शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

भारनियमनाला दोन दिवसांची डेड‘लाईन’

By admin | Updated: May 27, 2014 00:30 IST

अहमदनगर : केव्हाही आणि कधीही गायब होणारी वीज आणि त्यासाठी अधिकार्‍यांनी इमर्जन्सीचे नेहमीचे उत्तर याला नागरिक वैतागले आहेत.

अहमदनगर : केव्हाही आणि कधीही गायब होणारी वीज आणि त्यासाठी अधिकार्‍यांनी इमर्जन्सीचे नेहमीचे उत्तर याला नागरिक वैतागले आहेत. दोन दिवसांत यावर तोडगा न निघाल्यास कार्यालयाची तोडफोड करण्याचा इशारा आमदार अनिल राठोड यांनी देताच त्यावर रात्री कोठेही भारनियमन होणार नाही. तांत्रिक बिघाड अर्ध्या तासात दूर केला जाईल, असे महावितरणच्या अधिकार्‍यांनी सांगितले. उर्वरित प्रश्नांसंदर्भात महापालिकेसोबत संयुक्त बैठक घेऊ, असे जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयात शहरातील भारनियमनासंदर्भात जिल्हाधिकारी कवडे यांनी बैठक बोलावली होती. यावेळी आमदार राठोड, माजी महापौर भगवान फुलसौंदर, शिवसेनेचे शहराध्यक्ष संभाजी कदम, संजय चोपडा, महावितरणचे अधीक्षक अभियंता प्रभाकर हजारे, कार्यकारी अभियंता गोरे, भांबरे, तहसीलदार अर्चना भाकड आदी उपस्थित होते. महावितरणने वसुलीप्रमाणे एपासून जीपर्यंत ग्रुप केले आहेत. त्यातील पहिल्या चार म्हणजे ए,बी,सी,डी ग्रुपसाठी भारनियमन केले जात नाही. मात्र, गेल्या आठ दिवसांपासून त्यांना वीज तुटवड्याचा फटका बसतो. हे राठोड यांनी निदर्शनास आणून दिले. सध्या ४ हजार ५०० मेगावॅटचा तुटवडा भासत असल्याने ए आणि बी विभागासाठीही इमर्जन्सी भारनियमन होते, असे महावितरणचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)प्रामाणिकपणे वीज बिल भरणारे लोक आहेत. त्यांना इतरांमुळे भारनियमनाचा त्रास सहन करावा लागतो. नागरिकांचे विचारणा करणारे फोन आल्यास त्यांना किमान समाधानकारक उत्तर मिळाले पाहिजे. अधिकार्‍यांचे नंबर लोकांसाठी उपलब्ध करून द्या, असा सल्ला जिल्हाधिकारी कवडे यांनी दिला. शहरातील केबलिंगसंदर्भात,सावेडी उपकेंद्राला महापालिकेला जागा मिळवून देण्यासाठी बैठक घेऊ, असेही ते म्हणाले.शहरात गळतीचे प्रमाण वाढल्याने वसुली ४५ टक्क््यांपर्यंत गेली आहे. ती तीन टक्क्यांनी कमी झाली तरी भारनियमनाचे वेळापत्रक कमी होऊ शकते. शहरात रात्रीची वीज जाणार नाही. तांत्रिक बिघाड असल्यास अर्ध्या-एका तासात दुरूस्त केला जाईल. नागरिकांच्या प्रश्नांना संबंधित विभागातील अधिकार्‍यांनी उत्तरे द्यायला हवीत. तसे न केल्यास संबंधिताला निलंबित करू, असे अधीक्षक अभियंता हजारे यांनी स्पष्ट केले.