शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
IND vs PAK Asia Cup 2025 : भारत-पाक 'महायुद्ध'! कुठं अन् कसा पाहता येईल जेतेपदासाठीचा ऐतिहासिक सामना?
3
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
4
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
5
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
6
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
7
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
8
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
9
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
10
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
11
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
12
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
13
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
14
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
15
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
16
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
17
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
18
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
19
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
20
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?

लॉकडाऊनमध्ये झाले दोनाचे चार हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:21 IST

अहमदनगर : कोरोना काळात विवाहाचे प्रमाण घटले, असे कुणाला वाटत असेल तर तो गैरसमज आहे. गेल्या तीन वर्षांतील विवाह ...

अहमदनगर : कोरोना काळात विवाहाचे प्रमाण घटले, असे कुणाला वाटत असेल तर तो गैरसमज आहे. गेल्या तीन वर्षांतील विवाह नोंदणीची आकडेवारी पाहता त्यात फारशी घट झालेली नाही. त्यामुळे कोरोना असला तरी विवाह थांबलेले नव्हते, हे यावरून स्पष्ट झाले आहे.

जिल्ह्यावर गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचे संकट आहे. मागील वर्षी कोराना होता. पहिल्या लाटेत विवाह सोहळ्यांना गर्दी करण्यास बंदी होती. दुसऱ्या वर्षीही प्रशासनाने गर्दी करण्यास बंदी घातलेली होती; परंतु अशाही परिस्थितीत अनेकांनी विवाह उरकून घेत दोनाचे चार हात केले. घरातील कार्य उरकून त्याची सरकारी दप्तरी नोंदही केली. दोन्ही कुटुंबातील मंडळींनी एकत्र विवाह लावले. कुठलाही डामडौल नाही. गर्दी नाही, असेच विवाह सोहळे झाले. दुसऱ्या लाटेतही मोठ्या प्रमाणावर व कमी खर्चात, कमी गर्दीत विवाह झाले. लॉकडाऊन सुरू असला तरी विवाह सोहळ्यांच्या संख्येत वाढ झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

....

कधी किती झाले नोंदणी विवाह

सन २०१८- ३३८

सन- २०१९-३८९

सन- २०२०- ३८१

सन २१२१

जानेवारी- ४१

फेब्रुवारी- ३१

मार्च- ३३

एप्रिल- ३४

मे- २७

जून- ३६

...

सहा महिन्यांत दोनशे विवाह

चालू वर्षात गेल्या सहा महिन्यांत २०२ विवाहांची नोंदणी करण्यात आली आहे. गेल्या सहा महिन्यांत लॉकडाऊन होता. लॉकडाऊन असला तरी विवाह पार पडले असून, नियमांचे पालन करून घरगुती पद्धतीने विवाह करण्यात आले आहेत.

...

- लॉकडाऊन असला तरी विवाह नोंदणीत फारसा परिणाम झालेला नाही. जिल्ह्यातील गेल्या तीन वर्षांतील आकडेवारी पाहता विवाह थांबलेले नाहीत. विवाह सुरूच असून, त्याची नोंदही करण्यात आली आहे.

- कणसे, मुदांक शुल्क विभाग