शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

८५० किलोमीटरच्या सद्भावना सायकल रॅलीतील अवलिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2019 13:01 IST

नगर येथील स्नेहालय परिवाराच्या गागोदे (जि. रायगड) ते सेवाग्राम (वर्धा) या ८५० किलोमीटरच्या सद्भावना रॅलीत दोघा अवलियांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. त्यातील एक जण पॅराआॅलिम्पिक सुवर्ण विजेता, तर दुसरा वृक्षक्रांतीसाठी झटणारा आहे.

बाळासाहेब काकडे / श्रीगोंदा : नगर येथील स्नेहालय परिवाराच्या गागोदे (जि. रायगड) ते सेवाग्राम (वर्धा) या ८५० किमीच्या सद्भावना रॅलीत दोघा अवलियांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. त्यातील एक जण पॅराआॅलिम्पिक सुवर्ण विजेता, तर दुसरा वृक्षक्रांतीसाठी झटणारा आहे.आचार्य विनोबा भावे, महात्मा गांधी व लोकमान्य टिळक यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त समता, ऐक्य, बंधुभाव, राष्ट्रप्रेम याचा संदेश देण्यासाठी गिरीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनासाठी गागोदे (रायगड) ते सेवाग्राम वर्धा ही ८५० किमीची सद्भावना सायकल यात्रा सुरू केली आहे. या यात्रेत देशाच्या विविध भागातून ज्येष्ठ नागरिक, युवक, युवती सहभागी झाले आहेत. यामध्ये गुजरातमधील ५३ वर्षीय दिव्यांग रमेशभाई ठाकूर व वृक्ष लागवड, संवर्धन याचा संदेश देणारे अंदमान-निकोबार बेटातील षण्मुखानंद नाथन सहभागी झाले आहेत. यातील षण्मुखानंद नाथन हे अंदमान निकोबार बेटावरील आहेत. ते दहावी पास आहेत. इंजिनिअरिंगचे शिक्षण घेताना अपयश आले. निसर्ग उपचार डिप्लोमा केला. त्यानंतर मोर्चा फिल्मसिटीकडे वळविला. त्यानंतर लग्न झाले. एक मुलगी झाली. २० भोजपूरी चित्रपटात असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केले. ‘प्यार बिना चैन कहा रे’ हा चित्रपट शेवटचा. त्यानंतर परमेश्वराचा शोध घेण्यासाठी जंगल गाठले. तेव्हा देव झाडातच असल्याचा साक्षात्कार झाला. तेव्हापासून ते वृक्षक्रांतीसाठी झटत आहेत. बारा वर्षांपासून घराचे तोंडही त्यांनी पाहिले नाही. अकोला जिल्ह्यातील अग्रवाल या प्राथमिक शाळेत राहून त्यांनी जिल्हाभर सहा लाख झाडे लावली. त्यांचे संवर्धन करत आहेत. २०१५ पासून ते हे काम करत आहेत. त्यांनी शासनाला ‘एक जन्म एक झाड’ व ‘एक विद्यार्थी एक झाड’ या दोन योजना दिल्या. शासनानेही त्यांच्या योजनांचा समावेश केला आहे.गुजरातमधील बरूचा येथे रमेशभाई ठाकूर यांचा जन्म झाला. बारावीला असताना रेल्वे अपघात झाला. त्यात एक पाय गमावला. निराश न होता जयपूर फूटमध्ये डॉ. पी. के. शेट्टी, रामचंद्र शर्मा व बी. आर. मेहता यांच्या मार्गदर्शनाखाली दिव्यांगांसाठी कृत्रिम हातपाय बनविण्याचे प्रशिक्षण घेतले. सन २००२ व २००४ मध्ये पॅराआॅलिम्पिमध्ये १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्ण पदके जिंकली. भारतीय सैन्य दलाच्या वैद्यकीय विभागात युद्धात हातपाय गमाविलेल्या सैनिक बांधवांना कृत्रिम हातपाय बनवून देण्याची नोकरी मिळाली. सैन्य दलात असताना शांती सेनेचे १६ देशात नेतृत्व केले.  सेवानिवृत्तीनंतर दिव्यांगांना हातपाय उपलब्ध करून देण्यासाठी मुंबईत भगवान महावीर ट्रस्ट व रत्नानिधी ट्रस्टमध्ये काम केले. सन १९८८ ला बाबा आमटे यांच्या ‘भारत जोडे’ सायकल यात्रेत सहभागी होऊन राष्ट्रप्रेमाचा संदेश दिला. सध्या त्यांनी वयाची पन्नासी ओलांडली आहे. एक पाय नाही. आत्मविश्वासाच्या बळावर ते सद्भावना यात्रेत सहभागी झाले असून ते या सायकल यात्रेचे नेतृत्व करीत आहेत.  

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर