शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

८५० किलोमीटरच्या सद्भावना सायकल रॅलीतील अवलिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2019 13:01 IST

नगर येथील स्नेहालय परिवाराच्या गागोदे (जि. रायगड) ते सेवाग्राम (वर्धा) या ८५० किलोमीटरच्या सद्भावना रॅलीत दोघा अवलियांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. त्यातील एक जण पॅराआॅलिम्पिक सुवर्ण विजेता, तर दुसरा वृक्षक्रांतीसाठी झटणारा आहे.

बाळासाहेब काकडे / श्रीगोंदा : नगर येथील स्नेहालय परिवाराच्या गागोदे (जि. रायगड) ते सेवाग्राम (वर्धा) या ८५० किमीच्या सद्भावना रॅलीत दोघा अवलियांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. त्यातील एक जण पॅराआॅलिम्पिक सुवर्ण विजेता, तर दुसरा वृक्षक्रांतीसाठी झटणारा आहे.आचार्य विनोबा भावे, महात्मा गांधी व लोकमान्य टिळक यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त समता, ऐक्य, बंधुभाव, राष्ट्रप्रेम याचा संदेश देण्यासाठी गिरीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनासाठी गागोदे (रायगड) ते सेवाग्राम वर्धा ही ८५० किमीची सद्भावना सायकल यात्रा सुरू केली आहे. या यात्रेत देशाच्या विविध भागातून ज्येष्ठ नागरिक, युवक, युवती सहभागी झाले आहेत. यामध्ये गुजरातमधील ५३ वर्षीय दिव्यांग रमेशभाई ठाकूर व वृक्ष लागवड, संवर्धन याचा संदेश देणारे अंदमान-निकोबार बेटातील षण्मुखानंद नाथन सहभागी झाले आहेत. यातील षण्मुखानंद नाथन हे अंदमान निकोबार बेटावरील आहेत. ते दहावी पास आहेत. इंजिनिअरिंगचे शिक्षण घेताना अपयश आले. निसर्ग उपचार डिप्लोमा केला. त्यानंतर मोर्चा फिल्मसिटीकडे वळविला. त्यानंतर लग्न झाले. एक मुलगी झाली. २० भोजपूरी चित्रपटात असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केले. ‘प्यार बिना चैन कहा रे’ हा चित्रपट शेवटचा. त्यानंतर परमेश्वराचा शोध घेण्यासाठी जंगल गाठले. तेव्हा देव झाडातच असल्याचा साक्षात्कार झाला. तेव्हापासून ते वृक्षक्रांतीसाठी झटत आहेत. बारा वर्षांपासून घराचे तोंडही त्यांनी पाहिले नाही. अकोला जिल्ह्यातील अग्रवाल या प्राथमिक शाळेत राहून त्यांनी जिल्हाभर सहा लाख झाडे लावली. त्यांचे संवर्धन करत आहेत. २०१५ पासून ते हे काम करत आहेत. त्यांनी शासनाला ‘एक जन्म एक झाड’ व ‘एक विद्यार्थी एक झाड’ या दोन योजना दिल्या. शासनानेही त्यांच्या योजनांचा समावेश केला आहे.गुजरातमधील बरूचा येथे रमेशभाई ठाकूर यांचा जन्म झाला. बारावीला असताना रेल्वे अपघात झाला. त्यात एक पाय गमावला. निराश न होता जयपूर फूटमध्ये डॉ. पी. के. शेट्टी, रामचंद्र शर्मा व बी. आर. मेहता यांच्या मार्गदर्शनाखाली दिव्यांगांसाठी कृत्रिम हातपाय बनविण्याचे प्रशिक्षण घेतले. सन २००२ व २००४ मध्ये पॅराआॅलिम्पिमध्ये १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्ण पदके जिंकली. भारतीय सैन्य दलाच्या वैद्यकीय विभागात युद्धात हातपाय गमाविलेल्या सैनिक बांधवांना कृत्रिम हातपाय बनवून देण्याची नोकरी मिळाली. सैन्य दलात असताना शांती सेनेचे १६ देशात नेतृत्व केले.  सेवानिवृत्तीनंतर दिव्यांगांना हातपाय उपलब्ध करून देण्यासाठी मुंबईत भगवान महावीर ट्रस्ट व रत्नानिधी ट्रस्टमध्ये काम केले. सन १९८८ ला बाबा आमटे यांच्या ‘भारत जोडे’ सायकल यात्रेत सहभागी होऊन राष्ट्रप्रेमाचा संदेश दिला. सध्या त्यांनी वयाची पन्नासी ओलांडली आहे. एक पाय नाही. आत्मविश्वासाच्या बळावर ते सद्भावना यात्रेत सहभागी झाले असून ते या सायकल यात्रेचे नेतृत्व करीत आहेत.  

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर