शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

ट्रक-दुचाकी अपघातात दोन ठार

By admin | Updated: June 27, 2016 01:01 IST

संगमनेर : मालवाहू ट्रक व दुचाकीची समोरासमोर धडक होवून अपघातात दोन परप्रांतीय जागीच ठार झाल्याची घटना रविवारी सकाळी नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील माहुली शिवारात घडली.

संगमनेर : मालवाहू ट्रक व दुचाकीची समोरासमोर धडक होवून अपघातात दोन परप्रांतीय जागीच ठार झाल्याची घटना रविवारी सकाळी नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील माहुली शिवारात घडली. याप्रकरणी घारगाव पोलिसात अपघाताचा गुन्हा दाखल झाला आहे. ट्रक चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले.रविवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास राम आशिषचंद्रिका यादव (वय ४४) व मोहंमद शबूअली (दोघे मूळ बिहार, हल्ली रा. अंबड, नाशिक) हे दोघे दुचाकीवरून (एम. एच. १५, र्ई. एम. ७६६८) नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गाने आळेफाट्याहून संगमनेरच्या दिशेने येत होते. यावेळी माहुली शिवारात संगमनेहून पुण्याच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या मालवाहू ट्रकची (एम. एच. १२, के. पी. ६५०२) दुचाकीला समोरून जोराची धडक बसली. यात दुचाकीवरील यादव व शबूअली हे दोघे गंभीर मार लागल्याने जागीच ठार झाले. अपघातात दुचाकीचा चक्काचूर झाला. ग्रामस्थांच्या मदतीने दोघांचे मृतदेह रुग्णवाहिकेतून घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मयत हे बिहार राज्यातील असून यादव हा बांधकाम ठेकेदार तर शबूअली हा त्याच्याकडे कामाला होता. दोघेही अंबड (नाशिक) येथे वास्तव्यास होते. कामानिमित्त ते दुचाकीवरून आळेफाट्याला गेले होते. घरी परतताना काळाने त्यांच्यावर घाला घातला. सायंकाळी शवविच्छेदन झाल्यावर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. याप्रकरणी घारगाव पोलिसात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला. सायंकाळी पोलिसांनी संतोष पवार (रा.घोळेवाडी, ता.पाटोदा, जि.बीड) या ट्रक चालकास अटक केली.(प्रतिनिधी) भिंगार : नगर -जामखेड रोडवर टँकर व जीप यांच्यात समोरासमोर झालेल्या धडकेत जीप चालक नितीन बाजीराव राठोड (वय २७, रा. शिवाजीनगर, नेप्ती रोड) हे जागीच ठार झाले. हा अपघात रविवारी सकाळी घडला.लातूरकडून नगरकडे येणारा टँकर (टीएल १६-ए ७६६३) आणि नगरकडून जामखेडच्या दिशेने जाणारी स्कार्पिओ जीप (टीएल १६, एके-१७५०) यांच्यात हॉटेल उत्सवसमोर जोरदार धडक झाली. या अपघातात जीपचालक गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या प्रकरणी कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त वाहने बाजूला सारत वाहतूक सुरळीत केली. दरम्यान, उस्मानाबाद जिल्ह्यात तुळजापूर रोडवर राठोड यांच्या पाहुण्यांच्या वाहनाला अपघात झाला होता. त्यांच्या वाहनाचे नुकसान झाले होते. त्यांना तुळजापूर येथून आणण्यासाठी राठोड हे जीप घेवून तुळजापूरकडे निघाले होते. मात्र, रस्त्यातच त्यांच्यावर काळाने झडप घातली. (वार्ताहर)