शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
3
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
4
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
5
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
6
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
7
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
8
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
9
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
10
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
11
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

अहमदनगर जिल्ह्यात दोन शेतकर्‍यांची आत्महत्या

By admin | Updated: February 3, 2015 17:27 IST

कर्जत तालुक्यातील रेहकुरी येथे एका शेतकर्‍याने शुक्रवारी विष घेऊन तर अकोले तालुक्यातील बोरी गावातील शेतकर्‍याने सोमवारी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.

 कोतूळ/कुळधरण(अहमदनगर) : कर्जत तालुक्यातील रेहकुरी येथे एका शेतकर्‍याने शुक्रवारी विष घेऊन तर अकोले तालुक्यातील बोरी गावातील शेतकर्‍याने सोमवारी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. रेहेकुरी येथील सुदाम उमाजी मांडगे या शेतकर्‍याने विष घेऊन शुक्रवारी आत्महत्या केली. ते ६0 वर्षांचे होते. त्यांच्या पश्‍चात पत्नी व दोन मुले आहेत. त्यांच्या नावे दोन हेक्टर तीस गुंठे जमीन असून पाच लाखांचे कर्ज होते. कर्जाच्या तगाद्यामुळे मांडगे यांनी आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. मांडगे यांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत मिळण्याबाबत प्रस्ताव पाठविल्याचे तहसीलदार जयसिंग भैसडे यांनी सांगितले.दुसर्‍या घटनेत कोतूळजवळील बोरी येथील शेतकरी सुदाम तुकाराम साबळे (वय ६५) या शेतकर्‍याने झाडाला गळफास घेवून आत्महत्या केल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी अकोले पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. साबळे यांना ३ एकर जमीन होती. ५ मुली असल्याने सर्वांचे लग्न शेतीचे तोकड्या उत्पन्नावर केले. उदरनिर्वाहाचे दुसरे साधन नसल्याने सहा महिन्यांपूर्वी त्यांनी ३ एकर जमीन नातेवाईकास विकली. ज्या शेतीवर आयुष्याची गुजराण केली, तीच विकावी लागल्याचे शल्य साबळे यांच्या मनात होते.