शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

कडक निर्बंधाच्या अंमलबजावणीसाठी बाराच कर्मचारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:19 IST

अहमदनगर : शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव राेखण्यासाठी कडक निर्बंध करण्यात आले आहेत. मात्र महापालिकेने या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी अवघ्या बारा कर्मचाऱ्यांचीच ...

अहमदनगर : शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव राेखण्यासाठी कडक निर्बंध करण्यात आले आहेत. मात्र महापालिकेने या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी अवघ्या बारा कर्मचाऱ्यांचीच नेमणूक केली असून, हे पथक एका टोकापासून दुसऱ्या टोकाला जाईपर्यंत बराच वेळ जातो. एकदा आलेले पथक पुन्हा येत नाही, हे पाहून दुकानदार शटर बंद करून दुकाने सुरूच ठेवत असल्याचा प्रकार सावेडीत पाहायला मिळत आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले हे रविवारी रस्त्यावर उतरले होते. त्यांच्या पथकाने विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई केली. शहराची जबाबदारी महापालिकेवर आहे. भरारी पथके स्थापन केल्याचा दावा मनपाकडून केला जात आहे. असे असले तरी प्रत्यक्षात १२ कर्मचाऱ्यांची चारच पथके महापालिकेकडून स्थापन केली आहेत. शहराचे क्षेत्रफळ पाहता हे कर्मचारी कमी पडतात. शहरात दुकानांची संख्याही मोठी आहे. त्यात आता दुकानांसाठी सकाळी ७ ते ११ ही वेळ निश्चित करण्यात आली. मात्र दुपारी ११ नंतर अनेक दुकाने उघडी असतात. शटर बंद करून दुकाने सुरू असून, ग्राहक खरेदीसाठी गर्दी करताना दिसत आहेत. यावर कुणाचा अंकुश नाही. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

शहरासह केडगाव, सावेडी, बोल्हेगाव, नागापूर, सारसनगर, बुरुडगाव, नालेगाव, नेप्तीनाका, कल्याण रोड, बालिकाश्रम रोड, तपाेवन रोड भागात दुकाने, भाजीपाला विक्रेते, दूध विक्रेते, पेट्रोल पंप, मेडिकल आदी दुकानांची संख्या मोठी आहे. परंतु, त्या तुलनेत कर्मचारी कमी असल्याने नियमांचे पालन होणार कसे, असा प्रश्न जाणकारांकडून उपस्थित केला जात आहे.

....

शटर बंद करून विक्री सुरू

दुकानांना सकाळी ७ ते ११ ही वेळ निश्चित करण्यात आलेली आहे. परंतु, दुकानांचे शटर बंद करून विक्री सुरू असून, पथकाला दुकानांवर नियंत्रण ठेवणे कठीण झाले आहे. त्यामुळे महापालिकेने पथकांची संख्या वाढविण्याची मागणी होत आहे.