शहरं
Join us  
Trending Stories
1
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
2
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकाल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
3
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
4
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
5
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
6
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
7
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
8
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
9
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
10
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
11
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
12
Astrology: जोडीदार 'क्लिक' होत नाही अशी तरुणांची सबब; हा ग्रहांचा परिणाम समजावा का?
13
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
14
IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराजनं सांगितलं त्याच्या आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनमागचं कारण!
15
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 
16
Recipe : किसलेल्या दोडक्याची ‘अशी’ चमचमीत करा भाजी, चव जबरदस्त-दोडक्याचेच व्हाल फॅन!
17
दोन वर १ शेअर मिळणार फ्री, 'ही' कंपनी ग्रहकांना देणार भेट; याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?
18
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
19
West Bengal Accident: जगन्नाथाच्या दर्शनासाठी जाताना भाविकांवर काळाचा घाला, वाटेतच ट्रकला धडक, कारमधील ४ जण ठार!
20
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार

राबताहेत अडीच हजार चिमुकले हात

By admin | Updated: June 12, 2014 00:09 IST

बालकामगार विरोधी दिन विशेष : यशदाचे सर्वेक्षण

अण्णासाहेब नवथर, अहमदनगरसुट्या संपून शाळा पुढच्या आठवड्यात सुरू होतील़ खांद्यावर पाटी दप्तर घेऊन चिमुकले घराबाहेर पडतील़ मात्र शहरासह जिल्ह्यात अडीच हजार बालके राबत असल्याची धक्कादायक माहिती हाती आली असून, याविषयी येथील कामगार कार्यालयाने बघ्याची भूमिका घेतली आहे़ त्यामुळे बाल कामगार कायद्याच्या अंमलबजावणीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे़राज्य बालकामगारमुक्त व्हावे, यासाठी शासनाचे प्रयत्न सुरू आहेत़ बालकामगारांची सुटका करण्यासाठी बालकामगार विरोधी कायदा मंजूर करण्यात आला़ बालकामगार शोधून त्यांना मुख्यप्रवाहात आणण्याची जबाबदारी कामगार कार्यालयावर सोपविण्यात आली़ मात्र या कार्यालयाने वर्षभरात एकाही बालकाची सुटका केली नसून, या कार्यालयाला अद्यापही पाझर फुटला नसल्याचे दिसून येते़ यशवंतराव चव्हाण विकास प्रबोधिनीने येथील स्वास्थ दर्पण, या संस्थेच्या सहकार्याने नगर शहरासह जिल्ह्यातील बालकामगारांचे सर्वेक्षण केले़ या संस्थेने १८ फेब्रुवारी ते ३ मार्च २०१२ या काळात केलेल्या सर्वेक्षणानुसार शहरासह जिल्ह्यात २ हजार ५९१ बालकामगार आहेत़ हा अहवाल यशदाने कामगार कार्यालयास सादर केला़ ही वस्तुस्थिती असली तरी कार्यालयास वर्षभरात एकही बाल कामगार काम करताना आढळून आला नाही, तसा दावा कामगार कार्यालयाने केला आहे़ संबंधित कार्यालयाने यशदाला खोटे ठरवित बाल कामगार नसल्याचे सांगून बालकामगारांच्या दु:खावर एकप्रकारे मीठ चोळण्याचा प्रयत्न चालविला आहे़कामगार कार्यालयाने वर्षभरात १४ वेळा धाडसत्र राबविले़ परंतु यातील नियुक्त अधिकाऱ्यांना बालकामगार आढळून आला नाही़ यशदाने बालकामगारांची संख्या अडीच हजारांच्यावर असल्याचे सांगितले आहे़ अशी आहे शिक्षाबालकामगार काम करत असलेल्या मालकास १ वर्षाचा कारावास व १० हजार रुपये दंड करण्याची तरतूद बालहक्क कायद्यात आहे़प्रमुख अधिकाऱ्यांवर जबाबदारीजिल्हा पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, निवासी उपजिल्हाधिकारी,महिला व बालकल्याण विकास अधिकारी, जिल्हा प्राथमिक शिक्षण अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, महापालिका आयुक्त वर्षभरात ३३० आस्थापनांची पडताळणी केली़ १४ धाडसत्र राबविण्यात आले़ एकही बालकामगार आढळून आला नाही़ दोन तक्रारी आल्या होत्या़ परंतु त्यात तथ्य नसल्याचे आढळून आले़-बाळासाहेब वाघ, सहाय्यक आयुक्त, कामगार कार्यालयबालकामगारांचा प्रश्न गंभीर आहे़ मात्र तक्रारी सादर करण्यासाठी राज्यात बाल हक्क आयोग गठीत करण्यात आला नाही़ तो गठीत करण्यात यावा,यासाठी आंदोलन सुरू असून, राज्य शासनाचे लक्ष वेधले जात आहे़-राजेंद्र काळे, सामाजिक कार्यकर्तेअसे आहेत बालकामगारनगरशहर- ३८८, संगमनेर-९४,कोपरगाव-५१८, राहाता-११८, श्रीरामपूर-२३, पाथर्डी-२०९, नेवासा- १७३, राहुरी- ७९८, कर्जत-२३, श्रीगोंदा- १४१, अकोला-३२, पारनेर- ३४, शेवगाव- ४०कायदा काय सांगतोबालकायदा १९८६ नुसार १४ वर्षाखालील बालकांना कामावर घेऊ नयेबालकांची शारीरिक व मानसिक हानी होणार नाहीमानसिक विकास खुंटेल,असे धोकादायक काम देऊ नये