शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा ‘निकाल’ लागताच राज ठाकरे-CM फडणवीस भेट; पाऊण तास चर्चा, तर्कांना उधाण
2
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
3
Coconut Oil : नारळ तेल बनलं VIP प्रोडक्ट; दोन वर्षांत तीन पटींनी वाढली किंमत
4
शाळेत मारल्याच्या रागातून नववीतील विद्यार्थ्याने शिक्षकावर झाडली गोळी, लंच बॉक्समधून आणला कट्टा आणि...  
5
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
6
OMG! आर्यन खानची पहिलीच सीरिज आग लावणार, प्रीव्ह्यूच्या शेवटी 'त्या' डायलॉगने वेधलं लक्ष
7
अमेरिकेची 'मोस्ट वॉन्टेड' महिला अखेर भारतात सापडली, एफबीआयने केली मोठी कारवाई!
8
BEST Election Results: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
9
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
11
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली
12
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
13
अदानींनी परदेशी बँकांकडून घेतलं 24000000000 रुपयांचं कर्ज! जाणून घ्या, एवढ्या मोठ्या रकमेचं काय करणार? किती व्याज लागणार? 
14
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
15
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
16
अक्षय कुमार, अर्शद वारसी हाजिर हो..! दिवाणी न्यायालयात प्रकरण दाखल; कारण काय?
17
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
18
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
19
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
20
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ

हमीभावाने उडीद खरेदीस व्यापा-यांची टाळाटाळ; शेतक-यांचा रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 16:05 IST

जामखेड : हमी भावाने उडीद खरेदी करण्यास नकार देणा-या व्यापा-यांवर कारवाई करावी, या मागणीसाठी राजकीय पक्ष, विविध संघटना आणि ...

ठळक मुद्देउडीद खरेदी करण्यासाठी शासनाने ५४०० रुपये हमीभाव ठरविलेला आहे. मात्र, आडत व्यापारी दोन ते तीन हजार रुपये क्विंटलने उडीद खरेदी करतात.सरकारने उडीद खरेदी केंद्र सुरू करावे, अशी मागणी.

जामखेड : हमी भावाने उडीद खरेदी करण्यास नकार देणा-या व्यापा-यांवर कारवाई करावी, या मागणीसाठी राजकीय पक्ष, विविध संघटना आणि शेतक-यांनी जामखेड येथील खर्डा चौकात शनिवारी रास्ता रोको केला.उडीद खरेदी करण्यासाठी शासनाने ५४०० रुपये हमीभाव ठरविलेला आहे. मात्र, आडत व्यापारी दोन ते तीन हजार रुपये क्विंटलने उडीद खरेदी करतात. व्यापा-यांच्या या निर्णयामुळे राजकीय पक्ष, विविध संघटना, शेतक-यांच्या वतीने खर्डा चौकात रास्ता रोको आंदोलन करुन व्यापा-यांवर गुन्हे दाखल करावेत, उडीद खरेदी केंद्र सुरू करावे, अशी मागणी करण्यात आली.आधारभूत किंमतीने उडीद खरेदी करण्याच्या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडचे नाशिक विभागीय अध्यक्ष अण्णासाहेब सावंत, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र कोठारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रा. मधुकर राळेभात आदींच्या नेतृत्वाखाली हा रास्ता रोको करण्यात आला़ यावेळी शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष अमजद पठाण, स्वाभिमानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण बोलभट, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विष्णू गंभिरे, युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष नरेंद्र जाधव, सरचिटणीस अमोल गिरमे, पाटोद्याचे माजी सरपंच समीरभाई पठाण, शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष रावसाहेब खोत, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ऋषिकेश डुचे, संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष विलास पोते, शिवसेनेचे गटप्रमुख भिमराव पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. तहसीलदार विजय भंडारी यांनी शेतकºयांच्या मागण्यांचे निवेदन स्वीकारुन उडीद खरेदी केंद्र सुरू करण्याबाबत चर्चा करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले.सरकारी धोरणांमुळेच शेतक-यांची अवहेलनाराष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रा. मधुकर राळेभात म्हणाले, शेतकरी नैसर्गिक व आर्थिक अडचणींवर मात करून पिकवलेला माल बाजारात विक्रीसाठी आणतो़ मात्र, व्यापारी कमी किमतीने देऊन बाजारभाव ढासळतात. सरकारने जर आधारभूत किंमत ठरवून दिली असेल तर त्याच किंमतीने व्यापा-यांनी शेतमाल खरेदी करणे बंधनकारक आहे़ आधारभूत किंमतीने शेतमाल खरेदी न करणा-या व्यापा-यांवर गुन्हे नोंदवून त्यांचे थेट परवाने रद्द केले जावेत़ पण सरकार तसे करीत नाही़ सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळेच शेतकºयांची अवहेलना सुरु आहे़ शेतात केलेला खर्च निघत नसेल तर त्याने कुटुंब चालवयाचे कसे? कर्जबाजारी शेतक-यांना कर्जमाफी देताना सरकारने अटीचा डोंगर उभा केला आहे़ आॅनलाईन फॉर्म भरण्यास लावून शेतक-यांना कर्जमाफीपासून दूर लोटले आहे़ कर्जमाफीमाफीच्या नावाखाली सरकार शेतक-यांची टिंगल सरकार करीत आहे.