अहमदनगर : केव्हाही आणि कधीही गायब होणारी वीज आणि त्यासाठी अधिकार्यांनी इमर्जन्सीचे नेहमीचे उत्तर याला नागरिक वैतागले आहेत. दोन दिवसांत यावर तोडगा न निघाल्यास कार्यालयाची तोडफोड करण्याचा इशारा आमदार अनिल राठोड यांनी देताच त्यावर रात्री कोठेही भारनियमन होणार नाही. तांत्रिक बिघाड अर्ध्या तासात दूर केला जाईल, असे महावितरणच्या अधिकार्यांनी सांगितले. उर्वरित प्रश्नांसंदर्भात महापालिकेसोबत संयुक्त बैठक घेऊ, असे जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयात शहरातील भारनियमनासंदर्भात जिल्हाधिकारी कवडे यांनी बैठक बोलावली होती. यावेळी आमदार राठोड, माजी महापौर भगवान फुलसौंदर, शिवसेनेचे शहराध्यक्ष संभाजी कदम, संजय चोपडा, महावितरणचे अधीक्षक अभियंता प्रभाकर हजारे, कार्यकारी अभियंता गोरे, भांबरे, तहसीलदार अर्चना भाकड आदी उपस्थित होते. महावितरणने वसुलीप्रमाणे एपासून जीपर्यंत ग्रुप केले आहेत. त्यातील पहिल्या चार म्हणजे ए,बी,सी,डी ग्रुपसाठी भारनियमन केले जात नाही. मात्र, गेल्या आठ दिवसांपासून त्यांना वीज तुटवड्याचा फटका बसतो. हे राठोड यांनी निदर्शनास आणून दिले. सध्या ४ हजार ५०० मेगावॅटचा तुटवडा भासत असल्याने ए आणि बी विभागासाठीही इमर्जन्सी भारनियमन होते, असे महावितरणचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)प्रामाणिकपणे वीज बिल भरणारे लोक आहेत. त्यांना इतरांमुळे भारनियमनाचा त्रास सहन करावा लागतो. नागरिकांचे विचारणा करणारे फोन आल्यास त्यांना किमान समाधानकारक उत्तर मिळाले पाहिजे. अधिकार्यांचे नंबर लोकांसाठी उपलब्ध करून द्या, असा सल्ला जिल्हाधिकारी कवडे यांनी दिला. शहरातील केबलिंगसंदर्भात,सावेडी उपकेंद्राला महापालिकेला जागा मिळवून देण्यासाठी बैठक घेऊ, असेही ते म्हणाले.शहरात गळतीचे प्रमाण वाढल्याने वसुली ४५ टक्क््यांपर्यंत गेली आहे. ती तीन टक्क्यांनी कमी झाली तरी भारनियमनाचे वेळापत्रक कमी होऊ शकते. शहरात रात्रीची वीज जाणार नाही. तांत्रिक बिघाड असल्यास अर्ध्या-एका तासात दुरूस्त केला जाईल. नागरिकांच्या प्रश्नांना संबंधित विभागातील अधिकार्यांनी उत्तरे द्यायला हवीत. तसे न केल्यास संबंधिताला निलंबित करू, असे अधीक्षक अभियंता हजारे यांनी स्पष्ट केले.
भारनियमनाला दोन दिवसांची डेड‘लाईन’
By admin | Updated: May 27, 2014 00:30 IST