शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
2
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
3
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
4
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
5
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
6
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
7
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
8
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
9
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
10
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
11
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
12
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
13
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
14
पावसाची उसंत पण धरणाातून पाण्याचा विसर्ग; नद्या आल्या रस्त्यांवर, पुराचा विळखा अजूनही घट्ट
15
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
16
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
17
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
18
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
19
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
20
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा

राज्यातील २ लाख अंगणवाडी कर्मचारी सोमवारपासून संपावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 13:26 IST

श्रीरामपूर : राज्यातील अंगणवाडी कर्मचा-यांच्या मानधनात वाढ करण्याच्या मागणीसाठी राज्यातील २ लाख अंगणवाडी कर्मचारी सोमवार ११ सप्टेंबरपासून राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या नेतृत्वाखाली बेमुदत संपावर जाणार असल्याचे समितीचे पदाधिकारी राजेंद्र बावके यांनी सांगितले.

श्रीरामपूर : राज्यातील अंगणवाडी कर्मचा-यांच्या मानधनात वाढ करण्याच्या मागणीसाठी राज्यातील २ लाख अंगणवाडी कर्मचारी सोमवार ११ सप्टेंबरपासून राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या नेतृत्वाखाली बेमुदत संपावर जाणार असल्याचे समितीचे पदाधिकारी राजेंद्र बावके यांनी सांगितले.वेतनवाढीसाठी सरकारने ‘मानधन वाढ समिती’ गठित केली होती. समितीने सादर केलेल्या शिफारशीनुसार  मानधन वाढी संदर्भात मे २०१७ पर्यंत सरकारी आदेश काढण्याचे आश्वासन महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिले होते. मात्र आजपर्यत याबाबत सरकारी पातळीवर कोणतीही कार्यवाही होत नसल्याने ११ सप्टेंबरपासून राज्यातील २ लाख अंगणवाडी संपावर जात आहेत. जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी कर्मचा-यांनी या संपामध्ये सहभागी होण्याचे आवाहन राजेंद्र बावके,बाळासाहेब सुरुडे,मदिना शेख, शरद संसारे, जीवन सुरुडे, माया जाजू, इंदूबाई दुशीग,शोभा लांडगे,नंदा पाचपुते, संजीवनी आमले, रतन गोरे,लक्ष्मी चव्हाण,मन्नाबी शेख,सुजाता शिंदे, रागिनी जाधव, मीना कुटे, वंदना गमे,शर्मिला रणधीर, सुनंदा नाईक,शोभा विसपुते,नजराणा शेख,मुक्ता हासे आदींनी केले आहे. संपाच्या दुस-च दिवशी १२ सप्टेंबरला कृती समितीमधील सर्व ७ संघटना मुंबईतील आझाद मैदानात तीव्र निदर्शने करणार आहेत...................................मानधनवाढ समिती गठीतराज्यात वर्षभर अंगणवाडी कर्मचाºयांच्या मानधनवाढीची प्रक्रिया सुरू आहे. २० जुलै २०१६ ला महिला व बालविकास विभागाने मानधनवाढ समितीचा शासकीय आदेश जारी केला. त्यानंतर  सचिवांच्या अध्यक्षतेखाली समितीच्या अनेक बैठका झाल्या. अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने सरकारशी वेळोवेळी याबाबत चर्चा करूनही प्रश्न न सुटल्याने संपावर जाण्याचा निर्णय घेण्यात आला. मिळालेल्या आश्वासनानुसार कृती समितीने ३० मे पर्यंत म्हणजे दोन महिने वाट पाहिली व ३१ मे रोजी पुन्हा एकदा आझाद मैदानात आंदोलन केले. मानधनवाढीच्या प्रस्तावाची प्रक्रिया सुरू असून लवकरच मुख्यमंत्र्यासोबत बैठक घेण्यात येईल असे समजल्याने वाट पाहण्याचा निर्णय घेण्यात आला. तीन महिन्यात कोणताही निर्णय न झाल्यामुळे जिल्हा व राज्य पातळीवर आंदोलने केल्यानंतर ११ सप्टेंबरपासून बेमुदत संप करण्याचा निर्णय कृती समितीने घेतला.