शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूर-पुणे महामार्गावर ट्रॅव्हल्स बसचा अपघात; पुणे अन् मराठवाड्यातील ३० प्रवासी गंभीर जखमी
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; १२ देशांच्या नागरिकांना अमेरिकेत प्रवेश नाही, ७ देशांवरही कडक निर्बंध
3
राजेंद्र दर्डा यांना इंग्लंडमधील प्रतिष्ठित ‘वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ एक्सलन्स’ पुरस्कार प्रदान
4
'हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र'अंतर्गत यंदा राज्यात १० कोटी वृक्ष लावणार: मुख्यमंत्री
5
भारतानं चुपचाप टाकले आपले पत्ते, चीनचं वाढणार टेन्शन; टॅरिफवरील ही भविष्यवाणी समजून घ्या
6
मंत्र्यांच्या आयपॅडसाठी १ कोटी ६ लाख; शासनाच्या ई-कॅबिनेट प्रणालीच्या अंमलबजावणीसाठी खर्च
7
ज्येष्ठ निर्जला एकादशी: १ शुभ, १ अशुभ योग; ७ राशींची चंगळ, लक्ष्मी कृपेने धनलाभ, भरभराट काळ!
8
तब्बल सहा महिने उलटून गेले तरीही राज्यमंत्री अधिकारांविनाच; उरले फक्त पदापुरते
9
पूररेषेच्या आतील अतिक्रमणे रोखा, सर्व्हेक्षणात अचूकतेसाठी उपग्रहाद्वारे मॅपिंग करा- मुख्यमंत्री
10
स्टाफ नर्स घोटाळ्याचे धक्कादायक वास्तव! पैसे घेतात अन् मुंबईत संबंधित कागदपत्रे तपासतात
11
आजचे राशीभविष्य : ०५ जून २०२५; आज क्रोधावर नियंत्रण ठेवावे लागेल, शुभ कार्याची प्रेरणा मिळेल
12
संयम आणि आक्रमकतेचा मिलाफ! भारतीय क्रिकेटचा नवा 'कॅप्टन कूल' म्हणून श्रेयस अय्यरचा उदय
13
अकरावीसाठी १२.२ लाख अर्ज; आज शेवटचा दिवस; ९०० तक्रारी प्रलंबित असल्याची माहिती
14
विशेष नव्हे, आता थेट पावसाळी अधिवेशन; ऑपरेशन सिंदूरमुळे विरोधकांकडून होती मागणी
15
जय श्रीराम! इलॉन मस्क यांचे वडील इरॉल मस्क यांनी अयोध्येत घेतले रामललाचे दर्शन
16
१००ची वस्तू १९ हजारांना; बंदी असूनही UAEमार्गे पाकशी जोडलेला व्यापार भरभराटीला
17
जातनिहाय जनगणना देशासाठी का महत्त्वाची? नेमका कुणाला, किती फायदा? जाणून घेऊया
18
दहिसर ते अंधेरी मेट्रो २ अ आणि दहिसर ते गुंदवली मेट्रो ७ मार्गिका ठरल्या कार्बन न्युट्रल कॉरिडॉर
19
एनएमएमटीच्या चार बस जळून खाक; घणसोली आगारात आणखी तीन ते चार बसचे नुकसान
20
बंगळुरुच्या जल्लोषात चेंगराचेंगरी, अतिउत्साह बेतला जिवावर; ११ ठार, ३३ जण जखमी

‘बीआरजीएफ’च्या कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीचे संकट

By admin | Updated: June 29, 2016 00:53 IST

अहमदनगर : केंद्र शासनाने ‘बीआरजीएफ’च्या कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीचे संकट मागासक्षेत्र विकास अनुदान योजना (बीआरजीएफ) बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

अहमदनगर : केंद्र शासनाने ‘बीआरजीएफ’च्या कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीचे संकट मागासक्षेत्र विकास अनुदान योजना (बीआरजीएफ) बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ३० जूनपासून या प्रकल्पावर कार्यरत असणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा संपुष्टात आणली जाणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील ४८० तरुणांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार आहे. सरकारी योजनांवर कंत्राटी तत्त्वावर कर्मचारी नियुक्त करायचे व योजना पूर्ण होताच या कर्मचाऱ्यांची सेवा संपुष्टात आणून त्यांना दूर करायचे, अशी नवी निती सरकार दरबारी आली आहे. याचा फटका ऐन उमेदीत अनेक तरुणांना बसत आहे. राज्यात २००६-०७ पासून मागास क्षेत्र विकास अनुदान योजना सुरु होती. यामध्ये अभियंता, समाजप्रवर्तक, डाटा एन्ट्री आॅपरेटर, लेखापाल अशी विविध पदे कंत्राटी तत्वावर भरण्यात आली. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणांनी या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातूनच योजनेची अंमलबजावणी केली. अभियांत्रिकी तसेच समाजकार्य विषयातील अनेक पदवीधर या योजनेवर कार्यरत होते. आपल्या उमेदीतील जवळपास दहा वर्षे त्यांनी योजनेवर काम केले. मासिक मानधनाव्यतिरिक्त त्यांना इतर कुठलेही लाभ या काळात दिले गेले नाहीत. आता तर केंद्राने योजनाच बंद करण्याचा निर्णय घेतल्याने हे सर्व तरुण एका झटक्यात बेरोजगार होणार आहेत. ग्रामविकास विभागाचे कक्ष अधिकारी चंद्रकांत बळीप यांनी कर्मचाऱ्यांची सेवा संपुष्टात आणण्याचा आदेश पाठविला आहे. केवळ अभियंता व लेखापाल या दोन पदांना एक महिन्यापुरती मुदतवाढ दिली जाणार आहे. विविध योजनांमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांबाबत सरकारने अशीच वापरा व दूर फेका अशी निती अवलंबली आहे. त्यामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष आहे. नियमित सरकारी कर्मचाऱ्यांच्या संघटनाही कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष देत नाहीत. मंत्रालयातील प्रशासकीय लॉबी निवृत्तीनंतरही आपल्या अनेक अधिकाऱ्यांना कंत्राटी तत्त्वावर बढती देऊन त्यांचे हितसंबंध जपते. दुसरीकडे तरुण कंत्राटी कर्मचाऱ्यांना मात्र घरचा रस्ता दाखविला जातो. (प्रतिनिधी)