शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

रांजणगावात आणखी दोन गायी दगावल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:20 IST

कोपरगाव : तालुक्यातील रांजणगाव देशमुख येथे शुक्रवारी व शनिवारी या दोन दिवसात आणखी दोन गायींचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे ...

कोपरगाव : तालुक्यातील रांजणगाव देशमुख येथे शुक्रवारी व शनिवारी या दोन दिवसात आणखी दोन गायींचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे गावातील एकूण मृत जनावरांचा आकडा आता नऊवर गेल्याने गावातील पशुपालक भयभीत झाले आहेत. तर जनावरांच्या मृत्यूमुळे पशुपालकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. हा मृत्यू मूरघास खाऊ घातल्याने तर होत नाहीना अशी शंका स्थानिक पातळीवर ग्रामस्थांमधून वर्तविली जात आहे.

रांजणगाव देशमुखमध्ये बुधवारी व गुरुवारी या दोन दिवसात कैलास मुरलीधर गोर्डे या शेतकऱ्याच्या चार गायी दगावला होत्या. तर दशरथ साहेबराव खालकर, संपत खालकर यांची प्रत्येकी एक गाय तर अनिल खालकर यांचा एक बैल अशी एकूण सात जनावरे दगावली होती. येथील जनावरे दगावण्याचे सत्र अद्यापही सुरूच असल्याने कैलास गोर्डे यांची व दशरथ खालकर यांची गत दोन दिवसात प्रत्येकी एक गाय मृत झाली आहे. त्यामुळे एकट्या गोर्डे यांच्या तब्बल पाच तर खालकर यांच्या दोन गायी दगावल्या आहेत.

...

पशुपालक चिंतेत

रांजणगाव येथे पशुसंवर्धन विभागाच्या वरिष्ठ पातळीवरील अधिकाऱ्यांनी भेट दिली होती. मृत जनावरांचे चारा, खाद्य व रक्ताचे नमुने घेऊन तपासणीसाठी पुणे येथे पाठविले होते. त्याचा अहवाल आल्यानंतर जनावरांचा मृत्यू हा हिरवा चारा घातल्यानेच झाला असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यावर पशुपालकांनी जनावरांना हिरवा चारा देणे बंद केले, तरीही जनावरे दगावत आहे. त्यामुळे जनावरे दगावण्याचे नेमके कारण काय असू शकते यातच पशुपालक पुरते चक्रावून गेले आहे.