एकाच ठिकाणी पाहायला मिळणारं ठिकाण म्हणजे रेल्वे. मार्क्स-लेनिनने मांडलेल्या क्लास थिएरीचा उलगडाच रेल्वेतूनच होतो.

शिवाजी पवार

अहमदनगर : अख्खा भारत एकाच ठिकाणी पाहायला मिळणारं ठिकाण म्हणजे रेल्वे. मार्क्स-लेनिनने मांडलेल्या क्लास थिएरीचा उलगडाच रेल्वेतूनच होतो. मग ते स्लिपर बोगीतील मध्यमवर्गीय असोत की एसीचे टू टियर आणि थ्री टीयरचा उच्चभू्र वर्ग. सर्वसामान्य पोटाची खळगी भरणाऱ्या आणि कायमच स्थलांतराचे जीवन जगणाºयांसाठीचे एक-दोन जनरल डबे. भाषा, प्रांत, संस्कृती, मानवी स्वभावातील कल्पना पलीकडील पैैलूंचा उलगडा होतो. ते पाहून कधीकधी कल्पना शक्तीदेखील खुजी पडते. असाच एकदा प्रवासादरम्यान अनुभवलेले अनोखे व्यक्तीमत्व...एकदा नगरहून श्रीरामपूरला प्रवास करत असताना दुपारच्या पॅसेंजरमधील (अर्थातच जनरल डबा) घटना. दौंड-नांदेड रेल्वे होती ती. यात मराठवाडा, विदर्भातील मजुरांचा भरणा जास्तच असतो. पुण्यात बांधकाम व्यवसायात पोटाची खळगी भरणे अथवा बागायतदारांकडे सालाने कामे करणारी ही मंडळी. अख्खं कुटुंबच स्थलांतरित होतं. बायका-पोरांसह एक दोन गाठोड्यातला त्यांचा प्रपंच. अशाच काही मजुरांच्या गप्पा अधूनमधून ऐकत होतो. पश्चिम महाराष्टÑातल्या धरणांच्या गप्पा मारत होते ते. कोणते धरण कुठल्या तालुक्या-जिल्ह्यात आहे आणि त्याचे पाणी कुठल्या भागात पोहोचते असा विषय. असा काय तो विषय होता त्यांच्या चर्चेचा असेल हे सांगता येणं कठीण. भूगोलाच्या ज्ञानात एकमेकांत भारी पडण्याचा त्यांच्यात प्रयत्न सुरू होता. तेवढ्यात एक तृतीयपंथी पैसे उकळायला आला. त्या सगळ्या मजुरांनी दहा-दहा रुपये इमानेइतबारे दिले. न बोलता, वाद न घालता, अगदी चुपचाप. यानंतर कुठल्यातरी एका स्टेशनवरून चाळीशीतला एकजण येऊन धडकला. धडकलाच म्हणावं लागेल त्याला. शरीरयष्टी होतीच तशी त्याची. कडक व लालबुंद नजर, खाकी रंगाची पँट, काहीसा मळालेला शर्ट आणि त्या शर्टबाहेर सारखे बाहेर पडण्याच्या प्रयत्नात असलेले त्याचे पोट. रूंद चेहरा आणि चेहºयावरील व्रणामुळे भेदक दिसत होता तो. पढेगाव स्थानकावरून बसला तो.एवढ्यात त्या मजुरातील एकाने (बारीक शरीरयष्टीचा) सवयीप्रमाणे बिडी काढली. चार-पाच मित्र होते त्यासोबत. बिडी पेटवणार तोच त्या खाकी पॅटवाल्यानं बिडीचा कट्टा त्या मजुराच्या हातातून हिसकावून घेतला. ‘काय रे बिडी पिती का हरामखोरा’, तो खेकसला. ‘नाही साहेब पित नव्हतो, फक्त पाहत होतो’, बारीक आवाजाने कसबसं स्पष्टीकरण दिलं.‘कसकाय बिडी पितो रे, रेल्वेचे कायदे तुला माहीत नाही का?’ असा दम भरला त्या पठ्ठ्यानं. दोन डब्यातल्या मोकळ्या जागेत हे सगळं घडत होतं. दोन-तीन कॉलेजची लोकल पोरंही होती आजूबाजूला. वातावरण थोड्याच वेळात गंभीर बनलं. ‘तुझी फुकट राहण्याची, जेवणाची सोय करू का?’ तो तरूण पुन्हा गरजला. या वाक्याचा अर्थ क्षणभर कोणालाच कळला नाही. ‘रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देतो हरामखोरा तुला’, पुन्हा डरकाळी फोडली त्यानं. या दरम्यान मजुरांचं ते टाळकं कुठं विखुरलं गेलं काहीच कळालं नाही. तो एकटाच तिथं राहिला होता. ‘चुकलं साहेब, फेकून द्या ती बिडी, परत न्हायी पिणार’ रडवलेला चेहरा आणि जीव काकुळतीला येऊन तो मजूर म्हणाला.‘मी धरल्यावर असंच म्हणणार तू. एवढ्यात त्याने माझ्याकडं पाहत डोळा मारला. रॅगिंग घेत होता त्यांची एव्हाना हे माझ्या लक्षात आले. श्रीरामपूर स्टेशन जवळ येत होतं. प्रकरण आता निवेल असेही वाटलं.पण आता मात्र प्रकरण शिविगाळीपर्यंत गेल. एवढंच काय तो तरूण धावून गेला त्या मजुरावर. त्याच क्षणी तो फिरकी घेत होता हा विचार गळून पडला.‘मुस्काड फोडीन तुझं, कोणकोण आहे तुझ्याबरोबर, चला उतरा खाली आता.’ श्रीरामपूरला पोलिसांच्या ताब्यात देतो तुम्हाला. ‘गाडी पेटवायची होती काय तुम्हाला. बिडीचा कट्टा लपवू नको’. तो आणखी आक्रमक झाला. तो मजूर आपल्या सहकाºयांबरोबर वरच्या सीटवर गर्दीत जाऊन बसलेला होता. हा पठ्ठ्या खाली उभा राहूनच शिवीगाळ करत होता.तो मजूर नजरेनेच माझ्याकडे विचारणा करत होता. खरंच पोलीस आहे का तो? हा त्याचा प्रश्न होता. कुठलीही प्रतिक्रिया देण्याच्या स्थितीत मी नव्हतो. कारण मारामारीच्या उंबरठ्याावरच प्रसंग आला होता. बोगीतील कुणीही प्रवासी हसण्याचा प्रयत्न करत नव्हते. त्यानं वातावरण अधिकच गंभीर झाले.एवढ्याात श्रीरामपूर स्टेशनवर गाडी पोहोचली. ती मजूर मंडळी शांतपणे बसलेली होती. आजूबाजूला वरच्या सीटवर बसलेले त्याचे सहकारी आम्ही त्याच्याबरोबर (पीडित) नसल्याचेच जणू दाखवत होते.गाडी थांबल्यावर उतरला अखेर तो. मीही पटकन त्याच्या मागोमाग चालायला लागलो. नक्की कोण आहे हा मलाही प्रश्न पडलेला होता. स्टेशनबाहेर मुख्य रस्त्यापर्यंत आलो मी. तेवढ्या वेळात रस्ता पार करून गेला होता पठ्ठ्या. पलिकडेच बुक स्टॉलवर जाऊन पोहोचला. मागोमाग उभे राहून अगदी निरखून सर्व पाहत होतो मी. पुस्तकाच्या दुकानात काय करतोय हा, आता मात्र माझे कुतूहल वाढले होते. आश्चर्य वाटत होतं.बुक स्टॉलवर एका फळ्याला पोलीस भरतीच्या जाहिराती चिकटविलेल्या होत्या. निरीक्षक, उपनिरीक्षक, हवालदार अशा स्वरूपाच्या जाहिरातींची कात्रणे जास्त दिसली. मात्र, जागांची संख्या अवघी ५-१०वर होती. थोड्याच वेळात जाहिराती वाचण्यात दंग झाला होता तो. सिरियस बनलेला तो...नक्की कोण होता. त्याचा हळूहळू उलगडा आता झाला होता. 

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर